tag:blogger.com,1999:blog-24617685897073555862024-02-19T09:58:26.252+05:30अर्धे आकाश - holding half the skyI strongly believe what the old Chinese proverb says - Half the sky belongs to women. What does this mean to me? Gender sensitive writing, pushing women to go beyond the threshold, and living in the present. Come join me on this beautiful journey.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.comBlogger387125tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-77770032824983030212023-05-01T21:10:00.003+05:302023-05-01T22:36:05.106+05:30प्रिय भाई...<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTGb3qW8bhmERFxK2vxGMhc9xWAkudwLDpOc_MHJj42Jr8p5BPBg7-MKd7rULGErSCF1mZ-OMella5G5FRCp9QwpVUkrytAv6hKIap7jqmUm5I3rAUZ8Sb1vHjt6uyHdhXZobkLZQ7h_FtELXvA8PH0v1MEHa0_WRfMhgqc7_vcgmI_FPdHpafnbN3LQ/s1600/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F.jpeg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTGb3qW8bhmERFxK2vxGMhc9xWAkudwLDpOc_MHJj42Jr8p5BPBg7-MKd7rULGErSCF1mZ-OMella5G5FRCp9QwpVUkrytAv6hKIap7jqmUm5I3rAUZ8Sb1vHjt6uyHdhXZobkLZQ7h_FtELXvA8PH0v1MEHa0_WRfMhgqc7_vcgmI_FPdHpafnbN3LQ/s320/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F.jpeg" width="240" /></a></div><p>काही मैफिली, पुस्तकं, गाणी, सिनेमे, नाटकं अशी असतात की ज्यांचा अनुभव अलगद तुमच्या पदरात पडतो, विनासायास. म्हणजे कधी एकदा हे पुस्तक मी वाचतेय, किंवा अमुक व्यक्तीचं गाणं ऐकतेय असं न हाेता. आहे बुवा असा एक कार्यक्रम, आहे एक पुस्तक, एक नाटक. चांगलं आहे. बघू मिळालं तर पाहू, वाचू. असाच एक प्रयोग होता, प्रिय भाई एक कविता हवी आहे. मुक्ता बर्वे हे एकमेव ओळखीचं नाव त्यातलं. बाकी मला तरी माहीत नसलेली. पण दोनतीन अगदी रसिक परिचितांकडून याची जबरदस्त शिफारस आली आणि मग कधी मुंबईत होतोय प्रयोग याची मी वाट पाहू लागले. मुक्ताच्या इन्स्टा पेजवर पुणे, सांगली वगैरे ठिकाणचे प्रयोग दिसत, अनेक लोक मुंबईत कधी अशी विचारणाही करत तिथे. अखेर इन्स्टावरच एक मे रोजी दीनानाथला प्रयोग आहे असं कळलं, लगेच बुक माय शो साइटवर तिकीट काढलं. काही मैत्रिणींना विचारलं होतं, पण कोणालाच जमणार नव्हतं. पण मला हा प्रयोग हुकवायचा नव्हता, एकटीने जायलाही आवडणारच होतं. मला सुनीताबाई, मराठी कविता इतके दोनच मुद्दे माहीत होते, मी याची परीक्षणं वगैरे वाचली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष समोर काय येणारेय याची फारशी कल्पना नव्हती.</p><p>आज सकाळी साडेअकराच्या प्रयोगाला गेले ठरल्यानुसार. (Spoiler alert) तुम्ही हा पाहणार असाल तर पुढचं वाचायचं की नाही ते ठरवा. पण प्रयोगाला जरूर जा.</p><p>तर पुण्यातल्या एका रुग्णालयातल्या काही रसिक डाॅक्टरांना काही निमित्ताने एक विशिष्ट कविता हवी असते, आणि ती मिळवण्यासाठी ते सुनीताबाई आणि पुल यांच्यापर्यंत पोचतात. गोष्ट खरी घडलेली, १९९८मधली. त्यामुळे गूगलबाई मदतीला येण्यापूर्वीचा काळ. डाॅ. समीर कुलकर्णी यांनी पाचसहा वर्षांपूर्वी बहुधा लोकसत्तेत याविषयी लिहिलेलं वाचलं होतं ते प्रयोग पाहताना एकदम आठवलं. तेव्हा ते बऱ्यापैकी व्हायरल झालं होतं. या प्रयोगाची संहिताही त्यांचीच. प्रयोग नाटकासारखा नाही, कलाकारांच्या हातात कागद आहेत, पाठांतर नाही केलेलं. त्यात चढउतारही नाहीत फार. पण तरी विलक्षण नाट्य आहे. </p><p>इतक्या वर्षानंतर माझ्या हे लक्षात आलंय की मला एखादा सिनेमा, पुस्तक, नाटक आवडतं म्हणजे मला ते एका वेगळ्या प्रवासाला घेऊन जातं. त्यातल्या एखाद्या दृश्याच्या, शब्दाच्या साथीने मी बरीच कुठेकुठे फिरून येते. सहसा या आठवणी असतात, सुखद किंवा आज येत राहिल्या तशा दु:खद. मंजिरी, माझी मावसबहीण जी सव्वा महिन्यापूर्वी अचानक गेली, तिने मला हा कार्यक्रम नक्की पाहा सांगितलं होतं. यातली वृद्ध कोळ्याची कविता ऐकताना तीच डोळ्यांसमोर येत राहिली, आणि डोळे भरून आले. मंजिरीने तीन वेळा कर्करोगाचा सामना केला होता, ती गेली वेगळ्याच कारणाने. पण तरी ती कविता ऐकताना तिला काय वाटलं असेल याची मी सहज कल्पना करू शकले.</p><p>एरवी कविता हा माझा प्रांत नव्हे. म्हणजे कविता आवडत नाहीत असं नाही. अनेकदा अचानक समोर आलेल्या ओळींनी मी झपाटून गेलेही आहे. पण मी मुद्दाम तिच्या वाटेला जात नाही सहसा. कविता वाचू आज असं मला अजिबात वाटत नाही. पण तरी अनेक कविता आहेत ज्या मनाला भिडल्याही आहेत. आजच्या प्रयोगात ऐकलेल्या अनेक कविता आवडीच्या, ऐकलेल्याही. पण ही वृद्ध कोळ्याची प्रथमच ऐकली. आणि तिने मला घेरून टाकलं बराच वेळ.</p><p>माझ्या अशा विशेष आवडीचा नसलेला विषय, पण सुनीताबाईंसाठी तर कविता ही त्यांची कायम साथ असणारी, साथ देणारी जिवाभावाची सखी. डाॅ. कुलकर्णींना हवी असलेली कविता शोधतानाचे तीनचार दिवस पुल आणि सुनीताबाईंनी किती आनंदात काढले असतील, जुन्या पुस्तकांमध्ये ती शोधताना त्यांच्या स्मृतीची किती पानं चाळली असतील, याची कल्पना मी सहज करू शकते. सुनीताबाई डाॅ. कुलकर्णींना तसं स्पष्ट बोलूनही दाखवतात अखेरीस. मग तेव्हा नक्की वाटलं की यार आपल्याला कविता थोडी का होईना कळते, आपण त्यातलं सौंदर्य पाहू शकतो, हे भाग्यच म्हणायला हवं.</p><p>सलग पावणेदोन तास चालणाऱ्या या प्रयोगात मुक्ताने सुनीताबाई रंगवल्या आहेत. पण ते इतरही कोणी करू शकेल असं मला वाटलं. मला तिला कमी लेखायचं नाहीये, पण तिला यात फार वावच नाहीये. एकतर बराच वेळ चेहरा अंधारात आहे, मुखाभिनयाला फार वाव नाही, एका जागेवर बसून आहेत सगळेच कलाकार. आणि ती चाफ्याच्या झाडा वाचते तेव्हा सभागृहात एकाही व्यक्तीचे डोळे कोरडे राहण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे त्या अर्थाने म्हणत नाहीये. मुक्ताला यात मुख्य भूमिका आहे ती रसिक प्रेक्षकांना या प्रयोगाकडे वळवण्याची. निदान मी तरी ती आहे म्हणून प्रयोगाला गेले, अन्यथा शंकाच आहे गेले असते का. मग अर्थात एका उत्तम कार्यक्रमाला मुकले असते. आणि हे अनेक अशा प्रयोगांबाबत होत असावं. मग कोणीतरी शिफारस केली असली की वेळ काढून कार्यक्रमाला गेलेलं बरं, सहसा कार्यक्रम चांगला निघतो असा माझा आजवरचा अनुभव. नुकताच असा आणखी एक प्रयोग पाहिला, आमीर खुस्रोवरचा, दास्तानगोई प्रकारातला. तोही एका मैत्रिणीने सुचवलेला, आणि अतिशय प्रभावी. दीड तास कसा गेला ते कळलं नाहीच, पण गाणं आणि खुस्रोची गोष्ट कैक दिवस मनात रेंगाळत राहिली. आणि या कार्यक्रमाने आठवण करून दिली सुखनची. पाच गायक आज होते, एरवी सगळे नसतात असं कळलं. त्यातला एक जयदीप, सुखनचा महत्त्वाचा हिस्सा. अशी गंमतजंमत.</p><p>प्रिय भाई...च्या नेपथ्याबद्दल लिहायलाच हवं. श्याम भुतकरांनी ते केलं आहे. अगदी साधं पण चपखल. मागे दिसत राहणारी अप्रतिम चित्रं काढली आहेत मिलिंद मुळीक यांनी. त्या सगळ्याचा प्रयोगाच्या परिणामकारकतेत मोठा हात आहे.</p><p>असे छोटेमोठे कार्यक्रम होत असतात, होत राहायला हवेत. आपण ते पाहायला हवेत. असं मला आवर्जून वाटतं खरं. हा कार्यक्रम आठनऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेला, आज पंचविसावा प्रयोग होता फक्त. त्यावरनं अंदाज येतो की हे कार्यक्रम सुरू ठेवणं किती आव्हानात्मक आहे. </p>mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-80728172132813126742023-03-25T22:17:00.003+05:302023-03-26T12:57:13.708+05:30ती गेली तेव्हा<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNCVEI66yrE7TN4F_9_X24AToK249vX97s6uh-RIoDvZDFMDH4p4N24fnEvZzjNIBQEFFhBQvKw_7uYFrtYp38Mad_V93bt7JFaHOb74PKlJh-Bzfc-UmRFnzwnp14Ken1Zx831ZsWn0V9GIYRlqY7hDh45KKVhmX0kmG-HBqywFZMa4poemg0ylAE3w/s810/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="810" data-original-width="784" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNCVEI66yrE7TN4F_9_X24AToK249vX97s6uh-RIoDvZDFMDH4p4N24fnEvZzjNIBQEFFhBQvKw_7uYFrtYp38Mad_V93bt7JFaHOb74PKlJh-Bzfc-UmRFnzwnp14Ken1Zx831ZsWn0V9GIYRlqY7hDh45KKVhmX0kmG-HBqywFZMa4poemg0ylAE3w/s320/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE.jpeg" width="310" /></a></div><p>कझिन हा शब्द सर्वसमावेशक आहे, लिंगभेदविरहितही आहे. कझिन म्हणजे मामा, मावशी, काका, आत्या यांपैकी कोणाचाही मुलगा किंवा मुलगी. पण मावसबहीण म्हटलं की मावशीची मुलगी हे अगदी स्पष्ट असतं. कझिन हा शब्द ज्यांच्या मातृभाषेतला आहे असे कोणी ब्रिटिश वा अमेरिकी वा इतर देशांतले लोक माझ्या इतके जवळचे नाहीत की ते या शब्दाचा कसा वापर करतात, त्यात आपल्याकडच्या नात्यांच्या छटा असतात का, वगैरे मला ठाऊक असावं. मला भारतातली ही नाती कळतात. ईशान्य भारतात कदाचित इतर भारतापेक्षा नाती वेगळी असावीत, म्हणजे त्यातली जवळीक वा अंतर असा माझा अंदाज कारण तिथली कुटुंबपद्धती मला नीटशी माहीत नाही. पण बाकी बहुतेक सगळीकडे मावशी, मामी, आत्या आणि काकू किंवा काका, मामा, मावसोबा, आतोबा या नात्यांतले बारकावे साधारण एकसारखे असावेत असं वाटतं. काही भाषांतरित साहित्य वाचून किंवा हिंदी साहित्य वाचून असा अंदाज मी बांधला आहे, तो पूर्णपणे गंडलेला असू शकतो.</p><p>काल माझी मावसबहीण मंजिरी गेली. तशी अचानक म्हणायला हवं, कारण तिला व्हायरल सर्दीतापखोकला झाला होता, त्याआधी झालेली नागीण बरी होत आली होती. एकदोन दिवसांत तिच्या शरीरात काहीतरी घडामोडी झाल्या आणि काल सकाळी तिचा श्वास थांबला. </p><p>ती माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी. याहून कमी अंतर असलेली भावंडं मला आहेत. पण तिच्याशी माझी काॅलेजच्या वयापासून सूर जुळले होते खरे. माझ्या मैत्रिणींनाही ती माहीत होती इतकं तिचं नाव माझ्या तोंडी सतत असे. </p><p>तिला २०१२ च्या मध्यावर कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि आम्हीच खचून गेलो. आम्ही म्हणजे माझ्या आजोळची आम्ही पंचवीसेक मावसमामेभावंडं. आमचे जोडीदार आणि आमची मुलं. आम्ही सगळे बऱ्यापैकी एकमेकांशी जोडलेलो आहोत अजून, वेगवेगळ्या शहरांत राहूनही. मंजिरी अर्थात घाबरली असणार तेव्हा, पण तिने नंतर अत्यंत धीराने आणि तडफेने या रोगाचा सामना केला. ती अॅडमिट असताना आम्ही ड्यूट्या लावून घेतल्या होत्या, एकही मिनिट तिला एकटीला राहावं लागलं नाही. तिची आई, माझी माईमावशी तेव्हा होती. मावशीनेही अत्यंत धीराने या प्रसंगाचा सामना केला, मंजिरीसमोर एकदाही हतबलता दाखवली नाही, याचं मोल मंजिरीसाठी मोठं होतं, ती ते नेहमी बोलून दाखवत असे. तिने हिंदुजामधल्या डाॅक्टरांवर जसा डोळे मिटून विश्वास ठेवला तसाच डोंबिवलीतल्या तिच्या जुन्या वैद्यांवर आणि आणखी एकदोन उपचार पद्धतींवर. ती त्यातून बरी झाली. आणि आधीच अत्यंत ठाम मतं असलेली आणि नियोजनपूर्वक जगणारी अधिकच तसं जगू लागली. वर्षातनं एकदा महाराष्ट्राबाहेर सहल, आणि एकदा राज्यातल्या एखाद्या भागात हे तिने पक्कं ठरवलेलं. त्यासाठी लागणारा सगळा अभ्यास ती करत असे आणि त्यानुसार सहल आखत असे. तिच्याबरोबर कधी मी तर कधी इतर भावंडं असत. ती हिशोबी होती, आयुष्यातला काही काळ तिने ज्या पद्धतीने काढला होता त्यामुळे ती तशी झाली होती. ती नेहमी म्हणायची, पुस्तक विकत घेताना मी ऊर्दू वाचते, म्हणजे काय तर आधी पुस्तकाचं मलपृष्ठ पाहून किंमत बघायची. मग तिचा पगार वाढला, मुलं कमावू लागली तसं तिचं पैपैचा हिशोब ठेवणं कमी झालं. मुलांसोबत तिने परदेशप्रवासही केला.</p><p>ती प्रचंड वाचायची. लायब्ररीतून पुस्तकं मासिकं आणून वाचायची. विकत अशी पुस्तकं तिने फार कमी घेतली असतील. मी बरीच वर्षं अंतर्नाद, साधना, ललितची वर्गणी भरत असे. अंक वाचून झाल्यावर रद्दीत टाकायला जिवावर येई. एकदा मंजिरीला हे कळल्यावर तिने लगेच म्हटलं, अंक माझ्याकडे पाठव. ती ते वाचे, मग तिच्या आॅफिसातल्या मराठी लोकांकडे ते जात. मग महाराष्ट्राबाहेरच्या त्यांच्या आॅफिसातल्या मराठी लोकांकडे ते जात. अंकाची किंमत पूर्ण वसूल होई. समान आवडीचे लोक आपण शोधून काढतो किंवा ते आपल्याला शोधून काढतात तसे वाचक सहकारी तिच्या आसपास होते.</p><p>तिच्या घरी टीव्ही नव्हता. कधीच. डोंबिवलीत राहात होती तेव्हा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ती दोघा मुलांना घेऊन आवर्जून जाई. तिच्या घरात मुख्य दारावर एक फळा होता. तिथे कायम एखादी कविता, चित्रं असं काही असे. ती आणि मुलं मिळून ते सजवत. ती हौशी गायिका होती, आम्ही सगळी जमलो की गात असे. दिवा लावते दिवा हे खूप जुनं गाणं, मी मूळ ऐकलेलं नाही, तिच्याच तोंडून ऐकलंय. माझ्यासाठी मंजिरी म्हणजे ते गाणं आणि ते गाणं म्हणजे मंजिरी. तिची लेक भरतनाट्यम शिकली, त्यामुळे त्यातही तिला रस होता. आमच्या मामेभावांमुळे गिर्यारोहण हेही तिचं एक वेड होतं. मुंबईजवळचे अनेक छोटेमोठे ट्रेक तिने केले होते. ती गेल्यावर मी माझ्या शाळेतल्या निवडक मैत्रिणींच्या ग्रूपवर मेसेज टाकला तर एक जण म्हणाली, अगं माझ्या ट्रेकच्या ग्रूपमध्ये होती ती. </p><p>चवीने खाणं आणि खिलवणं तिला आवडे. ती पूर्ण शाकाहारी होती. तिला केळं अजिबात आवडायचं नाही. म्हणजे शिकरण केली असेल आणि मंजिरी माझ्या डाव्या बाजूला बसली असेल जेवायला तर शिकरणीची वाटीही डावीकडे ठेवता यायची नाही इतका केळ्याचा वास तिला नकोसा असे. कॅन्सर झाल्यापासून तिने शक्यतो पॅकेज्ड खाद्य, फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न, रेडी टू ईट प्रकारचे पदार्थ खाणं बंद केलं होतं. ब्रेड वा पावही नाहीच खायची. घरी केलेले पदार्थ तिच्यासाठी प्रिय होते. माझ्या घरी नागवेल आहे. तर सामान न्यायला महिन्यातनं एकदा फेरी असायची तेव्हा जितकी पानं वेलीवर असतील तितकी तिला पाठवायची असा नियमच होता आमचा. मागच्या वर्षी किमो सुरू असताना मी तिला सांगितलं होतं की काहीही खावंसं वाटलं, सोबतीला कोणी हवंय असं वाटलं तर फोन कर, मी येईन. लिंबाचंं लोणचं मी करते तिला माहीत होतं, ते दे थोडं म्हणाली होती. मग सगळ्यात जुनं लोणचं तिला दिलं होतं थोडं. तिचा नवरा श्रीधर उत्तम स्वयंपाक करतो, बऱ्याचदा तोच सगळं करत असे. तो कानडी, त्याच्या हातचं इडलीसांबार, वेगवेगळ्या चटण्या, अगदी चविष्ट. मंजिरी आजारी असताना, तोंडाला चव नसताना तो तिला कधी धिरडी, कधी इतर काही तिला हवं तसं करून देत असे. घरचं लोणकढं तूप तिच्या अतिशय आवडीचं. मला आठवतंय आम्ही दोघी आणि मुलं दिल्ली फिरायला गेलो होतो तेव्हा तिने घरची तुपाची बाटली आणली होती, आणि ते रोजच्या जेवणात आवर्जून घ्यायची, आम्हालाही वाढायची अर्थात. कोकणात आजोळी जायचं असेल काही कारणाने तर आम्ही दोघी आणि मुलं एकत्रच प्रवास करायचो ठरवून. जाता येतानाचे डबे घेऊन जायचो. रत्नागिरीत सुद्धा तिने एक बाई शोधल्या होत्या त्या आम्हाला परतीच्या गाडीवर डबा आणून देत पोळीभाजीचा.</p><p>मुलीसाठी ती दोनतीन वर्षं तरी मुलगा शोधत होती, त्याचा थोडा ताण तिला जाणवत असावा. पण मग लग्न ठरलं, दोन महिन्यांत झालंसुद्धा. लग्नानंतर तिने वार्षिक पेट स्कॅन केला तेव्हा या कॅन्सरने पुन्हा पाय ठेवल्याचं लक्षात आलं. मग पुढचं वर्ष मुलीचे सण, आणि हिचे उपचार/शस्त्रक्रिया यांत गेलं. तिने सगळं सांभाळून, पूर्णवेळ आॅफिससुद्धा, सणही हौशीने केले आणि तब्येतही मार्गावर आणली. कोविड काळात भटकंती बंद होती अगदीच, आणि मग निर्बंध उठले तर हिच्या तब्येतीचा प्रश्न होता. त्यामुळे प्रवास लांबला होता पण तिने भावाबरोबर कोकणात जायची कालची तिकिटं काढली होती. ताप आला तेव्हाही वाटलं असेल की तापच आहे, बरं वाटेल, जाऊ शकू आपण. दादा आहेच बरोबर. पण ते होणं नव्हतं. ती वेगळ्याच प्रदेशात निघून गेली.</p><p>तिने दोन्ही मुलांनाही अतिशय विचारपूर्वक घडवलं होतं. अजिता अत्यंत प्रतिभावान, मेहनती, वेगवेगळ्या कलांमध्ये प्रवीण, आणि कामाला वाघ. धाकटा मिहीर काहीसा शांत, पण समजूतदार. तो दहावीत असताना मंजिरीला कॅन्सरची पहिल्यांदा लागण झाली. त्यांना त्यामुळे घर बदललं, तिच्या आॅफिसच्या जवळ राहायला आले. त्याला त्याचं मित्रमंडळ सोडून नव्याने नाती जोडावी लागली. आईला डाॅक्टरांकडे नेणं, किमो सुरू असताना तिच्यासोबत बसणं, तिला कुठेही घेऊन जाणं, सगळं तो विनातक्रार करत आला. मी तिला नेहमी सांगायचे, अशी मुलं विरळा, त्याची तक्रार नको करत जाऊस. मुलांना ती कशाला नाही म्हणाली नसेल बहुधा, पण नवनवीन शिकायला प्रोत्साहन कायम दिलं. आणि शब्दांतनंं दिलं नसेल तर तिच्या वागण्यातून ते त्यांना मिळतच होतं. </p><p>मंजिरीने, जिला आम्ही काही भावंडं मांजा म्हणायचो, आयुष्यात प्रचंड माणसं जोडली. जिथे जाईल तिथे ती प्रश्न विचारी, काहीतरी सांधा जुळे आणि ती माणसं तिची होऊन जात. गोदरेजमध्ये तर तिचं आॅफिसव्यतिरिक्तही वैयक्तिक नेटवर्क मोठं होतं. ती कायम मदतीला तयार असे, या माणसांच्या आधारावरच. आणि ती माणसंही तिच्यामुळेच मदत करायला कायम पुढे असत. एखाद्या शहरात घर हवंय, काही दिवस राहायचंय, काॅलेज कोणतं चांगलं आहे, खायला काय मिळतं, खरेदी काय करायची हे सगळं ती शोधून काढायची, आपणहोऊन सांगायची की या या गोष्टी माझ्यावर सोपव, मी करते. </p><p>तिची वैयक्तिक राहणी अतिशय साधी होती. ती अनेकदा साड्या नेसे, पण सुती. अगदी सणासमारंभालाही तिला साध्या साड्या नेसायला आवडत, जरीकाठाच्या अभावानेच. लेकीच्या लग्नातही असंच काही करण्याचा तिचा विचार तिच्या मोठ्या बहिणीने हाणून पाडला आणि पैठणी नेसायला लावली. लग्नात तिने एकदाच साडी बदलली, पैठणी बदलून दुसरी साडी नेसली ती मोतिया रंगाची. लग्नात दोघी विहिणी, वधूमाय आणि वरमाय आहेत असं अजिबात लक्षात येत नव्हतं, इतक्या साधेपणाने वावरत होत्या. </p><p>तिचं लग्न कानडी कुटुंबात झालं होतं. तिने त्या कुटुंबातल्या सगळ्या चालीरीती, स्वयंपाक आत्मसात केला होता. भाषाही तिला कळायची, बोलता फार यायचं नाही कारण मुंबईतली मंडळी मराठीच बोलत घरात. पण गावाला गेलं की तिथे दिसणारी माणसं, तिथल्या पद्धती यांच्याबद्दल आम्हाला नेहमी रंगवून सांगायची. दुष्काळी गाव. पाण्याची वानवा. मग भल्यामोठ्या पातेल्यात दहीभात किंवा आणखी कोणता भात घेऊन घरातली बाई बसे, आणि तिच्याभोवती बाकीची मंडळी. ती प्रत्येकाच्या हातावर एकेक घास ठेवत जाई आणि ताटलीचमच्याविना नाश्ता उरकत असे. हे सांगताना तिच्या डोळ्यात एक चमक असे, की त्या त्या परिस्थितीवर बायका कसे मार्ग काढत बघा! अम्मा म्हणजे तिच्या सासूबाई. त्यांची ती पहिली सून, घरात आलेली पहिली मुलगी. दोघींचा एकमेकींवर प्रचंड जीव. विक्रोळीला आल्यानंतर त्या जरा एकमेकींपासून लांब गेल्या पण मनाने जवळच राहिल्या. </p><p>भूतकाळाशी जोडलं राहण्याची एक वेगळीच असोशी तिच्याकडे होती. वयोवृद्ध नातेवाईक, जुनी घरं यांच्याकडे ती जणू ओढली जाई. म्हणजे आमचे नव्वदी पार केलेले मामाआजोबा, मावशी आजी वगैरेंना ती आवर्जून भेटायला जाई, त्यांच्या गोष्टी ऐकायला तिला मनापासून आवडे. संग्रहालयं पाहाणंही तिच्या आवडीचं, तासनतास तिथे फिरायची ताकद तिच्यात होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाची कासही तिने आवडीने धरलेली होती. आॅफिसच्या कामासाठी तर ती संगणक वापरत असेच, त्यातलीही नवनवीन साॅफ्टवेअर ती शिकून घेई. नवीन आलेल्या तरुण सहकाऱ्यांना तिचा आधार वाटे तो तिच्या मोकळेपणामुळे असे, तसंच तिच्या खणात कायम असलेल्या घरी केलेल्या खाऊमुळे. मराठी सणांना केले जाणारे पदार्थ ती करायचीच, आणि दुसऱ्या दिवशी आॅफिसातनंही घेऊन जायची. अमराठी सहकारी तिच्या त्या डब्यावर तुटून पडायचे यात नवल नाही. </p><p>अनेकांचा असतो तसा आम्हा पटवर्धन आजोळ असलेल्या मावसमामे भावंडांचा वाॅट्सअॅप ग्रूप आहे. त्यावर रोज सुप्रभात वगैरे मेसेज नसतात, पण कोणाचा वाढदिवस असल्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो. मांजाची खासियत अशी की ती त्या दिवशी वाढदिवस असलेल्या व्यक्तीचा एखादा खास फोटो शेअर करायची. तिच्या लॅपटाॅपमध्ये असे शेकडो फोटो नीट फाइल करून ठेवलेले होते बहुधा. वाढदिवस असलेली व्यक्ती मंजिरी आज कोणता फोटो शेअर करणार याकडे डोळे लावून बसलेली असायची. मी तर नक्कीच. नुकतंच कोणी तरी तिला असं सांगितलं तर म्हणाली की माझेही त्या निमित्ताने फोटो पाहिले जातात, कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या होतात त्या निमित्ताने. आता आम्ही सगळे मिळून तिच्या आठवणी जागवणार. </p><p>माझं आणि तिचं नातं जवळचं तर होतंच, पण ती आजारी पडल्यानंतर विक्रोळीला राहायला आल्यानंतर आम्ही अधिक जवळ आलो. आमच्या लेकीही जिवाभावाच्या मैत्रिणी. मग महिन्या दोन महिन्यातनं भेट व्हायचीच. आमचा आठवड्याला एक फोन ठरलेला. दुपारची वेळ असेल तर हळू आवाजात, म़ण्मयी, दोन मिनिटं बोलू शकतो, असं विचारायची. मला वेळ असला तर गप्पांमध्ये अर्धा तास सहज निघून जायचा. गप्पांमध्ये भूतकाळ क्वचितच डोकावे. मी लहानपणी अनेक सुट्या तिच्या घरी घालवलेल्या आहेत, माझं काॅलेज त्यांच्या घरापासून १५ मिनिटं चालायच्या अंतरावर. त्यामुळे आम्ही खूप काळ एकत्र पूर्वीही घालवला आहे. मला आठवतं तिच्या वडलांनी सिंगापूरहून अंजिरी रंगाची चायना सिल्कची साडी आणली होती. मी आठवीत असेन बहुतेक. आमच्या मोठ्या मामेभावाच्या लग्नात मी त्या साडीतल्या कापडाचा फ्राॅक आणि मांजाने पंजाबी ड्रेस शिवला होता. ऐंशीच्या दशकात मिंटी वेण्या नावाची एक फॅशन होती. मिंटी नावाच्या गोळ्या मिळत त्या गोळ्यांच्या जाहिरातीतल्या मुलीने त्या घातलेल्या होत्या बहुतेक. दोन बाजूला कानाच्या जरा वरच दोन पोनी बांधायचे आणि मग वेण्या घालायच्या. आम्ही दोघी अनेकदा ते करत असू. दोघींचे केस लांब होते, दोघी दोन वेण्याच घालायचो सहसा. वेणीचा गोंडा वळू नये म्हणून रात्री झोपताना शेवटच्या टोकापर्यंत वेणी घालायची, आणि ती गुंडाळून रबर लावायचा. दुसऱ्या दिवशी वेण्या घातल्या की गोंडे छान कुरळे, फुललेले दिसत. हे मी तिच्याकडनं शिकलेले.</p><p>आमच्या सेकंड कझिन्सपैकीही अनेकांशी तिने नाती जपली होती, त्यांनाही तिचे असे फोन अधनंमधनं जात असत. परवा तिला निरोप देऊन आले आणि हेच डोक्यात होतं की, मंजिरी नव्हती, तिला रात्री फोन करून सांगायला हवं कोणकोण आलं होतं नव्हतं, काय काय झालं वगैरे. आम्ही एकमेकींच्या साउंडिंग बोर्डही होतो, काहीही मोठा निर्णय घ्यायचा असला की घेण्याआधी चर्चा किंवा घेतल्यानंतर पहिली बातमी एकमेकींनाच असायची. पंधरा दिवसांत आमचं बोलणं झालं नव्हतं, मला लक्षात आल्यावरही मी तिला फोन करायला दोन दिवस लागले, कशात तरी गुंतलेली होते. सोमवारी संध्याकाळी फोन केला तर म्हणाली, मला जरा बरं नाहीये, अजिताने मला डाॅक्टरांच्या क्लिनिकमधनंच किडनॅप केलंय आणि तिच्या घरी आणलंय. ती आणि विहीणबाई दोघी माझी काळजी घेतायत. लॅपटाॅप आहे, मी या आठवड्यात घरनं काम करणारेय. नंतरचं पाहू. आवाज जरा बसला हाेता, पाच मिनिटंच बोललो, ती जरा थकल्यासारखी वाटलं बोलून. म्हणाली ठेवते, नंतर बोलू. आणि दोन दिवसांनी दुपारी दादाचा मेसेज ती गेल्याचा. </p><p>तीन दिवस झाले ती गेली त्याला. मन अजून सुन्नच आहे. परवा ग्राहकचं सामान येईल. मग मी तिला पुढच्या महिन्याची यादी पाठवायला फोन हातात घेईन, आणि खाडकन ताळ्यावर येईन. नेमकं या महिन्यात तिचं काहीच सामान नव्हतं, नाहीतर सोमवारी तो फोन झालाच असता की सामान आलंय, कधी येतेस न्यायला. किती तरी क्षण येतील जेव्हा तिची कडकडून आठवणा येईल आणि ती समोर नसेल. पण एक आहे की अशा शेकडो आठवणी माझ्याकडे आणि तिचा ज्यांच्याज्यांच्याशी संबंध आला त्यांच्याकडे आहेत. She lives on in those precious memories.</p>mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-79235366839387230672022-12-01T20:31:00.002+05:302022-12-01T21:01:41.008+05:30Me getting into IT at Fifty!<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLVNU2iXxyZb0SIywZCoSjlhkAaxxJ9YhlY2Q8xAmMLjFZiDgX3eq-eua_qnC3KTx2_FpFFeL26RxZVNS6mrIvUCFscaRsOlpz78Ml24sIzdxjifMdBTYu2G-65K3jYJl250Ao2ftVnfaBL5GUoU_dwSH8adRnjAYZISuNggpZSUOUf1bCvyz13N1_4A/s624/Infy.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="255" data-original-width="624" height="131" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLVNU2iXxyZb0SIywZCoSjlhkAaxxJ9YhlY2Q8xAmMLjFZiDgX3eq-eua_qnC3KTx2_FpFFeL26RxZVNS6mrIvUCFscaRsOlpz78Ml24sIzdxjifMdBTYu2G-65K3jYJl250Ao2ftVnfaBL5GUoU_dwSH8adRnjAYZISuNggpZSUOUf1bCvyz13N1_4A/w320-h131/Infy.jpg" width="320" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">HackWithInfy2022, Pune<br /><br /></td></tr></tbody></table>Being a journalist, I had never dreamt of a job with an IT major. Though I had nearly 3 decades of experience, it had not much to do with technology, apart from using computers for work. So, I was quite amused when I got a call from Infosys early this year. With the usual rounds of interviews and tests, I joined the prestigious Strategic Technology Group (STG) as a senior consultant mid-August. The amusement has turned into gratitude for various reasons.<br /><br />I was down with Covid during the onboarding days, but the recruitment team was super cooperative and the whole process was seamless, barring a few hiccups. This was my first experience of working with such a mammoth organization, though I had worked with big names like The Times of India, The Indian Express, and Dainik Bhaskar. Earlier, if I had an issue with my leave, I would just pick up the phone and speak to someone in HR and the problem was solved. Here in Infy, it’s all system driven, and I took a while to adjust to this. However, I don’t remember when I had to use that system last.<br /><br />I remember the first few weeks of the morning Stand Up meetings on Teams (not much has changed yet). I would jot down the words/terms/jargon that I didn’t understand and google them later. I could barely grasp what was being discussed by the Team leaders. And that led me into the fascinating world of Information Technology, Artificial Intelligence, data privacy/security/protection, crypto, NFTs, the whole digital jingbang! These meetings also reinstated my faith in an inclusive positive office culture, which had eluded me in some of my earlier jobs. There is never a voice raised, no foul language used, no backbiting, no blame games! The team leader gets full credit for creating and maintaining this culture which has certainly kept the team together and successful.<br /><br />Coming back to learning, I started doing short courses on LEX, and felt a childlike joy at completing them. I listened to a lot of webinars and enjoyed those. I read articles shared on the Infosys Knowledge Institute portal.<br /><br />I have started doing small assignments that were not too technical, but I realized that there was a lot I could contribute as a non-IT person.<br /><br />I am very much a people’s person. I have had great colleagues till now with whom I have enjoyed lunches, tea times, snack times, heated political discussions, meeting people from a variety of fields, traveling, etc. Because of the pandemic, I have been robbed of this opportunity. But only just. It won’t be the same even if I went to an ‘office’ every day as our team is spread all over India. And it’s a boon working from home, looking at the traffic scenes in Mumbai. I am learning to snatch a few moments of fun, camaraderie, the so-called water cooler talks, etc. in the virtual world. It helped that within two weeks of my joining, I had an opportunity to visit the sprawling Pune DC and stay at the fabulous ECC for 4 days and spend great time with some of my team members. I got to know at least some of the faces behind the names and that encourages me to ask someone for help without thinking twice.<br /><br />Joining Infosys has another important facet, that of my age! I have crossed 50, I don’t have an IT background, and yet I was accepted here. I know a lot of people raised their eyebrows when they learnt about it. Most were like, “Infosys, as in the IT company? What do you do there?” I totally understand that as I see women of my age, struggling to change jobs, finding something satisfying and fulfilling, being appreciated, being valued as an experienced employee, coming to terms with not being considered for promotions, etc. When the number of women employees has seen a sharp decline, I believe there is a design in me getting into Infosys. I want to make full use of this opportunity, learn as much as I can, give my 100 per cent to work, impact lives as much as possible. Amen.<br />mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com30tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-13502727831759943902022-03-23T21:22:00.004+05:302022-03-23T21:22:57.152+05:30बोडणाची आरती<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi58QePt_gVGPYPzkxotLNk0Zs8mvluXkZYTJgnvhX_37yfB45IRIrPNmkjtlnFV0AEvqueoQJOuMwxsLok7_UgoqACiqfli_XY-Xwn2Ox_6xf6nTht_0onhPuriQQLhkU1RKPNg801i0K9XPDDVsTlUTapp2lQd63QwZzOkv964SBi0nuhKcIYDyJ2gA/s1502/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1502" data-original-width="900" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi58QePt_gVGPYPzkxotLNk0Zs8mvluXkZYTJgnvhX_37yfB45IRIrPNmkjtlnFV0AEvqueoQJOuMwxsLok7_UgoqACiqfli_XY-Xwn2Ox_6xf6nTht_0onhPuriQQLhkU1RKPNg801i0K9XPDDVsTlUTapp2lQd63QwZzOkv964SBi0nuhKcIYDyJ2gA/s320/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80.jpeg" width="192" /></a></div><p>कुसुम गोखले, माझी माईमावशी. कोकणातल्या गणेश गुळ्यासारख्या छोट्या खेड्यातून मुंबई महानगरीत आलेली. ती फार शिकलेली नव्हती, पण अर्थातच तिन्ही मुलांना तिने खूप शिकवलं. आणि स्वत: शेवटपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिली. तिचं कुतूहल, नवीन गोष्टींबद्दलची उत्सुकता लहान मुलाच्या वरताण होती. या शिकण्याचं एक महत्त्वाचं माध्यम होतं रेडिओ. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तो सुरू असायचा. मी शाळेत असताना सुटीत तिच्याकडे आम्ही भाचरं राहायला जायचो. तेव्हाही तो कानावर पडत असे. आणि नंतर माझी चाळिशी उलटल्यानंतर माझं आॅफिस तिच्या घराच्या जवळ असल्याने मी अनेकदा तिच्याकडे जात असे, तेव्हाही तो सुरूच असे. तिच्या पिढीतल्या अनेकींप्रमाणे ती रूढीपरंपरा पाळणारी होती, पण परंपरांमध्ये जखडलेली नव्हती. आरत्या, ओव्या, अभंग, कविता, भावगीतं तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग होती. मग कधीतरी तिलाही काही सुचावं यात नवल ते काय. आज संध्याकाळी माझ्या एका भाचीला, काहीतरी आवरताना मावशीने केलेली ही बोडणाची आरती मिळाली. बोडण ही कोकणस्थ ब्राह्मण समाजात होणारी एक पूजा, किंवा प्रथा. सगळ्या कुटुंबात ही असतेच असं नाही. अनेक कुटुंबांत लग्न, मुंज, बाळाचा जन्म अशा शुभकार्यांनंतर बोडण घालण्याची पद्धत असते.</p><p>तर ही आहे तिने रचलेली बोडणाची आरती. यात बोडणात केल्या जाणाऱ्या काही कृतींचा समावेश अर्थातच आहे. याला चाल लवथवती विक्राळा आरतीची लागू शकते, किंवा एखाद्या नांदीचीही. (उदा. श्रीगणराय नर्तन करी)</p><p>बोडण भरू गं बोडण भरू। देवीचा उत्सव आनंदे करू</p><p>शुक्रवारी किंवा मंगळवारी । चार सुवासिनी एक कुमारी</p><p>तुळस पूजिली मागील दारी । साधली जर का अष्टमी धरू।।१।।</p><p>अन्नपूर्णा देवी बसे पराती । मंगल स्नानाला सुगंधी उटी ।</p><p>प्रथम पूजिला भावे गणपती । वाहू दूर्वांकुर नमन करू ।।२।।</p><p>सुवर्णालंकार बैठक लोड । नथ कुडी बिंदी पाटल्या जोड</p><p>नागमोडी वेणी गळ्यांत हार । शोभती तोरड्या वाजे घुंगरू ।।३।।</p><p>बेल दूर्वा पत्री फुले तुळस । धूप कापराचा सुटे सुवास</p><p>ताटी पंचामृत वाट्या ह्या पाच । हार डेरा केला दुधाने भरू ।।४।।</p><p>वडे घारग्यांचा नैवेद्य केला । पुरण खिरीचा बेत चांगला</p><p>पाच पाने वाढा भोवती ठेवा । वाजे घंटा झाली आरती सुरू ।।५।।</p><p>कुमारिका शोधी पैसा सुपारी । दहीदुधाची गं आवड भारी</p><p>विडा दक्षिणेची करा तयारी । वाहू हळदीकुंकू प्रार्थना करू ।।६।।</p><p>संध्येच्या पळीला सोनसाखळी । नमस्कार करा अंगारा भाळी</p><p>अंबेचा उत्सव हीच दिवाळी । आशीर्वाद देई मागणे करू ।।७।।</p>mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-82895439436743178402022-02-27T14:14:00.004+05:302022-02-27T14:18:46.955+05:30माय मराठी<div class="separator"><a href="https://www.blogger.com/#" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEieyA-tnE3_vrPO_-wTKUataxYgIZBBpSn44cpQHIVtMcVh2eVxm9sXaRZFXJYQKEaQCkSFajYenhD-YWzoYXSBWl4lAdtFobE7GinC5zeK8TTaa1EQib3LnfNm1mSfKXD2GdeyXAXj5C6ioFgMJWQQ9fGv1nH2N4o4uEO3cFB1OpgQdEkb5y3oHf1YvA=s320" /></a></div><div>मराठी भाषा दिनानिमित्त वेळोवेळी लिहिलेलं इथे एकत्र केलंय.<br /><br />माझा एक अमराठी मुंबईकर पत्रकार मित्र आहे. त्याने नुकतंच मुंबईतल्या एका भिंतीवर रंगवलेल्या फुलपाखराचे चित्र शेअर केलं आणि ओळी लिहिल्या - छान किती दिसते फुलपाखरू! मी त्याला म्हटलं, अरे, तुझ्याकडून हे आलं हे पाहून आनंद झाला. तर तो म्हणाला, महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकलेल्या कोणाच्याही मनात याच ओळी येतील हे चित्र पाहून.<br /><br />***<br />आज मराठी राजभाषा दिन. राज्यभर या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत, वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये याभाेवती गुंफलेले लेख, कविता प्रसिद्ध होत आहेत. व्हाॅट्सअॅप विद्यापीठातही यावर अनेक गमतीशीर धडे गिरवले जात आहेत. म्हणजे पाय या शब्दाला इंग्रजीत केवळ लेग म्हणतात, मराठीत मात्र वीसेक शब्द आहेत. किंवा उष्टं, खरकटं, बावळट या शब्दांना इंग्रजीत काय म्हणाल, असा सवाल केला जातो. किंवा ळ हे अक्षर कसं फक्त मराठी भाषेत आहे, वगैरे वगैरे. म्हणजे इंग्रजीत शब्द नाही म्हणून मराठी थोर, दुसऱ्या भाषेत ळ नाही म्हणून मराठी महान. काही तरी गडबड नाही वाटत यात? मुळात कोणतीही एकच भाषा मोठी, इतरांपेक्षा चांगली अशी भूमिका योग्य आहे का? भाषा किती संपन्न, समृद्ध, श्रीमंत, व्यापक, लवचिक, सामावून घेणारी आहे याची काही परिमाणं असू शकतात. आणि प्रत्येक भाषा तशी असतेच, ती ज्या संस्कृतीत, भौगोलिक प्रदेशात, कोणत्या काळात जन्माला येते यावर तिचा शब्दसंग्रह अवलंबून असतो. आपण इंग्रजीत लेग हा एकमेव शब्द असल्याबद्दल हसतो. पण मराठीत बर्फाला किती शब्द आहेत आणि एस्किमोंच्या भाषेत किती आहेत याची तुलना केली तर मराठी अगदी बापुडवाणी वाटेल. याच कारण आहे महाराष्ट्रात, जिथे मराठी उगम पावली, तिथे बर्फ सर्वसाधारणपणे पडत नाही. एस्किमोंचा भवताल बर्फानेच व्यापलेला आहे. त्यामुळे आपण असे विनोद करतो, तेव्हा त्यातून नक्की काय साधायचं असतं, याचा विचार केलेला बरा.<br /><br /><br />मराठी, इतर अनेक भाषांसारखीच, संपन्न आहे हे मात्र खरं. भाषा पाच कोसांवर बदलते म्हणतात, मग एवढ्या मोठ्या पसरलेल्या महाराष्ट्रात ती बदलत बदलत वेगळीच बोली होऊन जाणारच. पण तिचं मराठी मूळ काही हरवत नाही. युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी वसलेल्या मराठी लोकांची भाषा अनेकदा ‘शुद्ध’ वाटते, कारण ती फक्त घरात बोलली जाते, ती बोलणारी/ऐकणारी माणसं अगदी कमी असतात. त्यामुळे भाषेत वेगळा प्रयोग होण्याची, ती वाकण्याची (म्हणजे कोणासमोर खाली वाकण्याची नव्हे हं) शक्यता कमी उरते. आपण महाराष्ट्रात असलेले लोक एक प्रकारे नशीबवान. आपल्या भाषेवर किती वेगवेगळे संस्कार होतात पाहा. मुंबईतली मराठी इंग्रजी/हिंदीने पुरती बदलून गेलेली. नागपूरकडची हिंदीमय झालेली. सोलापूर/कोल्हापूर/औरंगाबादकडे कन्नड/तेलुगु/उर्दूचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पुण्यातही गेल्या काही दशकांत शिक्षण वा नोकरीसाठी भारतभरातून लोक येऊन स्थायिक होऊ लागले असल्याने पुण्यातली तथाकथित शुद्ध मराठी लोप पावू लागली आहे. यावरही गळे काढणारे लोक आहेतच. अर्थात आपण काही वेगळे नाही. जगभरात असे भाषेचे संरक्षक पसरलेले आहेत. त्यांना कुत्सितपणे ग्रामरनाझी म्हणजे व्याकरणराक्षस असं संबोधिलं जातं. असे लोक मराठीही आहेत. त्यांच्या दृष्टीने मी चहा प्यायले हे शुद्ध. मी चा पिली, मी चहा पिलो, मी चाय पिलो, वगैरे दिसलं की यांचं पित्त खवळतं. पण हे तिन्ही वाक्प्रयोग आणि इतरही, हे महाराष्ट्राच्या विविध भागांत नैसर्गिकपणे, सहजपणे होत आलेले आहेत, हे ते विसरतात. शुद्ध भाषा छापील पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांमध्ये वापरली जावी, ही अपेक्षा एक वेळ करावी, कारण प्रमाण भाषा असं काही असतंच, असावंच. ते अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. पण बोलताना हे नियम लावावेत का? आजकाल सोशल मीडियामध्ये देवनागरी टंकण्याचं, मराठीतून लिहिण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. तिथे मराठीचे इतके प्रकार वाचायला मिळतात की, अचंबा वाटतो. अशी भाषा ऐकायला तर अधिकच मजा येते, कारण बोलीनुसार शब्दांवरचे, अक्षरांवरचे जोर, हेल, उच्चार, वाक्यरचना सगळं बदलत असतं. म्हणूनच कोल्हापूरचा राणादा (तुझ्यात जीव रंगला), कोकणातला अण्णा (रात्रीस खेळ चाले), नागपूरची राधिका (माझ्या नवऱ्याची बायको) वेगळं मराठी बोलत असले तरी संपूर्ण राज्याचे आवडते आहेत. सध्या २०२२ मध्ये तर अनेक मराठी मालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमधली मराठी ऐकायला मिळते आहे. <br />पुढची पिढी, म्हणजे आता विशीच्या आत असलेली, मराठी फार बोलणार नाही, वाचणार नाही, लिहिणार तर नाहीच अशी भीती अनेकदा बोलून दाखवली जाते. (पण मराठी नाटक, चित्रपट, मालिका, जालमालिका यांचा प्रेक्षकही या वयाचाही आहे हेही लक्षात ठेवायला हवं.) ती किती अंशी खरी आहे हे आपण प्रत्येकाने आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नात्यातल्या मुलामुलींकडे पाहून ठरवावं. जर ती खरी आहे असं लक्षात आलं तर काय करता येईल? सामान्य माणसाच्या हातात काही आहे का करण्यासारखं? तर आपण आवर्जून मराठी बोलायला हवं. वाचायला हवं. लिहायलाही हवं. आता मोबाइलमध्ये वा संगणकावरही बोललेलं टंकण्याची सोय आहे, ती वापरून एखादी निरक्षर व्यक्तीही लंबाचौडा लेख लिहू शकते. ती वापरून तरी देवनागरी लिहा, म्हणजे ती वाचली जाईल. आपल्या नेहमीच्या वापरातले, आजीआजोबा हमखास वापरत असत असे शब्द वापरायला हवेत. आपलं स्वत:चं वर्तुळही मोठं करायला हवं, म्हणजे मराठीतलेच वेगवेगळे शब्द आपल्याही कानावर पडतील. सरकारने काय करायला हवं ते सरकार ठरवेल, आपण काय करायचं ते आपण ठरवू या.<br />आपण सगळ्यांनीच असं केलं तर काय बिशाद आहे मराठी नामशेष होण्याची, सांगा बरं!<br /><br /><br />***<br /><br /><br />मुंबईकर लहेजाची मराठी<br /><br /><br />मी अट्टल मुंबईकर. त्यामुळे माझी मराठीही मुंबईकर मराठी, नीरस, कुठलाही विशिष्ट लहजा, चढउतार नसलेली, सरळसोट. माझ्यावर कधीच बाहेरगावी जाऊन राहण्याची वेळ आली नाही, त्यामुळे या भाषेवर वेगळे संस्कार झालेच नाहीत, याची अतिशय खंत वाटते मला. लिखाणाची भाषाही तशीच, प्रमाण मराठी. इथे माधवी भट, बालाजी सुतार, श्रेणिक नरदे, प्रमोद चुंचूवार, आदि मंडळींच्या स्थानिक बोलीभाषेतल्या अतोनात गोड पोस्टी वाचून ही खंत अधिक जाणवत राहाते. मी त्यांची काॅपी करून लिहू शकते, पण ते फारच वरवरचं होईल. एक नक्की, फेसबुकवर या वेगवेगळ्या मराठीची ओळख झाली, हे भाग्यच.<br /><br /><br />***<br />श्रीमंत भाषा<br />जी भाषा लवचिक आहे, जी उदारमतवादी आहे, मोकळ्या मनाची आहे, नवीन स्वीकारण्यास उत्सुक आहे, ती भाषा निव्वळ टिकून राहाते असं नाही तर वाढतही जाते, संपन्न होते, असं म्हणतात. आणि मराठी या निकषांवर उत्तीर्ण होतेय, यात काही शंका नाही. कसं काय, असा प्रश्न पडलाय? मग जरा तरुण पिढीची भाषा ऐका. आंतरजालावर, व्हाॅट्सअॅप वा फेसबुकवर ते जी भाषा वापरतात ते वाचा. जितक्या सहज lol (laughing out loud) वापरतो आपण मेसेज करताना, तितकंच मराठी मंडळी हहपुवा (हसून हसून पुरेवाट) वापरतात बरं जालावर. Btw (by the way) हे आपण बोलण्यात आणि लिहिण्यातही नेहमी वापरतो. मराठीजन त्याला रच्याकने म्हणतात, म्हणजे रस्त्याच्या कडेने. आता हे शब्दश: भाषांतर असलं तरी तो एक मराठी शब्द तयार झाला आहेच ना? मराठी मध्यम वर्ग जो हल्ली बातम्या व लेखांचा विषय बनलेला आहे, तोही ममव असा ओळखला जातो. Irony म्हणजे उपरोध. काही उपरोधिक लिहायचं असलं की ‘आयरनीच्या देवा’ असं लिहिलं जातं. हे आणि इतर असे शब्द मराठी शब्दकोशात प्रवेश करणार नाहीत कदाचित. पण ते नव्याने तयार झालेले आहेत, भले कमी प्रमाणात असतील, पण वापरले जात आहेत हे नक्की. (सरकारी मराठी मात्र आपण सध्या बाजूला ठेवूया. कारण तिथेही नवीन शब्दच आहेत तयार केलेले, परंतु ते गेल्या अनेक वर्षांत भरपूर वापरले गेले असूनही रुळलेले नाहीत. अजिबातच.)<br />भाषा ही जिवंत गोष्ट आहे, ती आपल्यासारख्या जिवंत माणसांमुळे अस्तित्वात आलीय, राहणार आहे. त्यामुळे ती बोलत राहणं महत्त्वाचं. मराठीच्या शेकडो बोली आहेत, त्या बोलत राहणं, त्यात लिहायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. साेशल मीडियामुळे ही भाषा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांपर्यंत पोचते आहे. टीव्हीही त्यात आलाच. खासकरून कोल्हापूर परिसरात बोललं जाणारं ‘चालतंय की’ आता जगभरातल्या मराठी बोलणाऱ्यांकडनं वापरलं जातंच ना! आपण आपली भाषा बोलत राहू, लिहीत राहू, वाचत राहू, एवढंच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त सांगणं.</div>mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-33249558034889879762022-02-19T23:05:00.001+05:302022-02-20T10:18:21.515+05:30काळजीवाहू सरकार<div>३.३.२२</div><div><br /></div>घरात कोणी आजारी व्यक्ती असली की त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ लागतं. खासकरून रुग्ण व्यक्ती अंथरुणावरून उठू शकत नसेल तर. असं मनुष्यबळ प्रत्येक कुटुंबात पुरेसं असतंच असं नाही. अशा वेळी आपण व्यावसायिक मदत घेतो. आजकाल अनेक शहरांमध्ये अशी माणसं, ज्यांना केअरटेकर म्हणतात, पुरवणाऱ्या संस्था वा ब्युरो आहेत. <div>आमच्या घरी ७६ वर्षांच्या आजीसाठी नुकतीच अशी गरज पडली. आजी रुग्णालयात असतानाच हे कळलेलं होतं की ती घरी आल्यावर २४ तास केअरटेकरची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे मी ब्युराेंकडे चौकशा करून आजींना घरी कधी सोडतील याचा अंदाज देऊन ठेवला होता. </div><div>एक ब्युरो होता आजीकेअर, ठाणे. दुसरा होता कमलराज, घाटकोपर. आजी केअर १२ तासांचे ८०० ₹ तर कमलराज १२ तासांचे ६००₹ घेतात.</div><div>आजीकेअरबद्दल काही जणांनी चांगले अनुभव सांगितले होते त्यामुळे त्यांना आधी फाेन केला. त्यांनी दोन बायका आमच्यासाठी राखून ठेवल्या होत्या. त्यानुसार आजी २५ तारखेला रात्री घरी येणार हे कळल्यावर त्या रात्रीच आठ वाजता सुनंदा ही केअरटेकर हजर झाली. </div><div>तिने आजीला जेवायला घातलं, औषधं दिली, पाठीला मलम लावून दिलं. तिला झोपवून सुनंदा १० वाजता जेवली. तिने पोळीभाजी आणि पाण्याची बाटली आणलेली होती. मी तिला ताट, पाण्याचं भांडं दिलं. आपल्या घरात बसून कोणी डब्यातून जेवतंय आणि बाटलीने पाणी पितंय, हे मलाच रुचेना. त्यात ही आजीची काळजी घेणारी व्यक्ती. आजी ११ दिवस रुग्णालयात काढून, त्याच संध्याकाळी घरी आली होती. नक्की काय मदत लागेल, रुग्णालयात बेल वाजवली की नर्स किंवा डाॅक्टर उपलब्ध असतात तसं घरी नसतं. परंतु सुनंदाने आजीला आणि आम्हालाही विश्वास दिला की ती सांभाळून घेईल. आणि खरोखरच तिने तसं केलं. सुनंदा पुढच्या सात रात्री आजीला सांभाळायला आली. तिला तीन लहान मुलं होती, तिचा नवरा त्यांची रात्री काळजी घ्यायचा. त्याची चांगली नोकरी कोविडच्या काळात गेली होती आणि तो सध्या डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करत होता. ती दोनतीन वेळा फोन करून त्यांची खबरबात घेत असे. सुनंदानेच पुढेही काम करावं अशी आमची इच्छा होती. परंतु ती आमच्या घरी येण्याआधी ज्या रुग्णाची काळजी घेत होती त्या घरी तिला पुन्हा बोलावण्यात आलं आणि आमचा नाइलाज झाला. </div><div>मग ब्युरोने तिच्या जागी रेखा ही सेविका पाठवली. ती भिवंडीहून मुलुंडला येते. अंगणवाडी सेविका आहे. तीही आजीची उत्तम काळजी घेते. तिचं सगळं आवरून मगच जेवते. एक रात्री ती स्वयंपाकघरात बसून जेवत असताना मी काेथिंबीर निवडत होते तर म्हणाली, तुम्ही कशाला केलं, मी निवडली असती. नाहीतरी आजी झोपली की काहीच काम नसतं. आजी एखाद्या वेळी उठते फक्त रात्रीही. मग मी तिला मटार सोलायला दिले संध्याकाळीच आणलेले, ते तिने आजीशी गप्पा मारता मारता निवडून टाकले. आजी आता थोडा वेळ गप्पा मारण्याइतक्या बऱ्या झाल्या होत्या.<div>सकाळच्या बाईंचा थोडा गोंधळ झाला. आजीकेअरने मला ज्या बाईचे तपशील पाठवले होते ती २६च्या सकाळी आली तर नाहीच पण फोनही उचलेना. काय झालं होतं माहीत नाही पण तिच्याशी संस्थेचाही संपर्क होऊ शकला नाही. एरवी राखीव बाया असतात परंतु त्या दिवशी राखीव बाईलाही ताप आला, त्यामुळे ती येऊ शकली नाही. दुपारी चार वाजता संस्थेने मला कळवलं की त्यांच्याकडे १ तारखेपर्यंत बाई उपलब्ध नाही. मग मी दुसऱ्या ब्युरोच्या मांजरेकर बाईंना फोन केला. त्यांच्याशीही मी आधीच बाेलून ठेवलेलं होतं. त्यांनी दोन बाया ठरवलेल्या होत्या. मग दिवसासाठी हिराताईंना पाठवते, असं मांजरेकर बाई म्हणाल्या. या बाई घाटकाेपरच्या असल्फा परिसरात राहतात, घरनंच ब्युरो चालवतात. आजवर अनेकांना त्यांनी काम मिळवून दिलं आहे असं हिराताईंनी सांगितलं.</div></div><div>आजीकेअरच्या बायकांचे पैसे थोडे जास्त आहेत, कारण तो अधिक व्यावसायिक रीत्या चालवला जातो, त्यांचं स्वतंत्र आॅफिस आहे, वगैरे. त्यांचे पैसेही आजीकेअरच्या नावाने ट्रान्सफर करावे लागतात, आपण थेट बायांना द्यायचे नसतात. पण मांजरेकर बाईंच्या ब्युरोतल्या बायांना आपण थेट पैसे द्यायचे, त्या बायका बाईंना कमिशन घरी नेऊन देतात. आजीकेअरने मला बायांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि लसीकरण यांचे तपशील कळवले होते. मांजरेकर बाईंनी नाही कळवले तसे. पण त्यांचाही नंबर त्यांची सेवा घेतलेल्या व्यक्तीनेच दिलेला होता त्यामुळे मी निश्चिंत होते.</div><div>तर हिराताईंचा नंबर त्यांनी मला कळवला होता. त्यांनी मला आदल्या दिवशी फोनही केला होता. फोनवर बोलताना मला साधारण जाणवलं होतं की त्यांना इंग्रजी वाचता येत नसावं. म्हणून मी त्यांना घरचा पत्ता, बस मार्ग, बाकी तपशील देवनागरीत लिहून कळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मला एकही फोन करावा लागला नाही आणि त्या विनासायास घरी पोचल्या. हिराताई पन्नाशी नुकतीच ओलांडलेल्या. मूळ उस्मानाबादच्या, धनगर समाजातल्या. कमी वयात लग्न झालेल्या. हिराताई बडबड्या होत्या पण वचावचा बोलत नव्हत्या. त्यांनी सकाळी येऊन आजीचा जणू ताबाच घेतला. तिचं अंग पुसून दिलं, नाश्ता भरवला, औषधं दिली. मी चहा विचारला तर म्हणाल्या मला चहाची सवय नाही. दुपारी आजीची फिजिओथेरपी, जेवण, औषधं वगैरे आटपून आम्ही एकत्रच जेवायला बसलो. त्यांच्या डब्यात भाकरी आणि मेथीची भाजी होती. त्यांनी आम्हाला अर्धी अर्धी भाकरी खायलाच लावली. मीही त्यांच्यासाठी वरणभात टाकलाच होता. गप्पा मारत आम्ही मस्त जेवलो. दुसऱ्या दिवशी त्या माझ्यासाठी म्हणून दोन भाकरी घेऊन आल्या. आणि जेवायला बसलो तेव्हा म्हणाल्या, भाकरी उगीच करून आणल्या, उद्या पीठच आणते, गरम भाकरी करून घालते. आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्या दोनेक किलो पीठ घेऊन आल्या. आजीलाही हळूहळू भूक लागू लागली होती, मग आजीला भाकरी करून दिली त्यातली.</div><div>एक दिवस त्या घरी केलेल्या शेवया घेऊन आल्या. आमच्या वेगळ्या असतात, तुम्ही खाऊन बघाच, असा हट्टच त्यांनी धरला होता. मला त्यावर काही बोलता आलं नाही. त्यांना आमच्या घरची आमटी आवडली फार. त्यांनी एक दिवस आणलेली भरली वांगी फारच भारी होती, मी एक दिवस तशी करायचा प्रयत्न नक्की करणार आहे.</div><div>हिराताईंनी काही वर्षं एका आॅर्थोपेडिक डाॅक्टरच्या दवाखान्यात काम केलं होतं त्यामुळे त्यांना फिजिओथेरपीचा थोडा अनुभव होता. आजीला कसं चालवायचं, किती आधार द्यायचा याचा त्यांना चांगला अंदाज होता. त्या खूप प्रेमाने तिचंही करत होत्या. मलाही स्वयंपाकघरात मदत हवी का, भाजी निवडू का, सतत विचारत असायच्या. सहासात दिवसांनी त्यांना गावाहून फोन आला की कोणीतरी वारलं. मग भावकीत असं करावं लागतं सांगत त्या गावी चालल्या. मी मांजरेकर बाईंना फोन करून दुसऱ्या बाईची सोय करवली, हिराताईंचे पैसे दिले, आणि निरोप दिला. हिराताई धीराच्या असाव्यात असं त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टींवरनं वाटलं. गोष्टी खऱ्याखोट्या माहीत नाही अर्थात, ती शहानिशा करणं मला शक्य नाही. एक म्हणजे त्यांचा मुलगा मनोरुग्ण झाला हाेता काही वर्षांपूर्वी. नातलगांनी त्याला येरवड्याला न्या असा सल्ला दिला. पण ताईंच्या डोक्यात एक गोष्ट फिट्ट असावी, येरवडा म्हणजे इलेक्ट्रिक शाॅक. आणि शाॅकमुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यांनी पाच वर्षं त्याला सांभाळलं, अनेक डाॅक्टर केले आणि तो बरा झाला. आज तो चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांची सून मुलीला जन्म दिल्यानंतर न्यूमोनिया होऊन दहाव्या दिवशी मरण पावली, तिच्या आईकडे होती तेव्हा अर्थात. पण हिराताईंनी त्या लहानगीला मुंबईला आपल्या घरी आणलं आणि त्या तिला प्रेमाने वाढवतायत. मुलगा असता तर ही गोष्ट कोणीही केली असती पण मुलगी असून केली याचं मला कौतुक वाटलं. त्या चौथी शिकल्या आहेत, मुंबईतल्या पालिकेच्या शाळेत. "मी आजवर कधी रस्ता चुकले नाही की एखादं घर मला सापडलं नाही असं झालेलं नाही कारण आपलं तोंड एरवी कशासाठी वापरायचं मग," असं त्या म्हणाल्या. ट्रेन पकडताना पण त्या रोज कोणाला विचारतात, ही ट्रेन घाटकोपरला जाते ना. म्हणाल्या, विचारलं तर कोण काय बाेलतंय आपल्याला, आहाेत अडाणी ठीकेय, की मग. </div><div>हिराताई आजीशी बोलताना म्हणाल्या, मला जात्यावरच्या ओव्या खूप येतात. माझ्या मामीने अशा पाचशेहून अधिक ओव्या जमा केल्या आहेत आणि ती त्याचा कार्यक्रमही करते. त्यामुळे मला यात रस वाटला, म्हटलं तुमच्या ओव्या एक दिवस रेकाॅर्ड करू. मग दुसऱ्या दिवशी मला म्हणाल्या, रेकाॅर्ड करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी सांगा, चांगली साडी नेसून येईन. मग अचानक त्यांना गावी जायला लागलं. जायच्या आधी म्हणाल्या, दीदी, रेकाॅर्ड करायचं राहिलं आहे, मुद्दाम येईन त्यासाठी.</div><div><br /></div><div>५.२.२२</div><div><br /></div><div>काल सकाळी नवीन बाई आल्या. त्यांचं नाव अंजनाबाई. या साठी ओलांडलेल्या आहेत पण खुटखुटीत आहेत. दुपारी जेवताना गप्पा मारताना कळलं की त्या हाॅलिडे इन हाॅटेलमध्ये पोळ्या करायच्या कामावर होत्या. तिथनं निवृत्त झाल्या, काही दिवस घरी बसल्या. पण मग काहीतरी दुखतंय खुपतंय असं वाटायला लागलं. शांत बसणं जमेना. मग हे काम सुरू केलं. कंबर दुखायची म्हणुन डाॅक्टरने आॅपरेशन करायला सांगितलं होतं, कामाला सुरुवात केल्यावर कंबरदुखी गायब. त्यांचे वडील सैन्यात होते, त्यांनी छिंदवाड्यात घर केलं. त्यामुळे यांचं लहानपण तिथे, शाळा हिंदी माध्यमाची. मराठी वाचता येत नाही नीट म्हणाल्या, काहीकाही अक्षरं वेगळी असतात. मग आमची आजी हिंदी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली सांगितल्यावर खूष झाल्या. मुख्य म्हणजे आजीला नवीन बाई कशा असतील याचं टेन्शन होतं, ते दूर झालं.</div><div><br /></div><div>१९.२.२२</div><div>दोन्ही बाई चांगल्याच रुळल्या, आमच्या आजींचंही नीट जमलं त्यांच्याशी. अंजनाबाई प्रेमाने आईशी बोलायच्या, औषधं, जेवण, अंग पुसणं, व्यायाम, सगळं नीट करायच्या. रात्री यायची ती गौरी तर उत्साहाचा झरा. आल्या आल्या, आई, मी आलेय. कशी आहेस तू? अशी हसऱ्या चेहऱ्याने विचारणा करायची. रात्रीचं जेवण, औषध, तेल लावून देणं, मच्छरदाणी लावून तिला झोपवणं सगळं मनापासून करायची. आई झोपली की मग जेवायची. सकाळी पण घरी जायची घाई नसायची तिला. दिवसाच्या बाई आल्यानंतरच ती निघायची.</div><div><br /></div><div>आजीची पाठदुखी थोडी कमी झाली होती पण उजवा पाय प्रचंड दुखायला लागला होता. पायावर सूज आली होती. एकदा वेदना सुरू झाल्या की दोनेक तास तर उतारच पडायचा नाही. या दोघी मदतनीस तेव्हा हर प्रकारे आजीचं दु:ख कमी करायचे प्रयत्न करायच्या. ती रडत असली तर ओरडायच्या. रडू नकोस, रडण्याने आणखी दुखेल. आपण हे करू, ते करू, असं समजवायच्या. मग ते दुखणं वाढलं आणि आजीला पुन्हा रुग्णालयात भरती करावं लागलं. एका सकाळी सोनोग्राफीसाठी नेलं तर अंजनाबाई सोबत आल्याच. त्यांची मला तिथे खूप मदत झाली. पण मग आजीला पुन्हा भरती करावं लागल्याने या दोघींना तात्पुरती रजा दिली. आता पुढच्या आठवड्यात आजी घरी आली की ठरवू.</div><div><br /></div><div>माझ्यासाठी हा असा अनुभव पहिलाच होता. सांभाळणाऱ्या बाई लागणार हे निश्चित होतं. आणि १२ तासांच्या दोन की २४ तास घरीच राहणारी एक असे दोन पर्याय होते. २४ तास राहणाऱ्या बाईसाठी पैसे कमी माेजावे लागतात. पण तिचं आंघोळ, कपडे धुणं, जेवणखाण सगळंच आपल्या घरी होतं. १२ तासांची बाई जेवणाचा डबा घेऊन येते, तिची आंघोळ तिच्या घरी करून येते. अर्थात चहा, नाश्ता तिचाही होतोच. मला दोघींचा पर्याय आवडला म्हणून दोघी ठेवल्या. ब्यूरोतून बाई येत असेल तर एखाद्या दिवशी सुटी घेतली तर तिच्या ऐवजी बदली बाईही मिळतेच. त्यामुळे सहसा प्रश्न येत नाही. अर्थात कोणता पर्याय निवडायचा ते आपलं आपण ठरवायला हवं.</div><div><br /></div><div>दुपारच्या बाई आमच्याबरोबरच जेवायला बसायच्या. त्यांची पोळीभाजी असायची. वरणभात आम्ही गरम आमच्यासाठी लावायचो त्यातला त्याही जेवायच्या. तसं तर दोघींनाही भाताची सवयच नव्हती. अंजनाबाईही एक दिवस आजीला मीठ खायचं जास्त म्हणून घरी केलेले बटाटा वेफर्स आणि सांडगे घेऊन आल्या. आजीला आम्ही रोज शहाळ्याचं पाणी देत होतो. एक दिवस त्यांनी विचारलं की शहाळं कितीला आणता? म्हटलं, साठ रुपये. तर म्हणाल्या, आमच्या इथे गाडी असते तिथे शंभरला तीन मिळतात, आणू का? मी कशाला नाही म्हणतेय, होच म्हटलं. मग त्यांनी तीनदा आणली शहाळी. तीन शहाळी तशी जडच होतात, पण ट्रेनमधनं त्यांनी आणली खरी.</div><div><br /></div><div>घरी मदतनीस बाया येत आहेत हे कळल्यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. अनेकांना खूप वाईट अनुभव आलेले होते. पण आम्हाला चांगलेच आले हे निश्चित. मी आईला त्यांच्यावर सोपवून निश्चिंत होते. थोडीफार का होईना, माझी कामं मला करता येत होती. याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. आणि त्या हे काम निव्वळ कर्तव्य पार पाडतोय या भावनेने करत नव्हत्या, तसं करत असत्या तरी त्यात तक्रार करण्याजोगं काही नव्हतं. पण त्यांनी जीव लावला होता. सगळीकडेच लावत असतील कदाचित, कदाचित नाहीदेखील. आजीचं आॅपरेशन नीट झालं, ती बरी आहे असा मेसेज मी काल रात्री अकरानंतर अंजनाबाई आणि गौरी दोघींना केला. अंजनाबाईंचा लगेच फोन आला, मी वाटच बघत होते तुमच्या मेसेजची, बरं झालं कळवलंत. गौरीचंही लगेच उत्तर आलं. मला याचं अप्रूप वाटतं.</div><div><br /></div><div>आजारी व्यक्तीची सेवा हे फार कठीण काम आहे असं मला वाटतं. त्या व्यक्तीची मानसिक स्थितीही अनेकदा फारशी चांगली नसते. ती व्यक्ती चिडून काहीही बोलते, असहकार पुकारते, तिला चुचकारून लहान मुलासारखं बाबापुता करून खाऊ घालणं, स्वच्छता ठेवणं हे काम सगळ्यांना जमण्यासारखं नाही. अगदी कितीही पैसे मिळत असेल तरी. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो. आणि असे ब्युरो जे चालवतात त्यांचंही कौतुक वाटतं. कारण त्यात मोठी जबाबदारी आहे. ती जे झेपवतात त्यांच्याबद्दल आदर, काैतुक सगळंच. </div><div><br /></div><div>हे सगळं फार बालिश, वरवरचं, थोड्या अनुभवावर आधारित, naive असं वाटू शकतं अनेकांना, कारण याच्या उलटे अनुभवही येतच असतात, ऐकिवात आहेत. पण हा माझा अनुभव आहे, आणि तो मांडावासा वाटला.</div><div> </div>mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-88192864217971645812019-05-13T20:21:00.001+05:302019-05-13T20:26:28.219+05:30माझा प्रवास फेस्टिवल<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTPZiAiH6OTjmerld0EktO0CMldzpmosaFWzDJx2SJ9mUQ-eE9hudYOIstBwRc-d3FNJTRwL0YMThuQeMSqjm2Wid2DN1u24VZlTVD8tTa-30OdS38Ra2mNlMDJ-E7YgDHoceI12snTv9k/s1600/IMG_20190125_135441675.jpg" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTPZiAiH6OTjmerld0EktO0CMldzpmosaFWzDJx2SJ9mUQ-eE9hudYOIstBwRc-d3FNJTRwL0YMThuQeMSqjm2Wid2DN1u24VZlTVD8tTa-30OdS38Ra2mNlMDJ-E7YgDHoceI12snTv9k/s320/IMG_20190125_135441675.jpg" /></a><br />
मला लहानपणापासून प्रवासाची आवड होती का, हे नक्की सांगता येणार नाही. पण आता गेली काही वर्षं आवडतो, हे निश्चित. एकटीने अधिकच. पत्रकार असल्याने कामाच्या निमित्ताने तशी संधीही मिळते. लिटरेचर फेस्टिवलच्या निमित्ताने जयपूरला पाच वेळा जाणं झालं. २०१२मध्ये सर्वप्रथम मी या फेस्टिवलचे वार्तांकन करण्यासाठी गेले. ट्रेनचा १८ तासांचा काहीसा कंटाळवाणा प्रवास आहे हा. त्यातली गंमत म्हणजे सवाई माधोपूर स्थानकातून ट्रेन मागे येते मग दुसऱ्या दिशेने जयपूरकडे निघते. या स्थानकात उतरले होते पूर्वी, रणथंभोर जंगलाच्या सफारीसाठी आले होते तेव्हा. या स्थानकात गाडी शिरते त्याच्या काही मिनिटं आधी डावीकडे एक जुनाट पण आकर्षक बांधकाम दिसतं. चित्रपटगृह आहे ते. प्रकाश नावाचं. मला ते फार आवडलं पाहताक्षणी. पण तेव्हा फोटो नाही घेता आले. परतीच्या प्रवासात मला वाटतं रात्र होती, त्यामुळे फोटो नाही घेता अाले. मग पुढच्या वर्षी मी पुन्हा फेस्टिवलसाठी गेले तेव्हा, सवाई माधोपूर यायची वेळ झाली तेव्हा कॅमेरा हातात घेऊन दारात उभी राहिले. टीटीई होता दारात, त्याने विचारलं, क्या चाहिए? म्हटलं, ‘वो थिएटर की फोटो लेनी है, पिछले साल से इंतजार कर रही हूँ।’ तर त्याला अगदी आठवणींचे कढच आले. म्हणाला, ‘हे माझ्या मित्राच्या वडलांच्या मालकीचं. शाळाकाॅलेजात असताना कित्येक सिनेमे पाहिलेत इथे.’<br /><br />जयपूरला पोचले. फेस्टिवलचं ते पाचवं वर्ष असेल. थंडी होती बऱ्यापैकी, जन्माने आणि कर्माने मुंबईकर असलेल्या मला जरा वैतागवाणीच ती. जे काही जुनापुराणं स्वेटर, शाल होतं ते फारसं पुरेसं पडत नव्हतं. दिवस संपल्यावर रिक्षाने हाॅटेलवर परत जाताना तर बर्फ व्हायचा माझा. मग रूमवर जायचं, गरम सूप मागवायचं, आणि ब्लँकेटमध्ये स्वत:ला गुंडाळून बातमी पाठवायला लॅपटाॅप उघडायचा.<br /><br />जयपूर लिटरेचर फेस्टिवल डिग्गी पॅलेस या प्रशस्त हवेलीच्या परिसरात आयोजित केला जातो, अगदी पहिल्या वेळेपासून. दोन बंदिस्त सभागृहं आणि मैदानांवर मांडव घालून तयार केलेली चार अशा सहा ठिकाणी पाच दिवसांत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात एकेक तासाची सत्रं होतात. यंदा १८५ सत्रांमधनं जवळपास ५०० लेखक/वक्ते सहभागी झाले होते. या फेस्टिवलमधली बहुतेक सगळी सत्रं एखाद्या नवीन आलेल्या पुस्तकाच्या भोवती गुंफलेली असतात. यात अनेक विषय असतात, निव्वळ साहित्यिक मूल्य असलेल्या कादंबऱ्या, कवितासंग्रह असतातच, परंतु नाॅन फिक्शन प्रकारातली पुस्तकं जास्त असतात. त्यात राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांच्याविषयीची पुस्तकं असतात. उदा. यंदा झालेल्या काही सत्रांचे विषय होते - ब्रेक्झिट, अनुवादाचं कौशल्य, लेखन कसं करावं, स्त्रीवाद, जेंडर, पुराणं, इजिप्त, हिंदुत्व, इतिहास, हवामानातला बदल, वगैरे. या सत्रांमध्ये पुस्तकांचे लेखक, राजकीय नेते, कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक सहभागी झाले होते. यंदा ज्या पुस्तकांवर चर्चा झाल्या, त्यातली काही अशी होती - The sixth string नमिता देवीदयाळ, Gene machine - The Race to Decipher the Secrets of the Ribosome डाॅ. वेंकी रामकृष्णन, Shyam an illustrated retelling of the bhagavata देवदत्त पटनायक, Newsman: Tracking India in the Modi Era राजदीप सरदेसाई, Healed: How Cancer Gave Me a New Life मनीषा कोईराला, Poonachi पेरुमल मुरुगन, Not quite not white शर्मिला सेन, Daughters of the Sun: Empresses, Queens and Begums of the Mughal Empire इरा मुखोटी, Jahangir: An Intimate Portrait of a Great Mughal पार्वती शर्मा, after trainspotting आयर्विन वेल्श, Empire Of Cotton: A Global History स्वेन बेकर्ट, इ.<br /><br />यावरनं विषयांच्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो. तसंच यातली बरीच पुस्तकं ही ललित साहित्य या प्रकारात मोडणारी नाहीत, हेही कळून येतं, अपवाद मुरुगन यांच्या पूनाची या कादंबरीचा. या पुस्तकाविषयीच्या सत्रात मुरुगन स्वत:, त्यांचे अनुवादक, आणि प्रकाशकही सहभागी झाले होते. मुरुगन तामिळमधूनच बोलत होते. प्रेक्षकांमध्ये तामिळ लोक होते कारण त्यांच्या बोलण्यानंतर अनुवादक बोलण्यापूर्वीही टाळ्या पडत होत्या किंवा हशा येत होता. प्रकाशकाला चर्चेत सहभागी करून घेण्याची कल्पना आवडली कारण अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशकाची भूमिका एरवी माझ्यापर्यंत पोचणं कठीणच. <br /><br />यंदा हिंदीत काही सत्रं होती, राजस्थानी साहित्याविषयीची एकदोन. तामिळ लेखिका सलमा याही तामिळमधूनच बोलल्या, मनोरंजन ब्यापारी बंगालीतून बोलले. कन्नड लेखक जयंत कैकिणी यांची मुलाखत होती. पण बाकी भारतीय भाषांना स्थान नव्हतं. हिंदीतही गुलजार, जावेद अख्तर, उदय प्रकाश ही नेहमीची यशस्वी नावं अधिक. मी गेले होते तेव्हा एका वर्षी भालचंद्र नेमाडे यांची कोसलाच्या इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने मल्याळी लेखक जीत थयिल यांनी मुलाखत घेतली होती, एका वर्षी ऊर्मिला पवार यांचा आयदानच्या निमित्ताने सत्रात सहभाग होता. <br /><br />भारतीय भाषांना स्थान देणारा फेस्टिवल हवा आणि व्यापारीकरण नको अशा भूमिकेतून जयपूरमध्येच समानांतर साहित्य उत्सव गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे. विद्रोही साहित्य संमेलनासारखाच हा उपक्रम, परंतु सध्या तरी फारसा प्रतिसाद नसलेला. आम्ही मुद्दाम तिथे चक्कर मारली पण फारसे प्रेक्षक नव्हते आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच वक्ते बोलत होते. यात एकदोन मराठीतही सत्रं होती, असं उपक्रमाच्या वेबसाइटवरनं कळलं. यामागची थोडी कथा एका पत्रकाराने सांगितली. कन्हय्यालाल सेठिया हे राजस्थानातलं साहित्यातलं मोठं नाव. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही करावं असं काही साहित्यिकांसमोर बोलून दाखवलं. त्यासाठी त्यांच्या गावात काही करावं असा प्रस्ताव होता. परंतु ते गाव जयपूरपासून फार दूर असल्याने तिथे जाण्याऐवजी जयपुरात हा उत्सव सुरू झाला. कदाचित आणखी काही वर्षांनी त्यालाही जेएलएफसारखी गर्दी होईल. (पण जेएलएफमध्ये भारतीय भाषांना अधिक स्थान हवंच, ही मागणी का करावी, हे पटलं नाही. हा काही सरकारी उपक्रम नाही, तो एक खाजगी कार्यक्रम आहे. असो.)<br /> <br /><br /><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEYH2PQHzFAroSn-OhAMjW3M8T3nfour0ScxSjKF3CO7WfXtUfx5W88VhdBJgKB-CJqqr3srk3v8Oq6Jj4lBe5gJ9ks-TXQ05iyuO8uk5ZJsAaOthFL3ci2NE-g3Hs79fywNTKMy1M69n5/s1600/IMG_20190126_105830125.jpg"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEYH2PQHzFAroSn-OhAMjW3M8T3nfour0ScxSjKF3CO7WfXtUfx5W88VhdBJgKB-CJqqr3srk3v8Oq6Jj4lBe5gJ9ks-TXQ05iyuO8uk5ZJsAaOthFL3ci2NE-g3Hs79fywNTKMy1M69n5/s320/IMG_20190126_105830125.jpg" /></a> <br /><br /><br />डाॅ. वेंकी यांच्याबरोबर काढलेला सेल्फी <br /><br />तर, फेस्टिवल सतत एकाच ठिकाणी होत असल्याने अनुभवाचा, चुकांमधून शिकण्याचा फायदा निश्चितपणे हाेतो. तो तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला जाणवतोच. यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागतं, मदतनीस म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवले जातात आणि अनेक विद्यार्थी हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. या विद्यार्थ्यांचा संबंध साहित्याची असतोच असं नाही. पण तरीही कामाच्या निमित्ताने मोठमोठ्या व्यक्तींना भेटता येतं, हे त्यांना मोलाचं वाटतं. या सगळ्यासाठी, लेखक/वक्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पैसा लागतो आणि तो प्रायोजकांच्या मार्फत येतो. झी काही वर्षांपासून मुख्य प्रायोजक आहेत व फेस्टिवल झीजेएलएफ या नावानेच ओळखला जातोय सध्या. बाकी गूगल, दैनिक भास्कर, राजस्थान पत्रिका, मातृभूमी, ब्रिटिश कौन्सिल, डेल, आदि अनेक प्रायोजक आहेत. काही सभागृहांना प्रायोजकांची नावं देण्यात येतात. किंवा काही सत्रांमध्ये प्रायोजकाचं नाव पडद्यावर दिसतं. अन्यथा सतत या नावांचा मारा प्रेक्षकांवर होत नाही, जाहिरातबाजी होत नाही, ते फार नजाकतीने subtly केलं जातं. एकाच ठिकाणी फेस्टिवल होत असल्याने काय कुठे असणार, ते नव्याने ठरवण्याची गरज भासत नाही, फक्त त्यात काही सुधारणा हवी असल्यास त्या करण्यासाठी वर्षभर वेळ असतो. एक फेस्टिवल संपताना पुढच्या वर्षीच्या तारखाही जाहीर केल्या जातात, इतकं जबरदस्त नियोजन केलेलं असतं. फेस्टिवल टीमवर्क आर्ट्स या कंपनीतर्फे आयोजत केला जातो. ही कंपनी भारताबाहेरही असे फेस्टिवल व इतर कार्यक्रम आयोजित करत असते. हे सगळं आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेजारी मांडलं तर कुठे गडबड होतेय ते सहज स्पष्ट होतं. टीमवर्कचे सर्वेसर्वा संजय राॅय यांच्याशी मी मुद्दाम या विषयासंबंधी बोलले, तेव्हा त्यांनी हे मुद्दे मांडले. एकच ठिकाण आणि आगाऊ उत्तम नियोजन आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. पैसा आमच्याकडेही सुरुवातीला नव्हताच, असं ते म्हणाले.<br /><br />तर पहिल्या वेळची गोष्ट. सकाळी डिग्गी पॅलेसला पोचले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर असा एखादा कार्यक्रम पाहात होते. आधी ओळखपत्र गळ्यात घातलं, फेस्टिवलमध्ये कुठेही फिरण्याची मुभा त्याच्यामुळे मिळणार होती. मग हातात घेतलं आडवीच्या आडवी पसरलेली कार्यक्रमपत्रिका. पाच दिवसांचे कार्यक्रम त्यात होते, तेही एका वेळी पाच किंवा सहा सत्रं. त्यामुळे किती वाजता काय आहे, काय नक्की ऐकायचंय, हे ठरवणं हा मोठाच कार्यक्रम असतो. अनेकदा असं होतं की एकाच वेळी दोन किंवा तीन कार्यक्रम अगदी ऐकावेच असे असतात, मग ठरवणं फार कठीण होऊन जातं. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला ही पत्रिका दिली जाते, त्यामुळे वेळोवेळी हा कागद उलगडून त्यात डोकं घालून बसलेले खूप लोक दिसतात.<br /><br />मी आतापर्यंत चार वर्षं हाॅटेलमध्ये राहिले होते तिथे. यंदा होमस्टे हा पर्याय शोधायचं ठरवलं. नुकतीच माझी लेक पुदुचेरीला गेली होती solo trip वर, ती अशी राहिली होती. तिला ते फार आवडलं होतं. मग तिच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू केली. लेकीकडनं super host ही संकल्पना एेकली होती. म्हणजे या यजमानांकडे सोय उत्तम असते, सुरक्षित असतं, आणि तक्रारी सहसा नसतात. मग मी एक्स्प्लोरर्स नेस्ट हे ठिकाण निवडलं. त्याचा यजमान, सुपरहोस्ट, सैन्यातला माजी अधिकारी आहे, दहाएक वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडून हे सुरू केलंय. मी त्याला काही प्रश्न विचारले, त्याने माझी माहिती घेतली. फोटो छान दिसत होते. सोयीही चांगल्या होत्या. आणि खिशाला परवडणारं होतं. मग त्याच्याकडे राहण्याचं निश्चित केलं.<br /><br />पोचलो तर बंगल्यांची निवांत काॅलनी. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना. भरपूर झाडं. गेल्या गेल्या मोठी गॅलरी किंवा छोटी गच्ची. त्यात टेबलखुर्च्या. समोर एक खोली. उजव्या हाताला जुन्या हवेलीचा असावा असा लाकडी दरवाजा. आत गेल्यावर पन्नासेक वर्षं मागे गेल्यासारखं वाटलं. दिवाणखाना जुन्यापुराण्या वस्तूंनी भरून गेलेला. वेगवेगळे टेलिफोन, ट्रान्झिस्टर्स, कपाटं, चिलखत, आणि चक्क एक ग्रामोफोन, तोच तो एचएमव्हीच्या जाहिरातीत दिसतो तसा. या धक्क्यातून सावरत आत गेलो, डाव्या हाताला छोटं स्वयंपाकघर, जेवणाचं टेबल, उजव्या हाताला एक खोली. आणखी आत गेलो तर रिकामा चौक आणि उजवीकडे आमची खोली. छोटीशीच पण नेटकी, स्वच्छ. सामान ठेवलं, आणि चहा सांगितला तिथल्या मदतनीसाला. हे होते विष्णूजी, नेपाळी, साठीचे असावेत. मोजकं बोलणारे. काहीही सांगितलं की जी, इतकंच उत्तर. चहा घेत होतो तो यजमान आले, अरविंद ग्रोव्हर. ५५ ते ६०च्या दरम्यानचे असतील. गुरखे घालतात तशी उंच टोपी, कोट वगैरे जामानिमा कारण प्रचंड थंडी होती. अरविंदजी सैन्याच्या वाहतूक विभागात होते. बराच भारत फिरलेले. अशाच एका प्रवासात तो भरभक्कम दरवाजा त्यांना मिळाला होता. पाच हट्टेकट्टे सैनिक तो उचलायला लागले होते, इतकं त्याचं वजन आहे.<br /><br /><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwdxHtQyfycgcm1UuCmPuWMd0wuwZ6jipkEJlky2n54d2IIyr9W-dyjk4zg62OkPVUFSa4xZZlzOPgDjoSBrI5ot5hI4gZQqaGBhS0wpmA8EN0rtN3AtbYWKVGvpHD8LSBNx0iGM7ex742/s1600/IMG_20190124_114251028_HDR.jpg"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwdxHtQyfycgcm1UuCmPuWMd0wuwZ6jipkEJlky2n54d2IIyr9W-dyjk4zg62OkPVUFSa4xZZlzOPgDjoSBrI5ot5hI4gZQqaGBhS0wpmA8EN0rtN3AtbYWKVGvpHD8LSBNx0iGM7ex742/s320/IMG_20190124_114251028_HDR.jpg" /></a> <br /><br /><br />चार्ल्स डार्विन यांची खापरखापरपणती डाॅ. रूथ पडेल <br /><br />फेस्टिवलची वारी सुरू झाली.<br /><br />दुसरा दिवस असेल. मीडिया गॅलरीत बसून बातमी लिहीत असताना टेबलावर सॅक धप्पकन टाकून शेजारच्या खुर्चीवर एक मुलगी येऊन बसली, आणि 'ईश्वर!' असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला. 'क्यों ईश्वर को याद कर रही हो?' असं विचारल्यावर म्हणाली, 'अब इतनी भागदौड करने के बाद बैठने मिला है, तो ईश्वर को ही याद करूँगी ना?'<br /><br /><br />'कौन से पेपर के लिए लिख रही हो?'<br /><br /><br />'मैं ब्लाॅगर हूँ फेस्टिवल के ब्लाॅग लिखती हूँ।’<br /><br /><br />फेस्टिवलमध्ये होणाऱ्या सत्रांविषयी ब्लाॅग लिहिण्यासाठी स्पर्धा घेऊन सहा जणांना ब्लाॅगर म्हणून निवडण्यात येतं. त्यात ही निवडली गेली. सत्र संपलं की विशिष्ट वेळाच्या आत ब्लाॅग लिहून फेस्टिवलच्या वेबसाइटवर टाकण्याचं बंधन या ब्लाॅगर्सवर असतं. <br /><br />तिसरा दिवस. विख्यात तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची मुलाखत झाल्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू होती. सतराअठरा वर्षांची वाटावी अशा मुलीने त्यांना प्रश्न विचारला, 'इंग्रजी साहित्य आणि बाकीच्या भाषांमधलं (other or regional) साहित्य असा उल्लेख सर्रास केला जातो, तर भारतीय भाषांना बाकीच्या असं म्हणण्याबद्दल काय वाटतं?' लेखक हसले आणि त्यांनी सांगितलं, 'भारतभूमीत निर्माण होणाऱ्या सर्व साहित्याला भारतीय साहित्यच म्हणायला हवं.' प्रश्न वरवरचा नव्हता, त्यामागे काही विचार होता, म्हणून लक्षात राहिला. यानंतर काही तासांनी ती मुलगी चहा पिताना शेजारीच होती असं जाणवल्यावर तिच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही. 'तुझा प्रश्न चांगला होता, काय करतेस तू?' ती फेस्टिवलला आली होती ब्लाॅगर म्हणून. इंग्रजी साहित्य विषय घेऊन दिल्लीच्या लेडी श्रीराम काॅलेजमधून बीए झाली. पुढच्याच महिन्यात ती जपानला जातेय, जपानी भाषाशास्त्र शिकायला. तिचं नाव स्वस्तिका जाजू. वय वर्षं २१. स्वस्तिका इंग्रजीतून लिहिते, तर वृषाली हिंदीतून.<br /><br />फेस्टिवल संपायला काही तास असतात. जेवताना शेजारी येऊन बसतात तामिळ कवयित्री/कादंबरीकार आणि राजकीय नेत्या सलमा. त्यांची मुलाखत आदल्याच दिवशी ऐकलेली असते आणि त्यांच्या विलक्षण आयुष्याने मनात घर केलेलं असतं. लहान वयात लग्न झालेलं. कविमन शांत बसत नाही, पण स्वत:च्या नावाने कविता प्रसिद्ध करण्याचं धारिष्ट्य नाही. बाईच्या लैंगिक जाणिवांविषयीच्या त्या कविता कोणत्या कोणत्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. पण नाव नाही. या संग्रहाच्या प्रकाशनाला सलमा गेल्या, पण कोणालाच माहीत नव्हतं की हीच ती कवयित्री. तब्बल बारा वर्षं त्यांनी अनामिक राहून कविता लिहिल्या. याच सुमारास त्या ३३ टक्के आरक्षणामुळे राजकारणात उतरल्या, सरपंच झाल्या. माझ्यापेक्षा हिलाच राजकारण चांगलं जमतं, अशी पावती पतीनेच दिलेली. यानंतर लेखन सुरूच राहिलं असलं तरी त्यांच्यावर त्यांची स्वत:चीच सेन्साॅरशिप असल्यासारखी. द्रमुक पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या. आता आपण काही लिहिलं आणि त्याचा वेगळाच परिणाम झाला तर, अशी भीती त्यांना वाटते. सध्या त्या दोन कादंबऱ्यांवर काम करत आहेत.<br /><br />फेस्टिवलला यंदा चार लाख लोक येऊन गेले, असं टीमवर्कने जाहीर केलंय. प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्रावर बार कोड असतो, आणि ओळखपत्र रोज एकदा स्कॅन होतं. गेल्या वर्षी ही संख्या पाच लाख होती साधारण, म्हणजे फेस्टिवलची क्रेझ कमी झाली आहे, असं म्हणायला वाव आहे. मी मुंबईत काही वर्षांपासून होणारे टाइम्स लिटरेचर फेस्टिवल (हा बांद्र्यात मेहबूब स्टुडिओच्या आवारात होतो) आणि टाटा लिटफेस्ट (हा एनसीपीएमध्ये होतो) पाहिले आहेत. या दोन्हींचा मूळ आराखडा जयपूर फेस्टिवलवरच बेतलेला आहे. काही लेखक तर तिन्ही फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. कोलकाता, चेन्नई, कोची, बंगळुरू, लखनऊ, दिल्ली इथेही अशा प्रकारचे फेस्टिवल्स आता होऊ लागले आहेत. फक्त डिग्गी पॅलेसइतकी जागा तिथे नसते. हा मोठा फरक. आणि एकूणच जयपूरची काहीशी राजेशाही संस्कृती, मस्त थंडी, स्थानिक चविष्ट पदार्थ, यांनी फेस्टिवलचा माहोल बनतो. पाहात राहाण्याजोगा असतो तरुणवर्ग. मुंबईकरांनी गरम कपडे हा प्रकारच माहीत नसतो, असला तर एखादा स्वेटर किंवा शाल तर. त्यामुळे पहिल्या वर्षी तर मी आजूबाजूच्या मुलामुलींचे, क्वचित मध्यमवयीन बायांचेही गरम कपडे पाहात बसले होते. कांथा वर्कच्या शाली, अंगरखे, गुडघ्यापर्यंतचे बूट, जर्किन, कोट, कार्डिगन, टोप्या… अमर्याद यादी. पाचही वर्षं मी अशी बुभुक्षितासारखी पाहात आलेय. <br /><br />तरुण मुलंमुली इथे येतात ती फाेटो काढायला, आणि अर्थात ते सोशल मीडियावर टाकायला. शिवाय वेगवेगळे पदार्थ चाखायला. पण कार्यक्रमांमध्येही ती तेवढीच रंगतात, सामील होतात. गुलजार, जावेद अख्तर यांच्या कार्यक्रमांना पाय ठेवायला जागा नसते इतकी गर्दी असते. संजय राॅय यांनी गायिका उषा उत्थुप यांची मुलाखत घेतली तेव्हा तरुणांनी ती प्रचंड एंजाॅय केली. त्यांनी we are the world हे गाणं गायलं तेव्हा किती तरी जणांनी त्यांच्या आवाजात आवाज मिसळला, मोबाइलचे टाॅर्च लावून तिथे मस्त वातावरण उभं केलं. अनेक गंभीर चर्चांमध्येही ती सहभागी होतात. चांगले प्रश्न विचारतात. पुस्तकं विकत घेतात. त्यांची राजकीय मतं असतात आणि ती व्यक्त करतात. LGBTQ चळवळ वा तशा व्यक्तींना ती पाठिंबा दर्शवतात. त्यांच्या उत्साहाचं लोण साथीसारखं पसरणारंच असतं. पण राजकीय चर्चाही ते ऐकतात. शशी थरूर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तरुणांचं तिथे असणंच ऊर्जादायी असतं हे नक्की.<br /><br />फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या लेखकांना प्रत्यक्ष ऐकणं हा अनुभव अर्थात खास असतो. पत्रकार असल्याचा फायदा अशा वेळी मिळतोच. नाहीतर ज्या जेफ्री अार्चर यांचे शब्द धरून मी इंग्रजी वाचनाकडे वळले त्यांच्याशी अगदी जवळून बोलण्याची संधी मिळती ना. ते क्रिकेटचे फॅन. यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय काही महिन्यांत. तेव्हा कोण जिंकेलसं वाटतं असं विचारलं तर म्हणाले, इंग्लंडला चांगली संधी आहे पण भारताची टीमही जबरदस्त आहे. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की, तुमची लिखाणाची पद्धत काय आहे. ते म्हणाले, मी काही शिस्तबद्ध लेखन करत नाही. सुचेल तेव्हाच लिहितो आणि मला जे जग माहीत आहे त्याबद्दलच लिहितो. मी भारतात अनेकदा अालो असलो तरी मला भारत त्या अर्थाने ठाऊक नाही, त्यामुळे मी भारताबद्दल नाही लिहिणार. तुम्ही रोज सायकलने प्रवास करत असाल, तर त्याबद्दल लिहा, पण जे माहीत नाही त्याबद्दल लिहू नका, असं आवर्जून सांगितलं त्यांनी.<br /><br />तीच गोष्ट विख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग यांची. त्या बोलत असताना त्यांची देहबोली, डोळे, विलक्षण बोलका चेहरा पाहात राहावा असा. किंवा साक्षात चार्ल्स डार्विन यांची खापरपणती कवयित्री व कादंबरीकार रूथ पडेल यांच्याशी गप्पा मारता येत्या ना. रूथ पडेल कवयित्री आहेत, त्यांनी त्यांची जयपूर ही कविता वाचून दाखवली. शास्त्र आणि कविता दोन्हीला अचूकपणा हवा असताे, असं सांगून त्या म्हणाल्या की, मी कवितेतही कल्पनाशक्ती वापरली तरी ती शास्त्राच्या नियमांना धरून असते. <br /><br />मी मीडिया रजिस्ट्रेशन केलं होतं त्यामुळे जेवणाची वेगळी सोय होती, सर्व लेखकांची वा वक्त्यांची असते तिथेच. तिथेच एकदा आर्चर भेटले, तर नोबेल विजेते जीवशास्त्रज्ञ डाॅ. वेंकी रामकृष्णन आम्ही बसलो होतो तिथेच बाजूला उभं राहून ब्रेक्झिटवरची चर्चा एेकत होते. या अत्यंत आवेशपूर्ण चर्चेनंतर त्यांनी शांतपणे एक निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले, ‘मी भारत, इंग्लंड, आणि अमेरिका या तीन देशांत राहिलो आहे. इंग्लंडमध्ये गरिबांवर किंवा उपेक्षितांवर होणारे अत्याचार, तसंच वर्णद्वेषाचे अनुभव, बाकीच्या दोन देशांपेक्षा वेगळे नाहीत. दक्षिण भारतातल्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तरी अंदाज येईल.’ त्यांच्या शेजारी उभं राहून, त्यांना कळणारही नाही, अशा पद्धतीने सेल्फी काढायचा मोह नाहीच आवरला मी. नोबेल विजेते असे नेहमीनेहमी नसतात आसपास ना आपल्या? डॅनियल लिबरमन नावाच्या लेखकाच्या सत्रातही डाॅ. वेंकी यांनी प्रश्न विचारले. लिबरमन धावण्याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करतात. मानवी शरीर धावण्यासाठीच निर्माण झालेलं आहे, असं त्यांचं मत आहे. आदिमानवापासून आपण आजवर कसे आलो, यावर त्यांचा या अंगाने अभ्यास सुरू आहे. ते अनवाणी मॅरेथाॅनही धावतात. जयपूरमध्ये २६ जानेवारी रोजी ते अर्धमॅरेथाॅन धावले होते. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, या शहरात चालायला पदपथही नाहीत!<br /><br />आवडत्या लेखकाचं पुस्तक हातात घेऊन त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी रांगेत उभी असलेली शंभरेक तरुण मुलंमुली पाहून आपणही एक पुस्तक लिहायला घ्यावं, असं वाटायला लागतं. पुस्तकांच्या दुकानातल्या गर्दीमुळे तिथे जाऊ नये असं वाटतं, हेही छानच की. देशभरातून पत्रकार तिथे येतात. त्यांच्याशी बोलता येतं. एक दिवस मी बातमी लिहीत होते. समोर घरनं नेलेल्या चकल्यांचं पाकीट होतं. समोर बसलेल्या एकाला ते देऊ केलं. तो होता दिल्लीवाला. म्हणतो, 'ये क्या है?' बाप रे, ये चकली नहीं जानता! म्हटलं, 'इसे चकली कहते है.' म्हणे, 'साउथ इंडियन शाॅप्स में देखा है, पर खाया नहीं कभी.' म्हटलं, 'खा के देखो.' तर इतकुसा नखाएवढा तुकडा घेऊन चव घेतलीन. पण चकलीच ती, आवडलीच त्याला. दिल्लीवाल्याला चकलीची चव दाखवल्याचं पुण्य पदरात जमा झालं, ते वेगळंच.<br /><br />पाठीशी पुण्य असणार आधीचं थोडं. त्याशिवाय आमच्या हामस्टेच्या होस्टकडचा फोनो चालू असून त्यावर गाणंही ऐकता आलं नसतं. पहिल्यांदाच ती तबकडी फिरताना, त्यातनं गाणं बाहेर येताना पाहिलं/ऐकलं, त्यामुळे ते लवकर विस्मरणात नाही जाणार हे नक्की. यंदाच्या जयपूर भेटीतला हा जपून ठेवावा असा अनुभव.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-78781984725024696552019-03-09T17:57:00.001+05:302019-03-09T17:57:39.796+05:30आश्वासक<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiYai0aQjyiwh88xUh-BqIbTdX8Yxn_cHNix9pNM5TpaU1s7cAw7cunjZMAa0Cuxc2a3q5J3fhCJvZxU4nVYyEOH9S8JiU2j9qyE1BWNF1oRxAQ0UsGfkVFuUztg-I5mBwSw_aXF57sQe2C/s1600/logo.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="240" data-original-width="187" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiYai0aQjyiwh88xUh-BqIbTdX8Yxn_cHNix9pNM5TpaU1s7cAw7cunjZMAa0Cuxc2a3q5J3fhCJvZxU4nVYyEOH9S8JiU2j9qyE1BWNF1oRxAQ0UsGfkVFuUztg-I5mBwSw_aXF57sQe2C/s1600/logo.jpg" /></a></div>
हळुहळू पन्नाशीकडे पोचतेय मी, इतक्या वर्षांत लक्षात राहिलेल्या किती जणी
भेटल्या असतील त्याची गणतीच नाही. त्या लक्षात राहिल्या याची कारणं साधारण
सारखीच. त्यांच्यातली जिद्द, अपार मेहनतीची तयारी, अगदी निरपेक्ष नसलं तरी
जिवापाड प्रेम करण्याची शक्ती, नवनवीन शिकत राहण्याची इच्छा, ही त्यात
वरच्या क्रमांकावर येणारी. अशा व्यक्तींची यादी करायला घेतली तर सगळ्या
मावशा, काकवा, माम्या, आत्या, बहिणी, वहिन्या, भाच्या वगैरेंचा उल्लेख
करावा लागेल सुरुवातीलाच. कारण कळायला लागल्यापासून या सगळ्याजणी आपल्या
अवतीभवती असतात, आपल्या बोलण्यात त्यांचे संदर्भ येत असतात, आपल्या
आयुष्यातल्या लहानमोठ्या प्रसंगांच्या साक्षीदारच असतात असं नव्हे तर
त्यांच्याशिवाय त्या प्रसंगांना पूर्णत्व मिळत नसतं. पण यांच्याशिवायही
अनेक जणी आपल्या आयुष्याचा काही भाग व्यापून असतात, लहानमोठा, कमीजास्त.
त्यांची नावंही अनेकदा माहीत नसतात आपल्याला. माझ्या ट्रेनमधल्या मैत्रिणीच
घ्या ना. एकीला तिच्या पोलीस नवऱ्याने खूप छळलंय, लेकीला फितवत असतो तो
त्यांच्या, आणि तरीही ती हसरी आहे. कधी कंटाळलेली नसते. उत्साहाने कायकाय
पदार्थ करून डब्यात आणते आणि मला आग्रहाने खाऊ घालते. खूपदा मला विचारतेही,
आता काय करू मी, तुम्हीच सांगा. मी तिला धीर देण्याशिवाय आणि कधीतरी जमेल
तसं जवळ घेण्याशिवाय काहीच नाही करू शकत. तिची जिद्द, मुलीसाठी काहीही
करायची तयारी, नीटनेटकं राहणं, घर नीट ठेवणं, आईवडलांची सेवा करणं हे सगळं
खूप मोलाचं वाटतं मला.<br />दुसरी आमची भाजीवाली मावशी. तिची दोघं मुलं, नवरा
आणि एकदोन मदतनीस असे मिळून भाजी विकतात. नऊवारी नेसणारी ही मावशी रोज
प्रेमाने बोलणार, कधी साडी नेसलेली असले मी तर कौतुक करणार, पाव किलोच भाजी
तर म्हणणार जरा जिवाला खात जावा. बरं हे सगळं माझ्याशीच नव्हे, तिच्या
अनेक ग्राहकांशी तिचं असं नातं आहे. त्यामुळे भाजी घ्यायची नसली तरी तिला
हात केल्याशिवाय मी घरी जातच नाही संध्याकाळची. भाजी घ्यायला येणाऱ्या
ग्राहकांशी शांतपणे बोलणं, त्यांच्या कोणत्याही कितीही मूर्ख वाटणाऱ्या
प्रश्नांवर न चिडता उत्तरं देणं, तिला कसं जमतं असं मला नेहमीच वाटत
राहातं. <br />आमच्या घरी जवळजवळ चाळीस वर्षांपासून येणारी आमची मदतनीस.
शिकलेली फार नाही, पण रोजचा पेपर डोळ्यांखालनं घालते, पुस्तकं वाचते. तिचं
काम आणि टापटीप निव्वळ अतुलनीय आहे. माझ्या लेकीवर तिने माझ्यापेक्षा जास्त
जीव लावलाय. तिच्यामुळे माझं आयुष्य किती सुखकर झालंय, हे मला पक्कं माहीत
आहे. दुसरी मदतनीस तामिळ आहे, त्या माध्यमातनं दहावी शिकलेली आहे. नवरा
दारू पितो, रिक्षाही चालवतो जमेल तशी. पण घर बहुधा हिच्याच कमाईवर चालतं.
तिचा धाकटा लेक मूकबधीर आहे. नशिबाने ते लवकर लक्षात आलं. मुंबईत त्या
मानाने सोयी बऱ्याच आहेत, आणि ही त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला नेहमी
तयार असते. त्याला शाळेत नेआण ही तिचीच जबाबदारी. तिच्या चेहऱ्यावरचं हसू
फार गोड आहे. या दोघी आल्या की निवांत वाटतं. <br />संध्याकाळच्या ट्रेनला
भेटणारी एक शिक्षिका. मुलुंड ते दहिसर रोजचा प्रवास. तिसरीचौथीच्या मुलांची
वर्गशिक्षिका आहे ती. बरीचशी मुलं गरीब वस्तीतली. त्यांच्या तक्रारी,
त्यांच्या आयुष्यातल्या समस्याच वेगळ्या. कोणाचे वडील दारू पिऊन मारहाण
करतात, कोणाचे दुसऱ्या बाईला घेऊन कुठेतरी गेलेले. फी भरायचीही मारामार. मग
ही त्यांची फी भरणार. एखाद्याच्या वडलांना फोन करून खडे बोल सुनावणार.
अगदी मृदू स्वभावाची, हळुवार पण आपण जितकं कोणासाठी करू शकतो ते करायचंच,
या विचारांवर ठाम असणारी.<br />एक शाळेतली मैत्रीण. प्रचंड हुशार आणि मेहनती.
नियोजन हे तिच्या रक्तात भिनलेलं, अर्थात शिस्तशीर आईवडलांकडनं आलेलं.
उशिरा लग्न झालं. मुलगी दत्तक घेतलीय. आयटी क्षेत्रात मोठ्या जबाबदारीच्या
पदावर काम करतेय. सगळं सांभाळताना तिची ओढाताण, दमछाक होतेच. पण आता तिला
कळून चुकलंय की, आपण कशावर वेळ घालवायचा, कशाचा त्रास करून घ्यायचा, कशाचा
आनंद घ्यायचा हे आपणच ठरवायला हवं. choose your own battles हा तिच्या
आयुष्याचा मूलमंत्र बनलाय. त्यामुळे ती काम, घर, मुलगी, मैत्रिणी, वाचन,
नीटनेटकी राहणी, भटकंती हे सगळं जमवतेय. शिवणयंत्र घेण्याचं अनेक वर्षांचं
स्वप्न तिने गेल्याच वर्षी पूर्ण केलंय आणि ती त्याच्यावर लेकीसाठी
काहीबाही शिवत असते. वेळेचं व्यवस्थापन तिच्याकडून शिकावं असं मला नेहमी
वाटतं.<br />एक जुनी मैत्रीण. दोन मुलांमधला एक शारीरिक दुर्बल, नवऱ्याचं
अकाली निधन झालेलं. तिच्या स्वत:च्या तब्येतीच्या काही तक्रारी. जबाबदारीची
नोकरी. आणि या सगळ्यातनंही स्वत: आनंदी राहणारी, छोट्या छोट्या गोष्टीत
आनंद शोधणारी, उत्तम लिहिणारी, संवेदनशील आणि हसतमुख. मला पूर्वी प्रश्न
पडायचा, अशा परिस्थितीत ही हसू कशी शकते? आता आता कळू लागलंय की, आनंदाचे
काही क्षण तिला बाकीची आव्हानं पेलायला बळ देतात. आणखी एक अशीच औरंगाबादची
सखी. तिचा एक मुलगा स्वमग्न आहे. तर तिने त्याच्यासारख्या मुलांसाठी शाळाच
सुरू केली सरळ. आता तिचा व्याप बराच वाढलाय. स्वत:च्या मुलाची जबाबदारी,
त्याला द्यावी लागणारी खास वागणूक, वेळ यात शाळेची जबाबदारी घेतलीय.
मुलांना वेगवेगळे अनुभव कसे देता येतील, त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं
करता येईल, पालकांना जागं कसं करता येईल, या सगळ्या कामासाठी पैसा कसा उभा
करता येईल या चिंता तिला आहेतच, पण ती त्यांना काही काळ बाजूला ठेवून
पुस्तकं वाचते, मैत्रिणींना भेटते, छान राहाते. तिने मुद्दाम गाडी घेतली,
चालवायला शिकली, फिरणं सोयीचं व्हावं म्हणून, त्यामुळे ती अधिक कामं करू
शकते.<br />एक मैत्रीण तशी अलिकडची. मुलींना सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून
ती कधी नोकरी करू शकली नाही. आता नातू आहे, तर त्याला सांभाळण्याची
जबाबदारी तिने घेतलीय, जेणेकरून मुलीला याच कारणामुळे नोकरी करता आली नाही,
असं व्हायला नको. नातवाच्या जबाबदारीमुळे ती काहीशी बांधली गेलीय पण
त्यातूनही तिला अगदीच ज्या गोष्टी करायच्या असतील, फिरायला जायचं असेल तर
ती तेवढं जमवतेच. इंग्रजीत 3 AM friend असा एक शब्दप्रयोग आहे, ही माझी तशी
मैत्रीण आहे.<br />एक माझी सहकारी. छोट्या घरात संयुक्त कुटुंबात राहणारी.
घरचं आणि आॅफिसचं काम इतकं की, ती गजर लावल्याशिवाय, झोप पूर्ण झाली
म्हणून, कधीतरी जागी होत असेल का, असा प्रश्न पडतो. ती नीटनेटकी आहे, छान
मॅचिंग करून आॅफिसला येते. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणारी. कामाला
पक्की. समजा आम्ही पाठवलेलं एखादं कुरिअर पोचलेलं नाही. हिला त्याचा छडा
लागेतो चैन पडणारच नाही. आॅफिसात तिच्यावर सोपवलेलं काम वेळेत आणि परफेक्ट
होणारच, याची खात्री असते सर्वांनाच. असा विश्वास कमावणं सगळ्यांना नाही
जमत ना.<br />एक आहे वेगळीच, मैत्रीण नाही म्हणता येणार कदाचित. ती तृतीयपंथी
आहे. तिला आॅफिसात पहिल्यांदा भेटले तेव्हा तिचे अनुभव ऐकून काळजात हललं.
पुण्याहून मुंबईला येताना ट्रेनमध्ये तपासनीसाने इतर सामान्य माणसांसारखं
तिकीट विचारावं आपल्याला, हे तिचं स्वप्न. तिच्या एका कवितासंग्रहाला कोणी
पुरस्कार दिला मध्यंतरी. पण त्यामागे केवळ LGBTQ व्यक्तींना सहानुभूती
दाखवायचा हेतू आहे, हे तिच्या लक्षात आल्यावर तिने पुरस्कार नाकारला.
तिच्या आयुष्यातले संघर्ष माझ्या आकलनापलिकडचे आहेत, किमान ती आहे तशी तिचा
स्वीकार करणं मला नक्की जमवायचंय.दुसरी एक तिच्यासारखीच, ट्रेनमध्येच
टाळ्या वाजवत येणारी. पण ती गाते छान. आणि गाडीच्या दारात लटकणाऱ्या, लटकून
फोनवर बोलणाऱ्या मुलींना ओरडतेही. तिची इतकी वेगवेगळी रूपं मी पाहिली
आहेत, पण तिचं खरं आयुष्य त्याच्या पलिकडचं आहे, याची मला चांगलीच जाणीव
आहे.<br />या सगळ्यांशी मी जोडलेली राहाते, काहीशा स्वार्थी विचाराने कदाचित.
पण ज्यांच्याशी वागताना स्वार्थाचा लवलेशही नसतो अशा तीन व्यक्तींचा
उल्लेख इथे करायलाच हवा. एक माझी लेक आणि माझ्या दोन आई. लौकिकार्थाने अगं
आई आणि अहो आई. आईने कोकणातल्या छोट्या खेड्यातून या महानगरीत येऊन
महापालिकेत नोकरी केली. पण स्वेच्छानिवृत्ती घेऊन ती कानडी शिकली, थेट
मुंबई विद्यापीठात. भाषेवर चांगली पकड यावी म्हणून ती रोज कानडी
वर्तमानपत्र वाचू लागली, कानडी मालिका पाहू लागली. हळूहळू ती कानडी
साहित्याचा मराठी अनुवाद करू लागली. याच दरम्यान बाबा अचानक गेल्याने तिला
जबरदस्त धक्का बसला, पण काही काळातच याच कानडीचा हात धरून ती त्यातनं बाहेर
आली. आज ती संगणकावर देवनागरी टंकते, ईमेल लिहिते. अनुवादाच्या कामात आणि
इतर वाचनात दिवस कसा जातो, तिलाही कळत नाही. माझं वाचन कमी झाल्याबद्दल ती
अनेकदा मला टाेकतेही. दुसरी आई लग्नानंतर काही वर्षांनी बीएड झाली,
शिक्षिका म्हणून निवृत्त झाली, पण तिला शिकवण्याविना चैन पडेना. मग वरळीला
नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंडमध्ये जाऊन डीएड करणाऱ्या अंध मुलींना तिने
शिकवलं, त्यांच्यासाठी धडे ध्वनिमुद्रित केले. मग मुलुंडमध्येच महाराष्ट्र
सेवा संघाच्या दृष्टी सेवा केंद्रात दहावीच्या अंध मुलांना ती शिकवू लागली.
पंचाहत्तरीकडे प्रवास करताना प्रकृती कधीकधी साथ देत नाही आता तिला, पण
जमेल तसं ती तिच्या मुलांना शिकवत राहातेच. घरबसल्या धडे/कविता
ध्वनिमुद्रित करणं तर नक्कीच जमतंय तिला. शिवाय तिच्या प्रिय झाडांचं
लालनपालन करण्यात तिला अतुलनीय आनंद मिळतो. <br />लेकीला मी वाढवलं की तिने
मला शिकवलं, असा प्रश्न मला पडतो इतकं तिचं वागणं मला समंजस वाटतं. ठरवून
वर्षात अमुक एक पुस्तकं वाचणं असो की एकटीने सिनेमा पाहाणं, वेगवेगळी कामं
हातात घेणं, अत्यंत पॅशनेटली ती करणं, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी नेहमी
उपलब्ध असणं, घरातली कामं करणं, स्वयंपाकघरात अधनंमधनं का होईना डोकावणं,
छान राहाणं, स्वत:ची काळजी घेणं, हे सगळं खूप मस्त आहे. या पिढीसमोर इतके
पर्याय उभे असतात की, मुलं गोंधळून जातातच. पण त्यावर मदत मागतात ती, हे
फार आवडतं. मदत मागणं भल्याभल्यांना जमत नाही, हे दिसत असतं रोजच्या रोज,
म्हणून त्याचं कौतुक. <br />या सगळ्या जणी माझ्या आयुष्यात आल्या म्हणून माझं मलाच जाम भारी वाटत राहातं.<br />
(आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनीसाठी महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं निवेदन.) mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-89713012330570471992019-03-09T17:55:00.001+05:302019-03-09T17:55:16.423+05:30समतोलाच्या प्रतीक्षेत<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEir27CxzMzHXNt0JT1CItAHPTZRKaz7pohjpfpVV19W3vLUDI_b2fTxmjkYS8g-7uJ8aJ1Unj4JiiQLpoiKca9t1-W31ilDwGvJdh_eiGGGnzx8dSIbJwYNu08u7wfbVM9GoJudUVKbR3dg/s1600/logo.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="240" data-original-width="187" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEir27CxzMzHXNt0JT1CItAHPTZRKaz7pohjpfpVV19W3vLUDI_b2fTxmjkYS8g-7uJ8aJ1Unj4JiiQLpoiKca9t1-W31ilDwGvJdh_eiGGGnzx8dSIbJwYNu08u7wfbVM9GoJudUVKbR3dg/s1600/logo.jpg" /></a></div>
आजच्या
आंतरराष्ट्रीय महिला दिनाची केंद्रीय भूमिका आहे #balanceforbetter म्हणजे
सुस्थितीसाठी समतोल. आता हा समतोल आपल्या आजूबाजूला दिसतो का याचा विचार
केला तर काय लक्षात येते? वरवर पाहिले तर भारतात अधिक महिला शिकू लागल्या
आहेत, अधिक महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत. (पण कमावणाऱ्या महिलांची
संख्या कमी होते आहे ही चिंतेची बाब डोळ्यांआड करून चालणार नाही.) विसाव्या
शतकाच्या शेवटीशेवटी जी कार्यक्षेत्रे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती
त्यातली बहुतेक कामे महिलाही करू लागल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातही महिला
धडाडीने काम करत अाहेत. त्या लढाऊ वैमानिकही आहेत. पण अजून हे सगळे
सहजगत्या, नैसर्गिकरीत्या होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चाकोरीबाहेरचे
क्षेत्र निवडणाऱ्या प्रत्येकीला विरोधाला सामाेरे जावेच लागते, समाजाशी
नसेल तर घरातल्यांशी संघर्ष करावाच लागतो. अनेक घरांमध्ये अशी परिस्थिती
आहे की, साध्या १० ते ५ नोकरीसाठीही घराबाहेर पडण्यावर बंधने आहेत, काही
पुरुषांनी घातलेली तर काही स्त्रियांनी स्वत:वर घालून घेतलेली. वर उल्लेख
केल्याप्रमाणे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे
कारण कुटुंबाच्या/कुटुंबातल्या जबाबदाऱ्या फक्त त्यांच्याच असतात, असे
मानणाऱ्या पुरुषांची संख्या आजही मोठीच आहे. मुलांची/ज्येष्ठांची आजारपणे
असोत की घरकाम की घरातले एखादे लहानमोठे कार्य असो, घरातली स्त्रीच तिथे
आवश्यक असते. मग भले तिचे कार्यालयातले/शेतावरचे/कारखान्यातले/दुकानातले
काम कितीही महत्त्वाचे असो. एक स्तनपान वगळता लहान मुलांची काळजी
घेण्यातले सगळेच पुरुष करू शकतात परंतु आजही मूल आजारी आहे म्हणून रजा
घेणाऱ्या पुरुषांची संख्या किती आहे ते आपण आजूबाजूला पाहू शकतोच. हीच
परिस्थिती महिलांना नोकरी सोडण्यास भाग पाडते आहे, कारण पुरुष जबाबदाऱ्या
घेतच नाहीत. संसार, लग्न, कुटुंब टिकवण्याची जबाबदारीही आपल्या पितृसत्ताक
समाजाने स्त्रीवरच टाकलेली आहे. नागपुरातल्या एका संस्थेने "स्त्रीपुरुष
समानतेमुळे संसार उद्ध्वस्त होतात', असा विषय २०१९मध्ये निबंध स्पर्धेसाठी
दिला आहे, हे याचेच द्योतक. "मुलगी शिकली प्रगती झाली', ही सरकारी घोषणा
ठीक आहे, पण "मुलगी शिकली आणि संसार बुडाला' यावरच सामान्य माणसाचा विश्वास
आहे, त्याचेही कारण स्त्री शिकून पुढे गेली, पुरुष शिकूनही मागेच राहिला,
हेच आहे. अजूनही कित्येक घरांमध्ये मुले अभ्यासात मागे पडली, आजारी पडू
लागली तरी आईच्या नोकरीकडे बोट दाखवले जाते.निव्वळ तिच्या पगारावर डोळा
ठेवूनच तिला कामावर जाऊ दिले जाते, भले तिला त्या पगारातला एक पैसाही
तिच्या मनाने खर्चायचे स्वातंत्र्य नसेल. तिच्याइतकेच काम करणाऱ्या
पुरुषापेक्षा ही रक्कमही अनेकदा कमी असते, पण किमान तिला आपण काही कमावतो,
याचे सुख तरी तिला मिळते. संरक्षण क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांची
संख्या भले वाढली असेल, पण गावांत, खेड्यांत, शहरांत, महानगरांत स्त्रीला
सुरक्षित वाटत नाही, हेही वास्तवच. स्त्रियांनी आणीबाणीत वापरायची अनेक अॅप
आज उपलब्ध आहेत, पण त्यांची गरजच का पडावी, याचा विचार आपण कधी करणार
आहोत? बसमध्ये, लोकल गाड्यांमध्ये पोलिसांच्या मदत सेवांचे दूरध्वनी
क्रमांक लिहूनही आपण महिला किती असुरक्षित आहेत, आणि पुरुष असेच वागणार,
हेच अधोरेखित करतोय. पुरुषांनी स्त्रीला मखरात ठेवून तिची पूजा करावी अशी
अपेक्षा नसून तिच्याकडे एक आपल्यासारखीच सामान्य माणूस म्हणून पाहावे,
इतकेच तर हवे असते. आई, बहीण, आजी, पत्नी, मुलगी, वहिनी, मैत्रीण या व इतर
असंख्य रूपात सतत समोर येणाऱ्या स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणूनच पाहू
शकणाऱ्या पुरुषांबद्दल वाईटच वाटावे की, स्त्रियांचा सहवास किती विविध
प्रकारे भरभरून देणारा असतो हे यांना कळलेच नाही. <br />
<div dir="ltr">
अर्थात, चित्र इतके
काळेकुट्ट नाही हा एक दिलासा. महिलांवरच्या अत्याचाराविरुद्ध लढणारे अनेक
पुरुष आहेत. घरातली कामे, अगदी लेकरांना आंघोळ घालण्यापासून
स्वयंपाकापर्यंतची, आवडीने करणारे पुरुष आहेत. (आणि असे जाहीरपणे सांगायला
ते लाजतही नाहीत, हेही महत्त्वाचे.) आम्ही फेमिनिस्ट आहोत, असे आनंदाने
सांगणारे पुरुषही आहेत. अमेरिकेत एका फक्त मुलग्यांच्या शाळेत फेमिनिस्ट
क्लब सुरू करणारे दोघे तरुण यातलेच. आसपासचा एखादा पुरुष चुकीचे वागत असला
तर त्याला थांबवणारेही मोजकेच का होईना, पुरुष आहेत. यांची संख्या हळूहळू
का होईना, वाढतेय. त्यांच्यापासून इतर स्फूर्ती घेतील, ही आशा कायम आहे.
त्यांच्यामुळेच समाजात समतोल निर्माण होऊन स्त्रियांचे, पुरुषांचे,
पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य सुधारणार आहे यात शंका नाही. हा आशेचा किरण या
महिला दिनी मोलाचा वाटतो. </div>
mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-56498030407149482172019-02-05T18:14:00.002+05:302019-02-05T18:16:21.551+05:30उत्साही तारुण्य, लोभस वार्धक्य<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpG_QDxhrzoaNfvp__pTaeL7LI8Ko0WBiT4oACjMJyea-mWk0F5tIeSAOLLqoIwD1U43xz2dhYVMkMOuvyulvset5n0KFtIqqB98a7lX1Ze3akTmL6GhUjhvr5YWMqRqEcfJTR5epm98Yv/s1600/jlf+2019.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1133" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpG_QDxhrzoaNfvp__pTaeL7LI8Ko0WBiT4oACjMJyea-mWk0F5tIeSAOLLqoIwD1U43xz2dhYVMkMOuvyulvset5n0KFtIqqB98a7lX1Ze3akTmL6GhUjhvr5YWMqRqEcfJTR5epm98Yv/s320/jlf+2019.jpg" width="226" /></a></div>
<b><i>लिटरेचर फेस्टिव्हलसाठी जयपूरला गेले असताना भेटलेल्या चार लक्षणीय स्त्रियांची गोष्ट. दोघी विशीतल्या, एक पन्नाशीची, तर एक सत्तरीजवळची.</i></b><br />
<br />
<br />
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस. मीडिया गॅलरीत बसून बातमी लिहीत असताना टेबलावर सॅक धप्पकन टाकून शेजारच्या खुर्चीवर एक मुलगी येऊन बसली आणि ‘ईश्वर!’ असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला. ‘क्यों ईश्वर को याद कर रही हो?’ असं विचारल्यावर म्हणाली, ‘अब इतनी भागदौड करने के बाद बैठने मिला है, तो ईश्वर को ही याद करूँगी ना?’<br />
‘कौन से पेपर के लिए लिख रही हो?’<br />
‘मैं ब्लाॅगर हूँ फेस्टिवल के ब्लाॅग लिखती हूँ.’<br />
फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या सत्रांविषयी ब्लाॅग लिहिण्यासाठी स्पर्धा घेऊन सहा जणांना ब्लाॅगर म्हणून निवडण्यात येतं. त्यात ही निवडली गेली. सत्र संपलं की विशिष्ट वेळाच्या आत ब्लाॅग लिहून फेस्टिव्हलच्या वेबसाइटवर टाकण्याचं बंधन या ब्लाॅगर्सवर असतं.<br />
‘दिव्य मराठी’चं नाव ऐकल्यावर तिचे डोळे चमकले. कानपूरच्या एका मुलीला ‘दिव्य मराठी’त काय रस असेल बरं, असं मनात आलं. तर तिला रस होता मराठीत. कारणीभूत होता अभिनेता अतुल कुलकर्णी. त्याच्यासाठी तिला मराठी शिकायचं आहे. त्याच्यासाठी ‘नटरंग’ तिने व्हिडिओची गती कमी करून, संवाद कळावेत म्हणून साडेसहा तास बसून पाहिला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’मधली गाणी अनेक महिने ती लूपवर ऐकत होती, शेवटी आईने वैतागून तिला धमकी दिल्यावर ते बंद झालं. ती पोटात असताना तिच्या आईने ‘मृत्युंजय’चा हिंदी अनुवाद वाचला होता, म्हणून हिचं नाव ठेवलं वृषाली. समोरच ठेवलेलं चकलीचं पाकीट पाहून ती ज्या उत्स्फूर्तपणे ‘अगं बाई, चकली!’ म्हणाली, तेव्हा तिच्या मराठीप्रेमाची खात्रीच पटली. वृषाली २६ वर्षांची आहे. वेगवेगळी अनेक कामं तिने आतापर्यंत केली आहेत. गेल्या वर्षी तिला कर्कराेग झाल्याची भीती निर्माण झाली होती, अनेक शस्त्रक्रियांमुळे तिने बराच काळ घराच्या आत काढला होता. त्यामुळे जयपूरच्या मोकळ्या हवेत ती खुलली होती. काही दिवसांतच ती आॅस्ट्रेलियाला रवाना होतेय, प्रकाशन व्यवसायातील शिक्षणासाठी. ‘लडकी हाथ से गयी,’ असं तिच्या वडिलांना वाटतंय. खरं तर आतापर्यंत लग्न होऊन जायला हवं होतं, असं त्यांना वाटतंय. पण वृषालीला खूप मोठं आकाश खुणावतंय.<br />
***<br />
फेस्टिव्हलचा तिसरा दिवस. विख्यात तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची मुलाखत झाल्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू होती. सतरा-अठरा वर्षांची वाटावी अशा मुलीने त्यांना प्रश्न विचारला, ‘इंग्रजी साहित्य आणि बाकीच्या भाषांमधलं (other or regional) साहित्य असा उल्लेख सर्रास केला जातो, तर भारतीय भाषांना बाकीच्या असं म्हणण्याबद्दल काय वाटतं?’ लेखक हसले आणि त्यांनी सांगितलं, ‘भारतभूमीत निर्माण होणाऱ्या सर्व साहित्याला भारतीय साहित्यच म्हणायला हवं.’<br />
प्रश्न वरवरचा नव्हता, त्यामागे काही विचार होता, म्हणून लक्षात राहिला. यानंतर काही तासांनी ती मुलगी चहा पिताना शेजारीच होती असं जाणवल्यावर तिच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही. ‘तुझा प्रश्न चांगला होता, काय करतेस तू?’<br />
ती फेस्टिव्हलला आली होती ब्लाॅगर म्हणून. इंग्रजी साहित्य विषय घेऊन दिल्लीच्या लेडी श्रीराम काॅलेजमधून बीए झाली. पुढच्याच महिन्यात ती जपानला जातेय, जपानी भाषाशास्त्र शिकायला. तिचं नाव स्वस्तिका जाजू. वय वर्षं २१. यातली आठेक वर्षं तिने औरंगाबादेत घालवल्याने तिला ‘दिव्य मराठी’ आणि मधुरिमा चांगलेच ओळखीचे होते. स्वस्तिका इंग्रजीतून लिहिते, तर वृषाली हिंदीतून.<br />
***<br />
फेस्टिव्हलचा पाचवा आणि शेवटचा दिवस. मी ज्या घरात राहत होते पाहुणी म्हणून, तिथे सकाळचा चहा घेत असताना एक वयस्कर परदेशी बाई मोठाली बॅग घेऊन हजर झाली. लिंडा तिचं नाव. हाॅलंडहून आली होती, दीड महिना राहणार होती. इतके दिवस? पर्यटनासाठी नव्हे, तर दंत उपचारांसाठी ती आली होती, हे ऐकून काहीसा धक्काच बसला. आणखी धक्का बसला तिच्या नाकातली सोन्याची चमकी पाहून. भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे मोठे केंद्र असल्याचे ऐकून होते, लिंडा त्याचाच एक घटक. हाॅलंडपेक्षा एकपंचमांश किमतीत भारतात दंत उपचार होतात, त्यामुळे विमानप्रवास आणि राहण्याचा खर्च जोडूनही ते स्वस्तच पडतं. लिंडा १९७१मध्ये सर्वप्रथम भारतात आली, येतच राहिली. भारतीय हातमागावरचे चादरी, पडदे, कापडं यांचा व्यवसाय करू लागली. त्या काळात इंटरनेट सोडाच, हाॅलंडहून भारतात फोन लावणंही महामुश्कील असल्यानं तिला सतत इथे येण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ट्रंक काॅल लावायच्या आठवणी तिच्या मनात ताज्या होत्या. ती दक्षिण भारतात नेहमी जायची. ‘नाक टोचून चमकी घातल्यामुळे मी सहज स्वीकारले गेले,’ असं ती म्हणाली. आता तिने व्यवसाय कमी केला आहे. तिला सरकारची पेन्शन मिळते. तिने तिचं मोठं घर विकून दोन खोल्यांचं घर घेतलं आहे. मनात येईल तेव्हा नातींना भेटायला जर्मनीला जाते. आणि भारतात येते. ‘आता बाहेर जाऊन आधी स्थानिक सिमकार्ड घेणार, इथल्या मित्रमंडळींना सांगणार की मी आलेय,’ असं ती म्हणाली, तेव्हाचा तिचा आनंदी आणि उत्सुक चेहरा पाहून वाटलं, म्हातारपण यावं तर असं. प्रत्येक व्यक्तीलाच.<br />
***<br />
फेस्टिव्हल संपायला काही तास असतात. जेवताना शेजारी येऊन बसतात तामिळ कवयित्री/कादंबरीकार आणि राजकीय नेत्या सलमा. त्यांची मुलाखत आदल्याच दिवशी ऐकलेली असते आणि त्यांच्या विलक्षण आयुष्याने मनात घर केलेलं असतं. लहान वयात लग्न झालेलं. कविमन शांत बसत नाही, पण स्वत:च्या नावाने कविता प्रसिद्ध करण्याचं धारिष्ट्य नाही. बाईच्या लैंगिक जाणिवांविषयीच्या त्या कविता कोणत्या कोणत्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. पण नाव नाही. या संग्रहाच्या प्रकाशनाला सलमा गेल्या, पण कोणालाच माहीत नव्हतं की हीच ती कवयित्री. तब्बल बारा वर्षं त्यांनी अनामिक राहून कविता लिहिल्या. याच सुमारास त्या ३३ टक्के आरक्षणामुळे राजकारणात उतरल्या, सरपंच झाल्या. माझ्यापेक्षा हिलाच राजकारण चांगलं जमतं, अशी पावती पतीनेच दिलेली. यानंतर लेखन सुरूच राहिलं असलं तरी त्यांच्यावर त्यांची स्वत:चीच सेन्साॅरशिप असल्यासारखी. द्रमुक पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या. आता आपण काही लिहिलं आणि त्याचा वेगळाच परिणाम झाला तर, अशी भीती त्यांना वाटते. सध्या त्या दोन कादंबऱ्यांवर काम करत आहेत.<br />
***<br />
एकीकडे विशीतल्या मुली, प्रसंगी घरच्यांचं मन मोडून आपल्याला हवं ते शिकायला, काम करायला बाहेर पडतायत. मधेच आहे नुकतीच पन्नाशी ओलांडलेली अशी एक कवयित्री जी आता राजकारणात असल्याने लैंगिकतेबद्दल लिहावं की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहे. आणि दुसरीकडे सत्तरी गाठलेली एखादीही परदेशात एकटी प्रवास करतेय. एकीकडे तारुण्यसुलभ उत्सुकता, अनिश्चितता; एकीकडे अभिव्यक्तीची दडवून ठेवावी लागणारी ऊर्मी सांभाळत लिहीत राहण्याची इच्छा, तर दुसरीकडे उर्वरित आयुष्य निवांत आनंदात घालवण्याचा उत्साह. स्त्रीची ही हवीहवीशी लोभस रूपं.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-74140505711807621202019-01-08T15:59:00.000+05:302019-01-08T15:59:36.860+05:30शिक्षण व अर्थार्जनाला पर्याय नाही<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPYC69nGMGkXUM5DYTKUF-8eqDexJbnkwLcMeGTyb8ETVHwzNt9_KZvpuj9-7Zl9H97-hl1E544Dbb8sb2TbWB1Gv0FtX7yFAbn3alYdbRIhz-M-tNHbQGUswYP6ECBvB4_s-xv1PFq9il/s1600/money.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPYC69nGMGkXUM5DYTKUF-8eqDexJbnkwLcMeGTyb8ETVHwzNt9_KZvpuj9-7Zl9H97-hl1E544Dbb8sb2TbWB1Gv0FtX7yFAbn3alYdbRIhz-M-tNHbQGUswYP6ECBvB4_s-xv1PFq9il/s1600/money.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">पैसा कमावणे महत्त्वाचेच.</td></tr>
</tbody></table>
तिहेरी तलाक हा विषय पुन्हा एकदा गाजतोय. असा एकाच फटक्यात तलाक तलाक तलाक म्हणून पत्नीशी काडीमोड घेणाऱ्या पुरुषाला गुन्हेगार शाबीत करणारं विधेयक राज्यसभेकडे मंजुरीसाठी गेलं आहे. लोकसभेत त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली आहे. त्या निमित्ताने काही मुस्लिम महिलांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की, सर्वसामान्य बाईला असा कायदा नकोच आहे कारण त्याची गरज नाही असं वाटतंय. काहीही प्रश्न उद्भवला तरी इस्लामिक कायदा आहेच की, असं त्यांना वाटतं. या शरीयत कायद्यानुसारही मुलं १८ वर्षांची होईपर्यंत शिक्षणाचा व इतर खर्च उचलण्याचं बंधन नवऱ्यावर असतंच की, मग तुरुंगात कशाला पाठवायचं, असा प्रश्न त्यांना पडलाय.<br /><br />या कृतीचं गुन्हेगारीकरण खरोखरीच झालं तर तो पुरुष पहिल्या बायकोला तलाक न देता दुसरी बायको करून आणेल, अशी मोठी शक्यता आहे. अर्थात शरीयतनुसार, पहिल्या बायकोच्या संमतीनंतरच दुसरी बायको करता येते. पण, जी व्यक्ती बायको म्हणून नकोच आहे, जिला टाळायचंच आहे, किंवा त्रासच द्यायचाय, तिची संमती जबरदस्तीने घेता येणंही शक्य आहेच. किंवा, तलाक मिळाल्यानंतर आपला सांभाळ कोण करणार, मुलांना कसं सांभाळणार, समाजात तोंड कसं दाखवणार वगैरे प्रश्न ज्या बायकोला पडत असतील ती अशी संमती देऊही शकते. वाऱ्यावर सोडून दिलं जाण्यापेक्षा हे परवडलं, असं तिला वाटू शकतंच.<br />वकिलांना मात्र असं वाटतं की, कायद्याचा बडगा हवाच. कारण २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा तलाक बेकायदा असल्याचा निकाल दिल्यानंतरही तलाक होतच राहिले. आमच्या धर्माने अशी मुभा दिलीय, मग कोण माझं काय बिघडवेल, अशा वृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा हवाच, असं एक मत आहे. आणि या कायद्यात, पतीला जामीन मिळायचीही तरतूद आहे. त्यामुळे तो नोकरी करू शकतो आणि पत्नीला पोटगी देऊ शकतो. अशा पुरुषाला शिक्षा व्हायला हवीच, पण त्याने तुरुंगात जायला हवं, असं अनेकींना वाटत नसतं. या प्रकरणी अनेक महिला संघटनांची मागणी अशी होती की, पुरुषाला हवाच असेल काडीमोड तर तो रीतसर पूर्ण प्रक्रिया पार पाडून मिळावा, समुपदेशन, मुलांची कस्टडी, पोटगी याचे निर्णय न्यायालयात व्हावे, पुन्हा एकत्र येण्याची सोय हवी. त्यांना नको असताना लग्न टिकवून ठेवण्याची जबरदस्ती नकोच. आणि स्त्रीलाही स्वतंत्र व्हायचं असेल तर तिच्यासाठीही हीच प्रक्रिया आवश्यक असावी. या कायद्यात या घटकाचा समावेश असायला हवा, असं संघटना मांडत होत्या. परंतु कायदा प्रथमदर्शनी अपुरा वाटतो आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.<br />आणखी एक मुद्दा या निमित्ताने काही जणांनी मांडला तो असा की, लग्न झालेल्या परंतु घटस्फोट न होताही एकटं राहणाऱ्या, पोटगी न मिळणाऱ्या लाखो महिला देशात आहेत. त्या काेणत्याच कायद्याच्या आवाक्यात येत नाहीत. त्यांच्याबद्दल तातडीने विचार करायला हवा आहे. सगळ्या मुद्द्यांचा विचार करता एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, बाई जोवर कमवायला लागत नाही, आर्थिक स्वावलंबी होत नाही, स्वत:ला नि मुलांना सांभाळायची सक्षमता तिच्यात येत नाही तोवर कितीही कायदेकानून आणा, तिचं पारडं झुकतंच राहणार आहे. शिक्षण आणि अर्थार्जन या दोनच गोष्टी तिला यातून वर आणू शकतात. हे सगळं एकविसाव्या शतकात म्हणावं लागतंय, याची फक्त खंत वाटते.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-84377191110249824112018-12-25T13:50:00.000+05:302018-12-25T15:15:26.728+05:30only men in Bollywood?<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjz-SB0Bsygk2drg72wqZ2G1cH0dRdTaozs3Ttt7kjO_7IYA7SN2ohGjQqP3IUMiHt1QEnUrwKDBj8ArvuEULOMi2EnD0XzFbr6-kvhEVgyihwCIBdzsKE0GZELVlUfDfEDZkyhwNvx5pLO/s1600/bollywood.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="546" data-original-width="960" height="182" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjz-SB0Bsygk2drg72wqZ2G1cH0dRdTaozs3Ttt7kjO_7IYA7SN2ohGjQqP3IUMiHt1QEnUrwKDBj8ArvuEULOMi2EnD0XzFbr6-kvhEVgyihwCIBdzsKE0GZELVlUfDfEDZkyhwNvx5pLO/s320/bollywood.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">दिल्लीत पंतप्रधानांशी चर्चा करताना बाॅलिवूडचे पुरुष प्रतिनिधी. छाया इंटरनेट</td></tr>
</tbody></table>
<br />
तर गेल्या आठवड्यात, बाॅलीवूडमधल्या काही समस्या माननीय पंतप्रधानांच्या कानावर घालण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर वगैरे मंडळी यात सहभागी होती. पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली, मग त्याचे छानछान फोटो ट्विटरवर शेअर केले. पण नेमकं झालं काय होतं की, या शिष्टमंडळात ज्या अठरा व्यक्ती होत्या त्या पुरुष होत्या. चर्चेचे फोटो पाहून हे अर्थात अनेकांच्या लक्षात आलं. त्या अभिनेत्री दिया मिर्झा, काही पत्रकार आदी होत्या. मग त्यांनी त्यावर प्रश्न विचारले. उदा. एकाही महिलेला बोलावलं नाही या चर्चेसाठी, का बरं? कोणी म्हटलं की, बाॅलीवूडमध्ये महिला नाहीच्चेत का आता? कोणी म्हटलं की, बाॅलीवूडमधले महिलांचे प्रश्न संपलेले दिसतात.<br />
कोणाला ऑक्टोबरात झालेली अशीच बैठक आठवली, ज्यातही एकाही महिलेचा समावेश नव्हता. मध्यंतरी उद्योगजगतातील एका प्रतिष्ठित पुरस्काराच्या निवड समितीतही सात-आठ पुरुषच असल्याचं या पुरस्काराच्या जाहिरातीतनंच समोर आलं होतं. महिलांना या चर्चेत समाविष्ट करून का घेतलं नाही, शिष्टमंडळात कोण असेल हे कोणी ठरवलं, या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीयेत. ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तींनी हे ठरवलं असेल त्यांनी मुद्दाम महिलांना वगळलंय किंवा कसं, तेही ठाऊक नाही.<br />
यातनं लक्षात इतकंच येतं की, बाॅलीवूडसारख्या मोठा व्याप असलेल्या उद्योगजगताचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या फक्त पुरुषांनाच भेडसावतात असं आपल्याकडच्या काही जणांना निश्चितपणे वाटतंय. आणि अर्थात यातनं मार्ग काढणंही फक्त पुरुषांनाच जमणार असतं, हे वेगळं सांगायला नको. ज्या बाॅलीवूडमध्ये दिग्दर्शक, निर्मात्या, कलाकार, पटकथालेखक, छायाचित्रकार, संकलक, सहायक दिग्दर्शक, रंगभूषाकार आदी जवळपास सर्व भूमिका महिला पार पाडतात, तिथे अडचणी फक्त पुरुषांना येतात यावर विश्वास बसणं अशक्य आहे.<br />
चिंता आणि खंत या गोष्टीची वाटते की, हा भेदभाव इथेच संपत नाही. दिया मिर्झाने जेव्हा ट्विटरवर अक्षयकुमारला हा प्रश्न विचारला की, महिला का नाहीत या चर्चेत, तेव्हा तिला पुरुषांनी अत्यंत वाईट शब्दांत दुरुत्तरं केली आहेत. तू कोण, तुलाच प्रसिद्धी हवीय, प्रत्येक ठिकाणी काय महिला-पुरुष असं आणतेस, वगैरे वगैरे. म्हणजे, धडधडीत चुकीची गोष्ट समोर दिसत असूनही ती चूक दर्शवणाऱ्या व्यक्तीलाच लक्ष्य करायचा गेल्या काही वर्षांतला सोशल मीडियावरचा खेळ इथेही रंगलाच. महिलांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करण्याचा मोह पुरुषांना आवरता आवरत नाही, हे पुन्हा एकदा दिसलं. दिया मिर्झाने आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिलीय की, तिने हा प्रश्न ट्विटरवर विचारेपर्यंत अनेकांना, महिलांसह, या फोटोत काहीच वावगं आढळलं नव्हतं. एका उद्योगजगताचे प्रतिनिधी फक्त पुरुष कसे काय असू शकतात, सहभागींमध्ये एक तरी महिला का नाही, हेच अनेकांच्या लक्षात आलेलं नव्हतं, कारण आपल्याला वर्षानुवर्षं हेच पाहायची सवय झाली आहे, ती आपल्यात खोलवर मुरलीय. आणि हे सगळं, यंदाच मीटू नावाचं वादळ या उद्योगजगतात येऊन गेल्यानंतर!<br />
तुमच्या आजूबाजूला दिसतात का तुम्हाला अशा ‘फक्त पुरुषांसाठी’ असलेल्या समित्या, मंडळं, बैठका, चर्चा?mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-52396674581793429912018-12-11T18:35:00.000+05:302018-12-11T18:35:23.406+05:30why multitasking sucks!बायका अष्टावधानी असतात, multitasking असा गोड शब्द त्यांच्यासाठी कौतुकाने
वापरला जातो. पण या एकाच वेळी सतरा गोष्टी करण्याच्या सवयीमुळे, किंवा तसं
करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे, कोणत्याच गोष्टीचा पूर्ण आनंद त्यांना
घेता येत नाही. अगदी स्वत:साठी वेळात वेळ काढून, झोपेचा वेळ कमी करून,
एखादी चालायला किंवा पळायला जाते. तेव्हा डोक्यात किती विचार असतात, किती
गणितं सुरू असतात याची यादी केली तर बरीच लांबलचक हाेईल. स्वयंपाक, डबे,
नोकरी करत असेल तर आॅफिसातलं काम, नसेल तर घरातली कामं, उद्या काय करायचं
असेल त्याची तयारी, कपडे कोणते घालायचे, ही अगदी सहज लक्षात येणारी.
त्याखेरीज आपण चालतोय त्याचा खरंच फायदा होणारेय ना तब्येतीला, सोबतीला
कोणी घेऊ या का, या रस्त्याने चालायचा कंटाळा आला तर काय, कपडे नक्की कोणते
घालावेत चालताना, सूर्यकिरणांचा फायदा घ्यायचा तर शक्य तितकं अंग उघडं
ठेवायला हवं, पण तसं कसं जमेल, हे आणखी काही. क्वचित आज चालल्याची पोस्ट
फेसबुकवर टाकू या, त्यावर काय लिहिता येईल बरं, हाही विचार असू शकतो. कोणी
चालताना फोनवर बोलून घेतात, कारण एरवी असा निवांत वेळच मिळत नाही. कोणी
गाणी ऐकतात. कोणी मैत्रिणीशी गप्पा मारत चालतात. काही नवराबायको एकत्र
फिरायला जातात, पण तेव्हाही अनेकदा बायकोच्या हातात मेथीची जुडी दिसते,
नुकतीच घेतलेली. या सगळ्यात आपण फिरतोय ती जागा कशी आहे, पहाटेच्या जादुई
वेळेची गंमत, पक्ष्यांचे आवाज, नुकतीच फुलू लागलेली फुलं, आकाशातले रंग हे
सगळं समोर असून दिसत नाही, जाणवतही नाही. मनुष्यप्राणी वर्तमानात फारसा जगत
नाही, तो भूतकाळात तरी रमलेला असतो किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत तरी
असतो,असं म्हणतात,ते पटतं यामुळे. पुरुषांच्या डोक्यातही अनेक विचार एका
वेळेला असतातच, पण त्यांचा गुंतवळ नसतो झालेला. एका वेळेला डोक्यात एकच
विचार, आहे तो क्षण जगणं हे प्रत्यक्षात आणायला कठीण आहे, मान्य. पण त्या
दिशेने प्रयत्न करायला हवाच.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-10722340727897720022018-12-05T18:35:00.000+05:302018-12-05T18:35:36.936+05:30धर्म आणि राजकारण<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9oijZK5TcZu2OUUhfkwdPGlE3B3ze5gnsmlngN0ALoPvTL0q7f-ZHDN8WwfRX1w2ERY3jyqHLM8Inz6P_0OTiIgifevN0vI4IQ84X0z6_O0S_Yac0ceVLGU4bd7WQMMQyHEz5XD4kINFg/s1600/ram.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="548" data-original-width="730" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9oijZK5TcZu2OUUhfkwdPGlE3B3ze5gnsmlngN0ALoPvTL0q7f-ZHDN8WwfRX1w2ERY3jyqHLM8Inz6P_0OTiIgifevN0vI4IQ84X0z6_O0S_Yac0ceVLGU4bd7WQMMQyHEz5XD4kINFg/s320/ram.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">image source - internet</td></tr>
</tbody></table>
देशभरात निवडणुकांचा माहोल आहे, शेजारच्या राज्यांत विधानसभेसाठी मतदान सुरू आहे, होणार आहे, निकालांची वाट पाहातायत सगळेच. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. कदाचित त्यासाेबतच राज्यातल्याही घेतल्या जातील. या पार्श्वभूमीवर “मंदिर वही बनायेंगे’ या नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षातल्या घोषणेने उचल खाल्लीय. १९९१-९२मध्ये याच घोषणेने देशभरात एक उन्मादी वातावरण तयार झाले आणि डिसेंबरमध्ये अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडण्यात त्याची परिणती झाली. त्यानंतरचे दोनेक महिने सुरू असलेल्या धार्मिक दंगली आणि मार्चमध्ये मुंबईत झालेले साखळी बाॅम्बस्फोट या घटना ज्यांनी अनुभवल्या त्यांच्यासाठी मंिदर वही बनायेंगे ही घोषणा नव्याने चर्चेत आल्याने, अस्वस्थता निर्माण झालीय. मुंबईच नव्हे तर छोट्यामोठ्या अनेक शहरांमध्ये हजारोंनी हे अनुभव घेतले आहेत. वरचा परभणीतला अनुभव हा अपवाद नव्हे, हे तुम्हालाही पटेल. धर्माच्या नावाखाली नक्की काय चाललंय, याचा अंदाज सामान्य माणसाला येत नव्हता, आता कदाचित येऊ लागलाय. औरंगाबादेत मागच्या आठवड्यात झालेल्या दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये हुसेन झैदी या मुंबईतील गुन्हेगारीचे वार्तांकन करणाऱ्या व त्यावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकाची मुलाखत झाली. त्यात त्याने सांगितलं की, दाऊद आणि छोटा राजन यांच्यातलं वैर धर्मामुळे निर्माण झालं अशी चर्चा सतत होते, हे धादांत खोटं आहे. जेव्हा पोलिसांची/कायद्याची भीती राजनला वाटली तेव्हा त्याने दाऊद देशद्रोही आहे असं सांगून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. नाहीतर तोवर सगळ्या कृष्णकृत्यांमध्ये तो सामील होताच की. ही गोष्ट झाली अट्टल गुन्हेगारांची. पण आज राजकारणीही, अगदी सर्व पक्षांचे, धर्माचा आसरा कधी नि कशासाठी घेतात, हे हळूहळू उघड होतंय. कोणी गोत्राची गोष्ट करतं, कोणी जानव्याची, तर कोणी लवाजमा घेऊन अयोध्येला जातं. दुष्काळ येऊ घातलाय, पाणी आणि चारा या दोहोंसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ घातलंय, दिल्लीत हजारो शेतकरी त्यांचे प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत म्हणून मोर्चा घेऊन गेलेत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, या सगळ्यावर यातलं कोणी का नाही बोलत? या गोष्टी इतक्या कमी महत्त्वाच्या असतात का? आपली आर्थिक स्थिती कोणतीही असो, कोणत्याही प्रदेशात आपला निवास असो या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो, त्याची आपल्याला जाणीव असते. मग राजकारणी आपल्यापेक्षा इतके वेगळे असतात का? का असतात?mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-45061205138001551732018-10-30T17:08:00.001+05:302018-10-30T17:08:59.577+05:30#metoo and forwards<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s1600/met.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="405" data-original-width="720" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s320/met.jpg" width="320" /></a></div>
फाॅरवर्डचं दुष्टचक्र<br />
<div style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; box-sizing: border-box; color: #494949; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 16px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 24px; margin: 0px; orphans: auto; padding: 0px; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
आतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या व्हाॅट्सअॅपवर, फेसबुकवर मीटू या मोहिमेवरचे अनेक विनोद आलेले असतील. आपली पहिली प्रतिक्रिया अर्थात हसण्याचीच असते. विनोद फारच आवडला तर अनेक जण तो फाॅरवर्डही करतात. क्वचित असं होतं की, एखादा विनोद वाचून हसू तर येत नाहीच, पण त्यामागची मानसिकता काय असेल असा प्रश्न मनात उत्पन्न होतो. बलात्कार या शब्दावरनं एका अत्यंत गाजलेल्या चित्रपटातला विनोद याच वर्गातला. विनोद आहे, सोडून द्या, इतका काय त्यावर विचार करायचा, आयुष्य इतकं गंभीरपणे नसतं घ्यायचं वगैरे मुद्दे ज्या व्यक्ती तक्रार करतात, किंवा आक्षेप घेतात, त्यांच्यासमोर मांडले जातात. पण जेव्हा असे विनोद सतत सोशल मीडियातनं लोकांच्या समोर येतात, ते सारखे सारखे शेअर केले जातात, तेव्हा मूळ घटनाच विनोदाने घेण्याजोगी आहे, असा संदेश नकळत लोकांपर्यंत पोचत असतो. आधीच बलात्कार, लैंगिक हिंसाचार, छेडछाड, या गोष्टी समाज म्हणून आपण फार गांभीर्याने घेत नाही. अशी तक्रार करणाऱ्या स्त्रीवरच दोषारोप करणारे आपण, तू तिथे गेलीसच कशाला, असेच कपडे का घातलेस, तूच ओढवून घेतलं असशील, असं तिच्यावरच उलटवणारे. मग असे विनोद वाचले की या समजुती आणखीनच दृढ होतात. जे लोक याकडे विनोद म्हणूनच पाहतात, त्यांना मुलींचा पाठलाग करणं, मागे लागणं, छेडछाड करणं, छळणं यात वावगं वाटत नाही. या सगळ्या कृती ओके आहेत, असाच संदेश या विनोदांमुळे त्यांच्यापर्यंत पोचत असतो. दुसऱ्या बाजूला, मीटूचं उदाहरण घ्यायचं तर, असे विनोद वाचले की ज्या व्यक्तींनी हे भोगलेलं असतं, ज्या तक्रार करण्याची हिंमत जुळवत असतात, त्यांना वाटतं की नकोच ते. आपल्याही तक्रारींवर असे विनोद होतील. आधीच बाॅलिवूडमुळे असा (गैर)समज मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे, अनेक वर्षांपासून, की एखाद्या मुलीच्या सतत मागे लागलं की ती तुमच्या प्रेमात पडणारच. त्यात अशा विनोदांची भर पडते.</div>
<div style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; box-sizing: border-box; color: #494949; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 16px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 24px; margin: 0px; orphans: auto; padding: 0px; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
<br style="box-sizing: border-box; margin: 0px; padding: 0px;" />मुक्ता जोशी या ठाण्यातल्या तरुण सायकाॅलाॅजिस्टने फेसबुकवर हा संदेश दिला आहे. जी व्यक्ती असा विनोद फाॅरवर्ड करते ती माझ्या अनुभवाकडे गांभीर्याने पाहू शकणार नाही, असं मुलींना वा अशा प्रकरणात त्रास झालेल्या व्यक्तींना वाटू शकतं, हे ती व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणतेय.</div>
<div style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; box-sizing: border-box; color: #494949; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 16px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 24px; margin: 0px; orphans: auto; padding: 0px; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
<br /></div>
<div style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; box-sizing: border-box; color: #494949; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 16px; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: 24px; margin: 0px; orphans: auto; padding: 0px; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 1; word-spacing: 0px;">
आपण याचा विचार कधी करणार आहोत?</div>
mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-68953145098106293582018-10-11T12:24:00.002+05:302018-10-11T12:24:53.719+05:30#metooचं वादळ<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s1600/met.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="405" data-original-width="720" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s320/met.jpg" width="320" /></a></div>
#metoo या नावाने अमेरिकेत सुरू झालेली, लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणारी चळवळ आज ना उद्या भारतापर्यंत पोहाेचणारच होती. भारतातल्या महिलांना त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचारांबद्दल, छळाबद्दल आवाज उठवावासा वाटला, याचं स्वागत करायला हवं. गेल्या आठवड्यात अभिनेता नाना पाटेकर याने १० वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर कसा छळ केला होता याची अभिनेत्री तनुश्री दत्ताने जाहीर वाच्यता केली आणि भारतीय महिलांनी इतके दिवस दाबून ठेवलेल्या अनुभवांवरचं झाकण उघडलं. यात मुख्यत्वे पत्रकार महिलांचा समावेश आहे. अजून बाॅलीवूडमधल्या फार कोणी तोंड उघडलेलं नाही. या पत्रकारांनी आरोप केलेल्या व्यक्तींमध्ये अनेक ज्येष्ठ/प्रतिष्ठित लेखक व पत्रकार आहेत, खेरीज एका विद्यमान मंत्र्याचाही समावेश आहे.<br /><br />गेले काही दिवस प्रसिद्धिमाध्यमांमधून याची चर्चा होऊ लागल्यावर आताच का या बायका बोलायला लागल्यात, इतके दिवस का गप्प बसल्या होत्या, हाॅट म्हटलं म्हणून काय लगेच लैंगिक अत्याचार झाले का, मग काय आम्ही बायकांशी बोलायचंच नाही का, पुरुष असं करणारच वगैरे प्रतिक्रियांचा मारा अपेक्षेप्रमाणे होऊ लागला. त्या म्हणताहेत ते खरं कशावरून, त्या खुन्नस कशावरून काढत नसतील? खोटे आरोप केले तर पुरुष बिचारा आयुष्यातून उठेल, अशी खुसपटं काढली गेलीत. तुम्ही मोकळंढाकळं वागता, हसता खेळता, मग पुरुषांना असं वागायला आयतं कारण मिळतं, अशी कारणमीमांसाही पुढे केली जातेय. दोष बायकांचाच आहे हा या सगळ्याचा मथितार्थ. दुर्दैवाने बायकाही असं म्हणण्यात मागे नाहीत. आपल्या पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक समाजात यापेक्षा वेगळं काही अपेक्षित नाही. शतकानुशतकं बाई ही पुरुषाची मालमत्ता, तिच्या शरीरावर त्याचा हक्क, याच कल्पना आपल्याकडे आधारभूत होत्या.<br /><br />
'दिव्य मराठी'त कविता महाजन यांनी त्यांच्या "स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास' या सदरातून हे विस्ताराने मांडल्याचे वाचकांच्या आठवणीत असेलच. बायका हेच ऐकत, पाहत जगत आल्याने त्यात काय विशेष? असं त्यांना वाटल्यास नवल नाही. त्यात बायकांचा दोष नाही, त्या ज्या समाजात वाढल्या आहेत, त्याचा आहे. पुरुष टक लावून पाहतात यात काही गैर नाही, असं शंभरातल्या ९९ बायकांना वाटतं. कारण त्या हाच अनुभव घेत समाजात वावरत आल्या आहेत. हे चुकीचं आहे असं हाेता कामा नये याची जाणीव मीटू - मीसुद्धा (असा अनुभव घेतला आहे) - मोहिमेने करून दिली. म्हणून ती मोलाची आहे.<br /><br />आठवडाभरात अनेक बायकांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अशा छळाची वर्णनं केली आहेत. त्यातली अनेक निव्वळ अंगावर काटा आणणारी आहेत. त्यातले काही अनुभव वीसेक वर्षांपूर्वीचे आहेत, काही अधिक जुने. त्या काळात पत्रकार महिलांची संख्या फार कमी होती, त्यामुळे या मुली आपापल्या घरच्यांचा विरोध न जुमानता नोकऱ्या करत होत्या. त्यांना असे अनुभव आल्यावर अनेकींनी नोकऱ्याच सोडल्या किंवा सोडाव्या लागल्या. त्या तेव्हा कोणाशीच बोलल्या नव्हत्या असं नाही. अनेकींनी ज्येष्ठ सहकाऱ्यांना अशा घटनांबद्दल सांगितलंही होतं. परंतु त्यांची दाद घेतली गेली नाही. तेव्हा बहुतेक कार्यालयांमध्ये एचआर विभाग नव्हते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविषयी कायदा नव्हता. विशाखा मार्गदर्शक तत्त्वं त्या मानाने नंतर आलेली. (अजूनही अनेक संस्था/कार्यालयं/आस्थापनांमध्ये या तक्रारींची चौकशी करणारी समिती नाहीच.) त्यामुळे तक्रारीची तशी तड लागणंही कठीणच होतं. त्यातच हे सर्व पुरुष या महिलांचे "बाॅस' होते. त्यांच्या नोकऱ्या, त्यांना मिळणाऱ्या असाइनमेंट्स, सगळं त्यांच्या हातात होतं. सत्ता हातात असली की माणूस भ्रष्ट होतो म्हणतात, ते वास्तव असल्याचं या सगळ्या प्रकरणांमधून दिसून येतं.<br /><br />आता काही दिवस अनेक तक्रारी समोर येतील. त्यातल्या काही पोलिसांत जातील. चौकशा होतील. क्वचित कोणाला शासनही होईल. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या! हे कसं टाळता येईल ते पाहणं ही तातडीची गरज आहे. निव्वळ कायदे करून, पोलिसांत वा न्यायालयात दाद मागून हे प्रश्न सुटणारे नाहीत. एक नक्की की, यामुळे पुरुषांनी घाबरून जायची गरज नाही, तुम्ही कोणत्याही स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला नसेल, तिच्या शरीरावर टिप्पणी केली नसेल, तिला धमकावलं नसेल तर तुम्ही योग्यच वागत आहात. फक्त हे वागणं विशेष नव्हे, तसंच अपेक्षित आहे हे ध्यानात ठेवलं की झालं. मात्र तसं वागत नसाल तर काळजी घ्यायला हवी. आता महिला गप्प बसणार नाहीत.<br />
(दै. दिव्य मराठीच्या ११ आॅक्टोबर २०१८च्या अंकातील अग्रलेख) mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-48669752709987387672018-10-09T14:59:00.000+05:302018-10-09T15:00:40.026+05:30मनुष्यरूपातली स्त्री<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s1600/met.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="405" data-original-width="720" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_scWHUjD28P5wWsbCGXcNbSrl6ZT72tAO4iTh1D7nKE6DByTos5oniH56aFp2awtNBfuLAhKwHExKZ-lHfI3Y8BhbSlvncj-KNs5ENZGE0T4xLq_DawI_4WafSGdO1a402P5hNk9_xuXz/s320/met.jpg" width="320" /></a></div>
भारतात सगळ्या प्रांतांत एकाच रूपात साजरा केलेला सण म्हणजे नवरात्र उद्या सुरू होतोय. या नऊ दिवसांत सगळीकडे स्त्रीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. त्या निमित्ताने सगळ्या प्रसिद्धीमाध्यमांमधून या सगळ्यावर चर्चा होईल, त्यातून अनेक कर्तबगार महिलांची ओळख करून दिली जाईल. नवरात्राच्या काळातच अनेक महिलांवर बलात्कार होतील, त्यांचा मानसिक/शारीरिक छळही होईल. त्याच्याही बातम्या वाचनात येतील. एकीकडे, अमेरिकेत वर्षभरापासून गाजत असलेल्या मीटू <a href="https://www.facebook.com/hashtag/metoo?source=feed_text">#metoo</a> या मोहिमेसारख्या, भारतातल्या लैंगिक छळाविषयीच्या बातम्या आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्स तीनचार दिवसांपासून गाजत आहेत. दुसरीकडे, दिनकर मनवर यांच्या एका कवितेतल्या ओळींवरून रणकंदन माजलंय. त्यावरच्या चर्चांमधनंही अजून पुरुष स्त्रीला, तिच्या शरीराला त्यांच्या मालकीचं समजतात, हेच दिसतंय.<br />
<br />
भारतात आपण विविधतेत एकता असं लहानपणापासून शिकत आलोय, हीच ती विविधता का, असं वाटू लागतं. हे सगळं नकारात्मक वाटू शकतं, पण त्यावर चर्चा करणं, बोलत राहाणं, त्यातल्या वेगवेगळ्या लहानमोठ्या मुद्द्यांचे उल्लेख करणं, आवश्यक आहे. कारण हे वास्तव असलं तरी फक्त हेच वास्तव नाही, हे तरुण पिढीला कळायला हवंय. काळजी घेणं, सुरक्षित राहाणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण निरोगी सुदृढ आनंदी नातीही स्त्रीपुरुषांमध्ये शक्य आहेत, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवंय.<br />
<br />
अापल्या सहवासात येणाऱ्या, परिचय होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपलं नातं तयार होतंच असं नाही, पण तसं तयार होणारच असेल तर ते सकारात्मक करणं ही दोघांची जबाबदारी आहे, दोघांवर अवलंबून आहे, ते सहज शक्य आहे हे आता शाळामहाविद्यालयांत असणाऱ्या मुलामुलींना कळायला हवंय. ती जाणीव आपण मोठेच करून देऊ शकतो. चित्रपट, टीव्हीवरच्या मालिका, फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सअॅप यावर जे असतं ते समाजाचं प्रतिबिंबच असतं, पण काही टक्केच. धर्म, राजकारण यांची एक जागा आपल्या आयुष्यात आहे, पण मर्यादित. त्यापेक्षा वेगळं वास्तवही असतं, असायला हवं हे सांगायची हीच योग्य वेळ.<br />
<br />
नवरात्रात स्त्रीचं देवीरूप पूजण्यापेक्षा तिचं मनुष्यरूप समजून घेणं, ते स्वीकारणं अधिक मोलाचं ठरेल.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-43906874045504874982018-10-06T17:04:00.002+05:302018-10-06T17:05:21.960+05:30#metoo in India<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKajOLJrb4VA-OApmqdYDSVAcnZ72hu845_80LZwUftLythn-YiRys6esRhy-caccr8dSuqVCTTOCUvTe9yuM2OeMzfHrNGdO5JyGvSh6mPrRJdPVb-8lk_B7209nwFzdB9kMfUzC8IJfi/s1600/met.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="405" data-original-width="720" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKajOLJrb4VA-OApmqdYDSVAcnZ72hu845_80LZwUftLythn-YiRys6esRhy-caccr8dSuqVCTTOCUvTe9yuM2OeMzfHrNGdO5JyGvSh6mPrRJdPVb-8lk_B7209nwFzdB9kMfUzC8IJfi/s320/met.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">image from the internet</td></tr>
</tbody></table>
<br />
माझा तरुण मित्र आशय गुणेने फेसबुकवर हा प्रश्न विचारला आहे.<br />
''ट्विटर वर सुरू असलेल्या #MeToo बाबत मला एक प्रश्न पडला आहे. जर उद्या एखाद्या मुलीने माझ्यावर सूड म्हणून एका दुसऱ्या मुलीला चॅट मध्ये मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला किंवा तिला स्पर्श केला, मिठी मारली असं लिहिलं. तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रकाशित केला आणि 'आशय गुणे' हे नाव अधोरेखित केलं. आणि पुढे मिळणाऱ्या retweet किंवा shares द्वारा ती बदनामी वाढवली. तर, इथे माझ्या लिस्टमध्ये असलेल्या, मी कसा आहे हे माहिती असलेल्या, माझ्याशी संपर्कात आलेल्या स्त्रिया, मुली, मुलं, पुरुष माझ्या बाजूने उभी राहतील का? मतं मांडायच्या आधी मला एकदा विचारतील का? की मला लेबल लावतील? आणि मुख्य म्हणजे, पर्सनल चॅटचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून मान्य करतील का?''<br />
<br />
हे वाचून मी काहीशी चिंतेत पडले. आतापर्यंत असा विचारच नव्हता केला. <br />
त्याला हे उत्तर दिलं ''कोणताही पुरुष ९९ जणींशी सभ्य पण एका महिलेशी असभ्य वागू शकतो, यावर माझा विश्वास आहे, अनुभवाअंती मिळालेला. म्हणजे असा आरोप झालेले पुरुष त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वजणींशी असे वागत नसावेत. त्यामुळे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकींना या आरोपांमध्ये तथ्य वाटणार नाही. मुद्दाम कोणी खोडसाळपणाच केला तर तो तक्रार केल्यानंतरच्या चौकशीत उघड होईलच. खोटं बोलणं आणि ते निभावणं कठीण असतं. पण तू किंवा इतर कोणीही पुरुष असं वागणारच नाही, याची खात्री मी देऊ शकणार नाही, देऊ धजावणार नाही, इथवर मी गेल्या काही वर्षांत पोचले आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, मान्य. पण मी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री १०० टक्के खरं/खोटं बोलतेय, असं मी त्या घटनेची साक्षीदार असेन तरच म्हणू शकेन ना? हे सगळं अतिशय खेदजनक आहे हे निश्चित.''<br />
<br />
अशी एखादी तक्रार ऐकली की अनेक पुरुषांचं अशी प्रतिक्रिया येते की,
आम्ही त्याला इतकी वर्षं ओळखतो, तो इतका मोठा लेखक/अभिनेता/गायक ...
(अनुभवानुसार गाळलेल्या जागा भरा) आहे, तो असं करूच शकत नाही. अरेच्चा.
ओळखीतल्या व्यक्तीचं नाव आलं म्हणून इतका धक्का का बसतो बरं? अमुक एक माणूस
तसं वागू शकणार नाही, असं इतरांना वाटत असतं. एखाद्या स्त्रीशी ती व्यक्ती
चुकीच्या पद्धतीने वागलेले असूच शकते. तुम्ही तसं पाहिलेलं नसतं म्हणून
लगेच त्या आरोप करणाऱ्या स्त्रीवर शेरेबाजी कशाला? मी अशा प्रकारचा लैंगिक
छळ किंवा sexual moves म्हणू, किंवा cornering अनेकांकडून सहन केलाय, त्यातले बहुतेक लोक
समाजात प्रतिष्ठा वगैरे असलेलेच होते. कोणताही पुरुष माझ्याशी, त्याच्या
आईशी, बहिणीशी, नात्यातल्या स्त्रियांशी कसा वागतो, यावर तो त्याच्या
आॅफिसातल्या सहकारी स्त्रीशी किंवा एखाद्या अपरिचित बाईशी एखाद्या विशिष्ट
परिस्थितीत कसा वागेल याचा अंदाज बांधणं चुकीचं आहे, असं माझा आजवरचा अनुभव
सांगतो.<br />
<br />
<br />
पण परिस्थिती अवघड होत चाललीय हे निश्चित. खरंखोटं यांमधली रेषा इतकी पातळ झालीय, ती इकडेतिकडे सरकतेही प्रसंगी. काही खोटे आरोप होत असतीलही. परंतु ते अपवाद, नियम नव्हेत. जसं सगळ्या कायद्यांचा गैरवापर होत असतो, तसंच हे. पण या सगळ्यामुळे वातावरण गढूळतंय, हे लक्षात येतंय. स्त्री व पुरुषांमध्ये निकोप, निरोगी संबंध किंवा interaction शक्य आहे, ती बऱ्याच अंशी तशीच असते. पण अशाही व्यक्ती आहेत ज्या प्रामुख्याने आपल्या प्रतिष्ठेचा, सत्तेचा, अधिकाराचा गैरवापर करतात. प्रत्येक वेळी मुली/महिलांना तिथल्या तिथे झटकणं शक्य होत नाही, अनेकदा फक्त काहीतरी चुकतंय इतकंच कळत असतं. कालांतराने लक्षात येतं की, ते ठार चुकीचं होतं. मग तेव्हा वाटतं, आता आवाज उठवून काय उपयोग. अनेकदा आवाज उठवून तो अनेकांनी कानाआडही केलेला असतो. मग नंतर कधीतरी परिस्थिती सकारात्मक वाटते, आपलं म्हणणं कोणी ऐकेल अशी शक्यता दिसते, तेव्हा या घटनेला वाचा फोडली जाते.<br />
<br />
आपल्याकडे आत्ता हे लोण पसरलंय. काल काही खूपच मोठी नावं आरोपी म्हणून समोर आलीत. काही जणांना कदाचित भीती वाटू लागली असेल की, आपलंही नाव कोणी उघड करतंय की काय. काही जणींच्या जुन्या कडवट आठवणी डाेकं वर काढतील. काही काळ तरी या घुसळणीत जाईलसं दिसतंय. बायांनो काळजी घ्या, पुरुषांनो, तुम्हीही काळजी घ्या कसं वागताय याची, यापलिकडे काही म्हणता येईलसं वाटत नाही.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-60565060286383015542018-10-04T14:51:00.000+05:302018-10-04T14:51:08.897+05:30निरोप<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh5bzJhTWhtJBOhNYu-J4zIAw96ndpjE5SeTeDlcqDE6tjewdz-iSJEXl04cBKfSZ2IhHvu5KGXdk4oCFOovKuC_3XpsciwsLc3U-Rdd_AZTMVrpNfCa4odKtC83bnzHr4VFlfYNK2bDmm1/s1600/pg2kavita2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1365" data-original-width="1365" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh5bzJhTWhtJBOhNYu-J4zIAw96ndpjE5SeTeDlcqDE6tjewdz-iSJEXl04cBKfSZ2IhHvu5KGXdk4oCFOovKuC_3XpsciwsLc3U-Rdd_AZTMVrpNfCa4odKtC83bnzHr4VFlfYNK2bDmm1/s320/pg2kavita2.jpg" width="320" /></a></div>
कविताची आणि तुम्हा सर्वांची ओळख पाच वर्षांपूर्वीपासूनची. बदलापूरची बखर हे अस्सल आधुनिक ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारं सदर २०१३साली २७ सप्टेंबर रोजी सुरू झालं होतं. सुर्वात असंच त्याचं शीर्षक होतं. बदलापूर या गावातल्या इरसाल व्यक्तींचं अत्यंत जिवंत रसरशीत वर्णन आणि आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही लहान वा मध्यम आकाराच्या गावांमध्ये राहणाऱ्यांना आपलंसं वाटेल अशा त्यातला घटना तिने खुबीने रंगवल्या होत्या. दोन वर्षं ती हे सदर चालवत होती. असंख्य वाचक तिला मेलवर वा फोन करून हे गाव कुठेय, त्यातले कुंथलगिरीकर महाराज खरंच आहेत का, आम्हाला त्यांना कसं भेटता येईल, असं विचारत. यापेक्षा मोठी पावती काय असू शकते कोणत्याही लेखकासाठी?<br />गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून कविता स्त्री जीवनाचा इतिहास आपल्या समोर मांडत होती. शेकडो वर्षांचा काळ काही शब्दांत मांडत असली तरी त्यासाठी ती प्रचंड वाचत होती, नोंदी काढत होती. डिसेंबरपर्यंतचे लेख तिने पाठवून दिलेले आहेत, इतकं शिस्तबद्ध लिखाण ती करत होती. लिखाण हेच तिचं पोटपाण्याचं साधन होतं. पूर्णवेळ लेखक असणाऱ्या व्यक्ती भारतातल्या कोणत्याही प्रांतात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील, कविता त्यांतलं एक महत्त्वाचं नाव होतं. तिच्या ब्र आणि भिन्न या कादंबऱ्या स्त्रीवादी भूमिकेतून मांडलेल्या. ती कट्टर स्त्रीवादी होती, पण कडवट नव्हती. कुहू हे बहुमाध्यमी पुस्तक मुख्यत: मुलांसाठी होतं पण मोठ्यांनाही अर्थात ते आवडणारंच. मराठीतला हा असा पहिलाच प्रयोग. इतर भाषांमधून मराठीत अनुवादात तिचा हातखंडा होता, तिचं शब्दभंडार प्रचंड होतं. ती एकाएका शब्दावर मेहनत घ्यायची. तिने केलेले अनेक अनुवाद प्रसिद्ध आहेत. कविता हे तिचं नाव कसं यथायोग्य होतं, अशा उत्कट, सखोल, चिंतनात्मक कविता तिने लिहिल्या. तिने कविताच केल्या असत्या तरी चाललं असतं, इतकं सामर्थ्य त्यांमध्ये होतं. कादंबऱ्या लिहिताना तिने अनेक वर्षं त्यांवर काम केलं होतं, त्यासाठी प्रचंड पायपीट केली होती, शेकडो माणसांना भेटली होती, त्यांचं आयुष्य प्रत्यक्ष जगली होती. आदिवासी आणि वेश्या, अशा परीघावरच्या माणसांशी तिने स्वत:ला जोडून घेतलं होतं. एक नाटक काय ते तिनं लिहिलं नाही, बाकी साहित्याचे बरेचसे प्रकार तिने हाताळले आणि त्यांवरचं प्रभुत्वही सिद्ध केलं. तिचा ब्लाॅगही कायम अद्ययावत असे. हे सगळं वयाच्या केवळ ५१व्या वर्षापर्यंत तिने साध्य केलं होतं. एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली की, तिच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं म्हणण्याचा प्रघात आहे. बहुआयामी कविताच्या बाबतीत ते शब्दश: खरं आहे. अनेक लेखनप्रकल्पांची मूलभूत तयारी तिने करून ठेवली होती, त्यासाठीच्या संशोधनसाहित्यात बराच पैसा गुंतवला होता. <br />विनोद हाही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होता, ती इतकी खळखळून हसायची की, ते हसू इतरांच्याही ओठावर यायचंच. तिच्यातलं लहान मूल तिने दडवून ठेवलं नव्हतं, ते कायम काहीतरी खोड्या काढत असायचं, खट्याळपणा करत असायचं. <br />एका मोठ्या अपघातातनं ती वाचली पण तिच्या शरीरावर त्याचा मोठा आघात झालेला होता. अशा काहीशा नाजूक शरीरातला मेंदू मात्र अव्याहत विचार करणारा, नव्याची आस धरणारा, सर्जनाकडे धावणारा होता. ती लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली असली तरी मूळची ती आर्टिस्ट. चित्रकला हा तिचा आवडीचा विषय होता. कॅनव्हास आणि कापड या दोन्हींवर तिचा ब्रश उत्तम चालत असे. स्वयंपाककला हा तिचा आणखी एक प्रेमाचा विषय. ती स्वयंपाकघरात असंख्य प्रयोग करत असे. तिची पाककृतींचीही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.<br />गेल्या वर्षी याच दिवसांत सोशल मीडियावर काही व्यक्तींनी तिची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतली होती. अनेक दिवस दुर्लक्ष करूनही प्रकरण मिटत नाही म्हटल्यावर मात्र तिने न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोन वेगळे खटले प्रलंबित आहेत. सोबतीची खात्री या नावाने तिने ही मोहीम सोशल मीडियावर लावून धरली होती आणि तेव्हा अनेक तथाकथित जवळच्या मित्रमैत्रिणींनी सोबत न दिल्याने ती प्रचंड व्यथितही झाली होती. परंतु आपण न्यायालयात गेलोय, एक ना एक दिवस आरोपींना शिक्षा होईल, याची तिला खात्री होती. या निमित्ताने सोशल मीडियावर स्त्रियांचा कसा छळ होताे, हेही उघडपणे बोललं जाऊ लागलं, हे मोलाचं. या सगळ्या प्रकरणाचाही भयंकर मानसिक त्रास तिने भोगला होता.<br />कविताने फार पूर्वीच, तिच्या अपघातानंतर, तिचं कायदेशीर मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. यंत्रांच्या साह्याने मला जगवत ठेवायचं नाही, असं तिने त्यात स्पष्ट नमूद केलं होतं. इतकी विचारांची आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याइतकी स्पष्टता दुर्मीळच.<br />कविता तिच्या सदरातल्या लेखांच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत आपल्याला भेटतच राहील. नंतरही तिची अनेक पुस्तकं, कविता, चित्रं यातनं ती आसपास असेलच. तिची आठवण आपणच जागती ठेवू शकताे.<br /><br />तुझी सगळी तगमग<br />मुरवून घेईन मी तनामनात<br />आणि मग<br />तुझ्या मुठीतून निसटून जाईन<br />हळूहळू वाळूसारखी<br />ओघळेन तुझ्या डोळ्यातून नकळत<br />वाहणाऱ्या पाण्यासारखी<br /><br />मी जाण्यापूर्वी हसतमुख<br />एक क्षणभर समोर उभा रहा माझ्या<br />निरोप दे<br />चिमूटभर शांततेचं बोट<br />माझ्या कपाळावर टेकव.<br /><br />- कविता महाजन<br />
(कविता महाजन मी संपादित करत असलेल्या मधुरिमा या पुरवणीत सदर लिहीत. एक सदर दोन वर्षं चाललं, दुसरं सुरू असतानाच त्यांचं अकाली निधन झालं. त्यांना वाहिलेली ही आदरांजली.)mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-47564013680884849782018-10-04T14:45:00.000+05:302018-10-04T14:47:18.793+05:30Farewell Kavita.<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3wC3YzSWuqEqgy86Tl7_dxvnWshz3hbIfESUfDaYG36WOlMTWx8qCvnsRKcmZYNR5N0oqWxYhwZokNvot-ab_qiSE4POnGI755A6NLKDk6ci86OhRQZyPR-XZ7LkuRy9Zz2d-021O5sYD/s1600/pg2kavita2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1365" data-original-width="1365" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3wC3YzSWuqEqgy86Tl7_dxvnWshz3hbIfESUfDaYG36WOlMTWx8qCvnsRKcmZYNR5N0oqWxYhwZokNvot-ab_qiSE4POnGI755A6NLKDk6ci86OhRQZyPR-XZ7LkuRy9Zz2d-021O5sYD/s320/pg2kavita2.jpg" width="320" /></a></div>
Kavita Mahajan was one of those rare professional authors, whose primary source of income is writing. She was also an artist, a trained one at that. She had a number of canvases at home, she also painted sarees once upon a time. She wrote novels, short stories, books for children, did translations into Marathi, updated her blog regularly. Most importantly, she wrote soul stirring poetry. She wrote regular columns for Divya Marathi, Lokmat, ABP Maza, etc. The topics varied from history of the women to current topics to folklore. She was interested in cooking and has published a book or two of recipes. She had a great sense of humour which was present in her columns, books, facebook posts and personal chat sessions. She did a lot of reserach before writing anything, the written word was sacred for her. A multitalented person who took on a mini celebrity when he harassed her on social media. She took the fight to its logical conclusion by dragging him to the court of law. <br />
I was her editor for nearly four years. She wrote, 2013-15, one column called 'Badlapurchi Bakhar' for Madhurima, the weekly supplement for women that I edit; and "Streejanma mhanoni na vhave udas' 2017-18. Bakhar was about the interesting people of an imaginery town called Badlapur, with characters which spoke the local language. Her characters were so real for the readers that many emailed her to ask for the adress of Kunthalgiri Maharaj, a fake baba. She spoke a Marathi that was laced with the Marathwada accent, not quite the proper-Puneri puritan Marathi. But she wrote the perfect Marathi. I hardly ever had to alter a character in the four years. Even her facebook posts were grammatically all correct. <br />
Kuhoo, a multidimensional book, was her dream project for which she gave her time, hard work, and funds as well. She was disheartened when it didn't sell well. She had recently released the content of Kuhoo on Youtube. It's a treat for kids and parents, both.<br />
Kavita had a number of procects in the pipeline, she had invested in books and reference material for the same. She was looking to do some creative work, like painting, as a break in the intellectually challenging work that she planned to do. <br />
Kavita was a talented and hardworking translator as well. She has brought Rajai, by Ismat Chugtai, into Marathi. A recent poetry collection written by Vedika Kumarswamy, a sex worker, has a foreward by Kavita, she also edited it. It runs more than 60 pages and she had referred to many books and research papers to write that. It is an important document explaining how we as a society have looked at the sex workers over a period of time. <br />
Bra ब्र was her first novel. The reference to this word is rooted in the patriarchical society, explaining how the women have always suffered in silence. Her next novel Bhinna (different) dealt with the sex workers, HIV, pimps, etc. She had stayed in the villages, in the bastis, among the adivasis, for both these novels and spent a lot of time trying to understand and internalise the lives of those living on the margins.<br />
Kavita was a passionate human being, she would shower love and praise and abuses with equal panache. She lived life on her own terms, and as was made clear by her daughter's letter last night, she died on her own terms. She had clearly stated that she didn't want to continue living on a ventilator, that too many years ago. Her daughter and father respected that decision after consultation with the doctors.<br />
I had met her a few times, the most recent was on 9th september. She had shifted to Pune some days back. She had dreams and plans of things to do in Pune. Alas.<br />
Will miss her hearty laughter, her intense poetry, her long researched articles, her sense of timing, her chiding me to write a book! Not in any particular order.(This was published on netive.in a day after Kavita Mahajan breathed her last in a Pune hospital on 27.09.2018)mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-13420265860104542252018-09-25T15:20:00.000+05:302018-09-25T16:00:18.539+05:30माहेरच्या वैद्याचं कौतुक<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhX5BB3MMkDkz9XEjmE-pQvQ1DGwjPtWaqJ1g5kS6TKnMiboWLewC10BW0BKgdthhWIBlVsiI5QJd-2ZExozvgz4lfGoyAEe1BmZx7CrCRMEGfuswDJQqM3MXGxO71HEKTzvHjTFYKiQuVr/s1600/book.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1600" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhX5BB3MMkDkz9XEjmE-pQvQ1DGwjPtWaqJ1g5kS6TKnMiboWLewC10BW0BKgdthhWIBlVsiI5QJd-2ZExozvgz4lfGoyAEe1BmZx7CrCRMEGfuswDJQqM3MXGxO71HEKTzvHjTFYKiQuVr/s320/book.jpg" width="320" /></a></div>
<br />
नमस्कार, फक्त पुण्यातच असू शकतो अशा छान संध्यासमयी आपण जमलो आहोत. शंतनूच्या पुस्तकाच्या निमित्ताने. महिन्याभरापूर्वी त्याने फोन केला होता. पुस्तकाचं नाव पाळीमिळी गूपचिळी असंच हवंय, पण... पण अनेक लोकांनी त्याला ते नाव नको, पाळी हा शब्द कसा टॅबू आहे, वाचक दुकानात किंवा ग्रंथालयात जाऊन पुस्तक मागताना लाजतील, वगैरे वगैरे भीती घातली होती. तेच नाव योग्य आहे, असं त्याला मनापासून वाटत होतं. तुला काय वाटतं, असं त्याने विचारलं. म्हटलं, नाव हेच हवं. दुमतच नाही. नाव बदलणं म्हणजे एका दुष्टचक्रासारखं हाेईल. लोकांच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताना आपण नकळत त्यालाच पुष्टी दिल्यासारखं होईल. त्याच्याशी बोलतानाच पुलंच्या हसवणूकचं मुखपृष्ठ डोळ्यांसमोर आलं अचानक. म्हटलं, पा आणि आ, असा खेळ करता येईल. त्याला तो पटला आणि आज पुस्तक त्याच नावाने आपल्यासमोर आहे. ही चर्चा सुरू असताना मला चीनी कम चित्रपटातलं एक दृश्य आठवत होतं. अमिताभ बच्चन तबूला भेटायला जाणार असतो, त्याआधी निरोध विकत घ्यायचा असतो त्याला. त्यासाठी तो औषधांच्या दुकानात जातो तिथली त्याची गडबड, चलबिचल आपल्या या पुस्तकांच्या वाचकांच्या चेहऱ्यावर मला दिसायला लागली, आणि हसू फुटलं. खंतही वाटली किंचितशी. निरोध, सॅनिटरी नॅपकिन विकत आणायचं म्हटलं तरी जर आपण असे शरमलेले असू, पाळी हा शब्द उच्चारायलाही आपली जीभ धजावत नसेल, तर आपल्या सामाजिक स्वास्थ्याचं काही खरं नाही ना?<br />
शंतनूच्या लेखांचं मोल या सामाजिक परिस्थितीमुळे अधिकच वधारतं. तो स्त्रीच्या शरीराला जे काही आजार होऊ शकतात, त्यात ज्या काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यांबद्दल मोकळेपणाने लिहितो. कोणतंही लिखाण चांगलं आहे, असं आपण कधी म्हणतो, तर ते मुळात वाचनीय असायला हवं. कोणताही लेखनप्रकार असो, ललित, कथा, कादंबरी, कविता, निबंध, सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांत त्याने वाचकाची पकड घ्यायला हवी. आणि शेवट गाठेपर्यंत त्याची उत्सुकता, त्याचा वाचनातला रस कायम राहायला हवा. शंतनूचे सगळे लेख या कसोट्यांवर खरे ठरतात. त्याची शैली खुसखुशीत आहे, प्रसंगी वाचकाला चिमटेही काढतो तो हलकेच. पीसीओडीवरच्या लेखात तो म्हणतो, प्रत्येक बाईच्या शेजारी एक बाई असते. ही शेजारची बाई म्हणते, बापरे, तू गोळ्या घेतेस? हे वाचून मी स्वत:ला एक चिमटा काढला, आणि म्हटलं, परत कोणाला विचारशील का असं, बापरे तू गोळ्या घेतेस. थोडं सहन करायचं, किंवा पथ्य, व्यायाम या गोष्टींनी सुधारतंय का पाहायचं, गोळ्या घेणं टाळायचं, ही माझीही विचारसरणी. त्याचे लेख पुरवणीसाठी घेताना मी पहिल्यांदा वाचते तेव्हा अनेकदा खळखळून हसलेय. कुटुंबनियोजन, लग्नाची पहिली रात्र या विषयावरचा त्याचा लेख हा खुसखुशीत विनोदाचा उत्तम नमुना आहे. डाेंबलाचे गर्भसंस्कार या लेखातून तो थेट विषयाला भिडतो आणि चूक ते चूक, हे सुनावतो. आरोग्यविषयक लिखाण रंजक कसं असू शकतं, याचं हे पुस्तक म्हणजे उत्तम उदाहरण. पुस्तकाच्या उपयुक्ततेबद्दल तर बोलावं तितकं कमीच. आमच्या दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा या महिलांसाठीच्या साप्ताहिक पुरवणीत दर पंधरा दिवसांनी हे लेख प्रसिद्ध होतात. फेसबुकवर शेअर केला लेख की, तो अनेक जण वाचतात, शेअर करतात. आमची आवृत्ती मुंबईपुण्यात नाही, तुलनेने लहान शहरांमध्ये आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथल्या शहरांमधले स्त्रीरोगतज्ज्ञ या लेखांच्या प्रती काढून आपापल्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना वाचायला ठेवतात. व्हाॅट्सअॅपवरही लेख प्रचंड फिरतात. त्यातल्या अनेक गोष्टी सर्वसामान्य वाचकाला वरवर माहीत असतात, ऐकलेल्या असतात, पण त्यातले तपशील तेही वैद्यकीय बोजड किंवा तांत्रिक भाषा न वापरता लिहिणं हे शंतनू खुबीने जमवतो. कारण भाषा अवघड वाटली, डोक्यावरून गेली तर लिखाण वाचनीय राहात नाही. शंतनूतल्या लेखकाला हेे निश्चितपणे माहीत आहे की, तो ज्या वाचकांसाठी हे लिहितोय, त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रबंधांसाठी वापरली जाणारी भाषा वापरणं योग्य नाही. परंतु विषय सुलभ करतानाही त्यातलं वैद्यकशास्त्र शाबूत असतं, त्याला कुठेही धक्का पोचलेला नसतो. <br />
शंतनूच्या मराठीवरच्या प्रभुत्वाचं कौतुक केलेलं त्याला आवडत नाही, कारण मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तीने चांगलं मराठी लिहिलं तर त्यात काय विशेष असं त्याला वाटतं. हा त्याचा नम्रपणा आहे, इतकंच मी सांगू शकते. पुरवणीसाठी येणारे हजारो लेख मी आतापर्यंत वाचले आहेत, त्या बळावर मी हे प्रमाणपत्र त्याला देतेय.<br />
हे सगळं कौतुक तुम्हा सर्वांना जरा जास्त वाटेल. पण माझा नाइलाज आहे, कारण तो वाईचा, माझ्या माहेरचा वैद्य आहे.<br />
धन्यवाद.<br />
( दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात झालेल्या डाॅ. शंतनू अभ्यंकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केलेलं भाषण.) mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-59188820908751253592018-09-20T13:46:00.000+05:302018-09-20T13:46:09.762+05:30कोल्हापूरची खाद्ययात्रा Kolhapur Foodies<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
दोन दिवस कोल्हापुरात होतो. मुंबईतल्या
विसर्जनाचा त्रास एकदा तरी टाळावा म्हणून मी गेली दोनतीन वर्षं बाहेर पडते
या दिवसांत. या वेळेस दोनच दिवस जाता येणार होतं. मग कोल्हापूरला जायचं
ठरवलं. सह्याद्री एक्स्प्रेसची कन्फर्मड तिकिटंही मिळाली जायचीयायची. या
भटकंतीत प्रेक्षणीय स्थळांइतकीच महत्त्वाची आणि अविस्मरणीय होती खादंती. <br />
airbnbवरनं एक फ्लॅट बुक केला, त्याच इमारतीत मैत्रिणीची आई राहाते तिने
सुचवला होता. या काकू निवृत्तीनंतर वेळ जावा म्हणून डबे करून देतात, किंवा
पदार्थांच्या आॅर्डर घेतात. झेपेल तितकंच करतात, त्यांचा वेळ छान जाईल
इतकंच काम घेतात. त्यांच्या हाताला उत्तम चव आहे याची प्रचिती पोचलो त्या
सकाळीच आली. गरमागरम भाजणीचे वडे खाऊन. हाताला एक थेंबही तेल नव्हतं,
खुसखुशीत वडे तोंडात विरघळत होते. मुंबईला यायच्या आधीही त्यांच्याचकडे
खिचडी खाल्ली, मुगातांदळाची. त्यातही त्यांनी फक्त खिचडी कशी द्यायची
म्हणून घोसाळ्याची भजी काढली होती. काकूंकडे पुरणपोळ्या, चकल्या, रोजचं
जेवण यांच्या आॅर्डरी असतात, इडलीचं पीठसुद्धा नेतात त्यांच्याकडनं. छोटा
इलेक्ट्रिकवरचा रगडा आहे, त्यात केलेलं असल्यानं इडल्या छान फुगतात.<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMwd9EjRhSz6RRpr6EiXQLMHgSVUdlheRad1sfvWNBPnLhkIQU3-lM3s00TtuosiWJvWnLLdymbAkHiyM4YlMbALaN7klTPqmLmID8YED7U3xU9K8qSgPsbZMI5lLDeK03_A0C3NeuE1hq/s1600/khidrapur.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="720" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMwd9EjRhSz6RRpr6EiXQLMHgSVUdlheRad1sfvWNBPnLhkIQU3-lM3s00TtuosiWJvWnLLdymbAkHiyM4YlMbALaN7klTPqmLmID8YED7U3xU9K8qSgPsbZMI5lLDeK03_A0C3NeuE1hq/s320/khidrapur.jpg" width="240" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">खिद्रापूर</td></tr>
</tbody></table>
वडे खाऊन उदयन, त्याच्या दोघी लेकी आणि आम्ही दोघी गेलो खिद्रापूरचं
प्राचीन कोपेश्वर मंदिर पाहायला. तिथनं जेवायला अर्थात नरसोबाची वाडी
गाठली. सोमण यांच्या खाणावळीत जेवा, असं काकांनी आवर्जून सांगितलं होतं.
तिथे गेलो. २४ लोक बसतील अशी दोन बाकडी आणि टेबलं. आम्ही बसल्यावर ताटं,
वाट्या आली समोर. आणि बघता बघता काेशिंबिरी, लोणची, तीन भाज्या, वाफाळता
भात, वरण, लिंबू, आमटी यांनी ताट भरून गेलं. भात संपतोय तोच गरमागरम घडीची
पोळी. एका वाटीत बासुंदी, एकीत ताक. बासुंदीच्या जोडीला टम्म फुगलेली पुरी.
वर मसालेभात. आणि अतिशय प्रेमळ आग्रहाने वाढणं. चविष्ट जेवण एकदम. खाऊन
दमलो आम्ही. (माणशी फक्त ११० रुपये.) उदयनने तर जाहीर केलं की, आता गाडी
कोणीतरी चालवा, मी झोपणार!<br />
त्या दिवशी संध्याकाळी कोल्हापुरात रिक्षाने
फिरलो. अंबाबाईचं दर्शन घेतलं. लेकीला मित्राने सांगितलं होतं, वामन गेस्ट
हाउस किंवा नीलेशमध्ये जेव, मांसाहारी जेवण छान असतं. आमचं नशीब असं की,
गणपतीचे पाच दिवस ही दोन्ही हाटेलं बंद. मग पुन्हा रिक्षावाल्याला म्हटलं,
एखाद्या चांगल्या ठिकाणी ने. त्याने एका छोट्याशा खाणावळीसमोर रिक्षा
थांबवली. तिथे चिकन, पांढरातांबडा रस्सा आणि गरमागरम पोळ्या समोर आलं. दर
तीन मिनिटांनी येऊन विचारत होता तिथला माणूस, पोळी आणू, भात आणू,रस्सा
हवाय. दोघी पोटभर जेवलो, फक्त १०० रुपयांत.<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjGw0eEivStuJ3-yMUvvl5eXzhGApRgFQwFLBP7kdqN75eaOwbDhRmVKbUCvSuzg9VE5bOncSK-PUtpkKnmdqT_s8r6zacdQuyOHeu_Og9p-d68wzUf0313rHtsU3W1N82hvIhoRBJ7lOA/s1600/misal.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="720" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjGw0eEivStuJ3-yMUvvl5eXzhGApRgFQwFLBP7kdqN75eaOwbDhRmVKbUCvSuzg9VE5bOncSK-PUtpkKnmdqT_s8r6zacdQuyOHeu_Og9p-d68wzUf0313rHtsU3W1N82hvIhoRBJ7lOA/s320/misal.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">नादखुळा मिसळ</td></tr>
</tbody></table>
दुसऱ्या दिवशी नादखुळा
मिसळ. शिवप्रसाद हा अंगतपंगतवर झालेला शेफ मित्र. त्याची ही खास शिफारस.
मिसळ भारी होती, उगीचच तिखट नाही की तेलकट तर्री नाही. कोल्हापुरात
मिसळीबरोबर पाव नाही, तर ब्रेडच्या स्लाइस मिळतात हे ऐकलं होतं. इथला ब्रेड
तर पावाच्या तोंडात मारेल असा. खूपच आवडलं हे प्रकरण.<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0WV4P0eUkA_1m4XUJWoQ0rw6Ejc_cfOJQ6fydfKshZQYHVWKztb6__wj4btDA-ez9J6_8QYd7MV8I59EV3deBgzgA_7wsmPR4PRbhqhOWGleK0gx_adL_B_eLahdR88_zchkhXIM9O6KH/s1600/bhakri.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0WV4P0eUkA_1m4XUJWoQ0rw6Ejc_cfOJQ6fydfKshZQYHVWKztb6__wj4btDA-ez9J6_8QYd7MV8I59EV3deBgzgA_7wsmPR4PRbhqhOWGleK0gx_adL_B_eLahdR88_zchkhXIM9O6KH/s320/bhakri.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">पन्हाळ्यावरची पिठलंभाकरी</td></tr>
</tbody></table>
तिथून शिव,
त्याची लेक, असे आम्ही चाैघं गेलो पन्हाळगडावर. सोनालीने बशीर नावाच्या
स्टाॅलवाल्याचा नंबर दिला होता, त्याला फोन करून सांगितलं तासाभरात येतोय,
पिठलंभाकरी खायला. फिरून आलो. बाकी सगळे स्टाॅल तीनसाडेतीनला बंद झाले होते
कारण त्या दिवशी गौरीगणपती विसर्जन होतं. गरमगरम पिठलं, भाकरी, वांगं,
लोणी असं ताट. छान गारवा होता. फिरून भूक लागली होती. त्या हवेत असं जेवण
समोर आल्यावर काहीही न बोलता तुटून पडलो. निव्वळ अहाहा. तिखट हीच पदार्थाची
चव असते, असा समज हल्ली पसरलेला दिसताे, तो इथे सुदैवाने दिसला नाही.
मसाले, खास त्या भागातली वांगी, यांची चव पदार्थांना होती. दोघं जेवलो,
दीडशेच्या कमी बिल झालं.<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEis2IkBz18LsvT5IfIzelKhLVY0vFDed7TFWSwVGmmC2FMaX7FK5ja3q9vZMNKAnFvuU0D_b33UK-KTKgjCVibuBCEI574y-Mjd23EBhW-EMb006g13zTx29DEgh1Utk9UB9glE4kv0nDhX/s1600/brinjal.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEis2IkBz18LsvT5IfIzelKhLVY0vFDed7TFWSwVGmmC2FMaX7FK5ja3q9vZMNKAnFvuU0D_b33UK-KTKgjCVibuBCEI574y-Mjd23EBhW-EMb006g13zTx29DEgh1Utk9UB9glE4kv0nDhX/s320/brinjal.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">पन्हाळ्यावरचं वांगं</td></tr>
</tbody></table>
कोल्हापुरात परतल्यावर रंकाळ्यावर चक्कर
मारली. तिथली सुप्रसिद्ध भेळ खाल्ली. भेळ हा माझ्या फार आवडीचा पदार्थ
नाही, त्यामुळे मी पास दिला. लेकीला आवडली. तिथे प्रियदर्शनी वड्याचा ट्रक
होता. एक रांग बायांची, एक पुर्षांची. शिस्तीत वाट पाहात होते लोक वडा
मिळायची. ड्वाळे पाणावले म्हणायचा हाच तो क्षण. बाकीच्याही स्टाॅलवर
बऱ्यापैकी गर्दी होती, गौरींचं गोडाधोडाचं जेवून विटलेली मंडळी तिखटामिठावर
ताव मारत होती.<br /> रात्री गाडी पकडली. शिव, गौरी आणि त्यांची लेकरं निरोप
घ्यायला आले होते. मी म्हटलं या मुंबईला. तर गौरी म्हणते, आम्ही येऊ हो,
पण तुमच्याकडे वेळ आहे का आमच्यासाठी? तुम्ही म्हणाल, या दिवसभर फिरून, मी
आॅफिसला निघते, रात्री भेटू.<br /> आईशप्पथ, हे ऐकून खूप वाईट वाटलं कारण ते
बऱ्याच अंशी सत्य होतं. कोल्हापुरात आम्हाला तिथल्या मित्रमंडळींनी
(सगळ्यांशी ओळख फेसबुकवरची.) जितका निवांत वेळ दिला, तितका मुंबईत मी किती
जणांना किती वेळा देऊ शकेन, याची माझी मलाच खात्री नाही. पण बदलायला हवंय
हे नक्की.<br /> (pics credit - <a class="profileLink" data-hovercard-prefer-more-content-show="1" data-hovercard="/ajax/hovercard/user.php?id=100025247445571&extragetparams=%7B%22fref%22%3A%22mentions%22%7D" href="https://www.facebook.com/shiv.medhe?fref=mentions&__xts__%5B0%5D=68.ARCedGoevryRKIhScj5hF4z8cgD94U1MlDes5BTUWon0C7BwvirttQfozvs8KgxH70t1sVDk4GV9J6ZafKC6M5VSla3P_FFiyKv8Rybga9Hep_n9V4QPRJGNuQHxsJXz7Wgr2ME1OPwxY2uxDURvclSt9MKUA_Js_PJsfmb9Q8ti64HnifY8xqg&__tn__=K-R">Shiv Medhe</a>)<br />
<br />mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-43044572495021914372018-08-10T16:23:00.002+05:302018-08-10T16:25:47.274+05:30whatsapp university ka gyan<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhP0f6_A7zNNEDWF0m1mtn-sS_0iqX5QRbkkxcI0DVX3AB9emCRyH8A_FZ7v7V3hHVoqRs7iOZZsfq0njmiOruqRYZJvbydvh51uMMrlMpcJbqfA6_zExy2jZGDoW4NW7xHaQszFPxx4god/s1600/chutney.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1600" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhP0f6_A7zNNEDWF0m1mtn-sS_0iqX5QRbkkxcI0DVX3AB9emCRyH8A_FZ7v7V3hHVoqRs7iOZZsfq0njmiOruqRYZJvbydvh51uMMrlMpcJbqfA6_zExy2jZGDoW4NW7xHaQszFPxx4god/s320/chutney.jpg" width="320" /></a></div>
भात कुकरमध्ये करू नका, भाज्या चिरल्या चिरल्या लगेच वापरा, फळं चिरून ठेवू नका, कणीक फ्रिजमध्ये ठेवू नका... एक ना दोन. व्हाॅट्सअॅप विद्यापीठातून असे धडे दरराेज सगळ्यांनाच मिळत असतात. त्यात खाली एखाद्या वैद्याचं किंवा डाएटिशियनचं नाव टाकलं, किंवा आयुर्वेदात शेकडो वर्षांपूर्वी असं लिहिलंय अशी पंचलाइन टाकली की एकदम बेष्ट काम. (आयुर्वेदाशी माझं काहीही वाकडं नाही. मी कधीतरी आयुर्वेदिक उपचार घेतेही. पण...)<br />
अरे पण लेको, पूर्वीच्या बायकांना स्वयंपाकघराबाहेर पडायलाच वाव नसायचा, वीज नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करावा लागायचा, 'साडेसात वाजले डबा कसा झाला नाही अजून?' असं म्हणणारी पुरुषमंडळी नसायची, हे आपण लक्षात ठेवायला हवं. मुंबईत किंवा कोणत्याही शहरात राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, सर्वसामान्य भारतीय पुरुष जितकी घरातली कामं शेअर करतात तितकीच (म्हणजे जवळपास शून्य <img src="https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f9f/1/16/1f61b.png" />) कामं करणाऱ्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या बाया कुकरशिवाय वरणभात रोज करू शकतील का? भाज्या आदल्या दिवशी चिरून फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी करण्याची सोय आहे म्हणून पोटात भाज्या जातात तरी वेगवेगळ्या. नाहीतर बटाटा, कोबी वगैरे चिरायला सोप्या भाज्या किंवा उसळीच रोज केल्या गेल्या असत्या. फळं चिरून ठेवायची नाही मान्यच, कोणी काम कमी व्हावं म्हणून तसं करत नसतं. पण मुलांना डब्यात अख्खं सफरचंद किंवा पेअर किंवा आंबा वगैरे द्यायचं का मग? कणीक फ्रिजात ठेवू नका, भूत येतं म्हणे, असा एक व्हिडिओ आला होता मध्ये. रोज सकाळसंध्याकाळ कणीक भिजवून द्या, इतकंच सांगणं असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मग.<br />
नाॅनस्टिक वापरू नका, लोखंड किंवा बिडाची भांडी वापरा, असंही सांगतात हल्ली. बिडाची भांडी मेंटेन करायला किती वेळखाऊ आहेत पण. त्याला म्हणे दरवेळी स्वच्छ केल्यानंतर तेल लावून ठेवावं लागतं.<br />
काल इथेच एक फेसबुक पेज पाहिलं, हेल्दी ब्रेकफास्ट पदार्थ सुचवणारं. एक मेनू होता, केळं, अंडं, १० बदाम, ४ खजूर आणि बरंच काही. एवढं सगळं घरातल्या चार माणसांनी रोज खायचं तर दिवाळं निघेल ना राव.<br />
मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीला काही चव नसते राव, खरी चटणी खलातच कुटलेली हवी, असाही एक सूर अनेकदा निघत असतो. ठीकेय, खलबत्ता किंवा पाटावरवंटा वापरावा की सल्ला देणाऱ्यांनी. नाहीतर चटण्याच बाद करा स्वयंपाकातून.<br />
चुलीवरची भाकरी किंवा चुलीवरचा स्वयंपाक हे आणखी एक नवीन प्रस्थ. पेटवा चुली आणि बसा फुंकत लाकडं, आमची काही हरकत नाही हो.<br />
जेवताना पाणी पिऊ नये, आधी पिऊ नये, नंतर पिऊ नये वगैरेही मधनंच फेकलं जात असतं. एक दिवस आधी प्यावं, एक दिवस जेवताना प्यावं आणि एक दिवस नंतर प्यावं, हेच बरं नै मग.<br />
ऋजुता दिवेकरांच्या नावानेही अनेक मेसेज येतात. ऋजुता आॅलमोस्ट झिरो फिगर असल्याने सगळे अधाशासारखे ते मेसेज वाचतात आणि त्यात लिहिलेलं अनुसरायचा प्रयत्न करतात. भारतीय जीवनपद्धतीचाच ती प्रसार करत असते खरं तर. पण ती तितकाच व्यायामही करत असते, हे आपण लक्षात घेत नाही. दिवसातनं दोनदाच खा ते दिवसातनं चारपाच वेळा थोडंथोडं खा, असेही दोन टोकाचे सल्ले मिळत असतात. शेवटी आपण जे काही खाऊ ते पचवायची ताकद आपल्याकडे आहे की नाही, हे आपलं आपल्यालाच माहीत असतं ना. मग आपली जीवनपद्धती आहे तसं खा, पचवा, मस्त राहा. <br />
हे सल्ले वाचून माझ्यासारख्या अनेकांचं मनोरंजन होतं. परंतु असे मेसेजेस रोज समोर आले तर ते वाचून आधीच कामाच्या ओझ्याखाली आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या (दुसऱ्यांनी दिलेल्या) अपराधगंडाने पिचलेल्या बायांना न्यूनगंड येऊ शकतो की, मी माझ्या कुटुंबासाठी असा आरोग्यदायी स्वयंपाक नाही करू शकत. माझं काहीतरी चुकतंय, मी कमी पडतेय. <br />
तर बायांनो, आणि स्वयंपाक करणाऱ्या पुर्षांनोही, हे सल्ले फाट्यावर मारा आणि तुम्हाला सोयीस्कर, आवडीचा, पोटभर, पौष्टिक स्वयंपाक करा, खा आणि खाऊ घाला. कारण सल्ले देणारी व्यक्ती ना तुम्हाला डाळिंब्या सोलून देणार असते ना भाकरी करून घालणार असते.<br />
एक आहे की, घरातले सर्व सदस्य कामं शेअर करत असतील, तर आदर्श, आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीने स्वयंपाक होऊ शकतो. एकटी बाई करणार असेल, तर तिने तिचं तिचं ठरवावं काय आणि कसा स्वयंपाक करायचा ते.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-44780543166430937532018-07-16T21:14:00.003+05:302018-07-18T13:44:59.296+05:30The beauty of Football<div data-contents="true">
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="c43lh-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="c43lh-0-0">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmC0f-K8UVUufbz8eIXjzkFsmWnJIHLFWNrXXwY-o4qwLVrRwXIUNIjtyyzybvx6syvnQr7h910PlS_zXkAUpcOkP0xMxqAQ342di-dbfXYnif7EDwANdXXgLJrRhJW_HAwTH8-siV8djn/s1600/france.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="225" data-original-width="400" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmC0f-K8UVUufbz8eIXjzkFsmWnJIHLFWNrXXwY-o4qwLVrRwXIUNIjtyyzybvx6syvnQr7h910PlS_zXkAUpcOkP0xMxqAQ342di-dbfXYnif7EDwANdXXgLJrRhJW_HAwTH8-siV8djn/s400/france.jpg" width="400" /></a></div>
फुटबाॅल विश्वचषक संपला अखेर. महिन्याभरातले सगळे सामने नाही पाहिले मी, पण बरेच पाहिले. फुटबाॅलचं तंत्र, खेळाडूंच्या पोझिशन्स, प्लेमेकर, खेळाच्या लॅटिन अमेरिकन/युरोपीय शैली, नियम, फाउल, रेड/यलो कार्ड, यातलं फारच वरवरचं मला माहीत आहे. पण या वेळी मी नेटाने ते शिकण्याचा, त्याबद्दल मिळेल तितकं वाचण्याचा प्रयत्न केला. घरी येणारी इंग्रजी वृत्तपत्रं, आॅनलाइन लेख, आणि ट्विटरच्या माध्यमांतून खूप वाचलं. २०१४ची स्पर्धा पहिली असेल जिचा मी खूप आनंद घेतला होता. त्यामुळे यंदा अधिक सजगतेने खेळ पाहिला. तरीही काय बकवास खेळलं इंग्लंड, किंवा ब्राझीलच्या खेळात ती मजा नाही राह्यली, वगैरे कमेंटण्याइतकं नाहीच कळत मला.</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="c11eg-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="c11eg-0-0">
<span data-offset-key="c11eg-0-0"><span data-text="true">पण या विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने खूप वेगवेगळे मुद्दे समोर आले. खेळापलिकडचे.</span></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="38k2t-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="38k2t-0-0">
<span data-offset-key="38k2t-0-0"><span data-text="true">रशियात स्पर्धा होत्या, पण इंग्लंडचा रशियावर राजकीय बहिष्कार आहे कारण काही रशियन गुप्तचरांना रशियाने इंग्लंडमध्ये मारलंय म्हणे गेल्या काही महिन्यांत, त्यामुळेच इंग्लंडच्या पंतप्रधान रशियात दिसल्या नाहीत, संघ उपांत्य फेरीत पोचला तरी.</span></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="6a1a0-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6a1a0-0-0">
<span data-offset-key="6a1a0-0-0"><span data-text="true">रशियाला जेव्हा स्पर्धांचं यजमानपद मिळालं, साताठ वर्षांपूर्वी, तेव्हा देशाची आर्थिक स्थिती वाईट होती. स्पर्धेसाठी उत्कृष्ट दर्जाची स्टेडियम बांधणं हे एक आव्हान होतं. ती तशी बांधली गेली, पण स्पर्धा संपल्यानंतर त्यांचं काय होणार, तिथे आठवडी बाजार भरणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अध्यक्ष पुतिन यांनीही त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय छेडला होता.</span></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="5buji-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5buji-0-0">
<span data-offset-key="5buji-0-0"><span data-text="true">स्पर्धेपूर्वी रशियातल्या गुंडागर्दी करणाऱ्या फॅन्सविषयी खूप वाचायला मिळालं होतं. खासकरून रशिया आणि इंग्लंडचे फॅन आमोरासमोर आले तर दंगली घडू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. रशियन फॅन हे व्यायामशाळेत जाऊन शरीर कमावलेले, शिस्तबद्ध हिंसाचार करणारे असतात, अशी त्यांची ख्याती. पण अशा दंगली वा स्टेडियममध्येही फॅन्सनी काही दंगामस्ती केल्याचं दिसलंही नाही, वाचनातही आलं नाही.</span></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="2u5j0-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="2u5j0-0-0">
<span data-offset-key="2u5j0-0-0"><span data-text="true">रेफ्युजी वा स्थलांतरितांचा प्रश्न गेल्या काही वर्षांत जगातील अनेक प्रगत राष्ट्रांना भेडसावू लागला आहे. तसं स्थलांतर आदिम म्हणायला हवं, परंतु या शतकातलं स्थलांतर प्रामुख्याने युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यांमुळे अाहे. विशेषकरून युरोप, अमेरिका या देशांत स्थलांतरित विरुद्ध स्थानिक असा एक संघर्ष धुमसतोय, असं चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवर युरोपातल्या सर्व संघांमध्ये तथाकथित शुद्ध गोरे खेळाडू फारच कमी दिसले. अगदी जगज्जेत्या फ्रान्सच्या संघातही ते मोजकेच आहेत. </span></span><span data-offset-key="2u5j0-0-0"><span data-text="true">आफ्रिकन मूळ असलेले अनेक खेळाडू या सर्व संघांमधून महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. आता तरी फ्रान्सने स्थलांतरितांविषयीचं धोरण उदारमतवादी ठेवावं, अशी अनेक ट्वीट्स आहेत.</span></span><br />
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="aoh1b-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="aoh1b-0-0">
<span data-offset-key="aoh1b-0-0"><span data-text="true">या स्पर्धेत सेट पीसेसच्या माध्यमातून झालेल्या गोल्सची संख्या जास्त आहे. म्हणजे पेनल्टी किक, पेनल्टी काॅर्नर, फ्री किक, यांतून झालेले गोल. बाॅल खेळवत (ड्रिबल), पास करत संधी साधून केलेले गोल कमी होते. याचा अर्थ फुटबाॅलसारखा नितांतसुंदर उन्मुक्त खेळही नियोजनबद्ध होत चालला आहे. म्हणूनच कालच्या अंतिम सामन्यात पाॅल पाॅग्बा आणि एम्बापे/मबापे (दोन सामन्यांमध्ये दोन समालोचकांनी असे दोन्ही उच्चार केले त्याच्या नावाचे.) यांचे गोल प्रेक्षणीय आणि अानंददायी होते. इथे डेटा सायंटिस्टांचा उल्लेख उचित ठरेल. कोणत्या संघाचे कोणतेे खेळाडू कसे खेळतात, याची सेकंदासेकंंदाची माहिती आता उपलब्ध असते, तिचं विश्लेषण करून कोणी कसंं खेळावं, हे आधीच ठरवलं जातं, खेळाडूंनी या नियोेजनानुसार, आखणीनुसारच खेळणं अपेक्षित असतं. यामुळे हळूहळू कदाचित या नैसर्गिक खेळातलं सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती अनाठायी वाटत नाही.</span></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="e7t1j" data-offset-key="6dgug-0-0">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6dgug-0-0">
<span data-offset-key="6dgug-0-0">अत्यंत देखण्या, हाॅट फुटबाॅलपटूंबद्दल लिहिलं नाही तर हे लिखाण अधुरं होईल. डेव्हिड बेकम हा माझ्या मर्यादित फुटबाॅलप्रेमाच्या काळातला कदाचित पहिला देखणा इसम. जर्मनीच्या संघातला बास्टियन श्वाइनस्टायगर मला आवडायचा. ('चक दे'मधला कबीर खान ज्याच्यासारखा होता, तो जोकिम लो काही हाॅट वगैरे नव्हे, पण खूपच आवडणारा. मॅनेजर/कोचबद्दल बोलतोय तर इंग्लंडचा 'वेस्टकोट'धारी गॅरेथ साउथगेटचा उल्लेख हवाच. गाेल झाल्यानंतरही चेहऱ्यावरची माशी ढळू न देणारा क्रोएशियाचा कोच डालिचही लक्षात राहिलेला.) यंदाच्या मोसमातले आॅलिविए जिरू, हॅरी केन, हे दोघे खास होते. मबापेचं हसू आणि गोल केल्यानंतर दोन्ही हात काखेत घालून स्तब्ध उभं राहाणं पाहून शाळेतला मस्तीखोर मित्र डोळ्यांसमोर येतो. मैदानात जरासाही धक्का लागल्यावर लोळणफुगडी घालणारा नेमार तर फुटबाॅल न आवडणाऱ्यांनाही माहीत झाला. त्याच्यावरचे विनोद अतिशयोक्त असले तरी एक बाब लक्षात ठेवायलाच हवी की, नेमारला फाउल करण्याचा, त्याच्या खेळावर बंधन आणण्याचा, प्रसंगी त्याला जखमी करण्याचा प्रयत्न हरेक प्रतिस्पर्धी करतो. त्याचे फाटके मोजे याची साक्ष देतात, टॅकल करणाऱ्याच्या स्पाइक्स असलेल्या बुटांमुळे त्यांची ही अवस्था होते. हेअरबँड लावणारा मानेवर केस रुळणारा धाकटा भाऊ असा असावा असं वाटायला लावणारा लुका माॅड्रिच तर खूप काळ मनात रेंगाळत राहील. आणि त्याची आसवं पुसणारी क्रोएशियाची अध्यक्ष कोलिंदाही. फ्रान्स जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणारा फ्रान्सचा तरुण अध्यक्ष मॅक्राँ, केवळ आपल्या डोक्यावर छत्री आहे हेही लक्षात न आलेला, किंवा तसं न दाखवलेला, रशियाचा सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन, या छब्या यंदाच्या स्पर्धेतल्या काही अविस्मरणीय क्षणांमध्ये नक्की जमा होणाऱ्या. या समारोपाच्या सोहळ्याच्या वेळी गतविजेत्या जर्मनीचा कर्णधार फिलिप लाम चषक घेऊन आला आणि काही क्षणांत दिसेनासा झाला. सामना संपल्यापासून चषक प्रत्यक्ष येईपर्यंत जवळपास वीस मिनिटं गेली. त्या वेळात फ्रेंच खेळाडू सेल्फी काढत होते, आनंदाचे व्हिडिओ काढत होते. क्रोएशियाचे खेळाडू थकूनभागून मैदानात बसून राहिले होते. या वेळात स्टेडियममध्ये मोठ्या पडद्यावर सामन्यातले गोल दाखवत होते. फ्रान्सचा कर्णधार व गोलरक्षक लाॅरिसच्या निव्वळ ढिसाळपणामुळे एक गोल झाला होता, तो पाहताना लाॅरिस खजील झाला, पण नंतर चक्क आपल्याच मूर्खपणावर हसत सुटला. </span></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6dgug-0-0">
<span data-offset-key="6dgug-0-0">इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या संघाबद्दल अगदीच तुरळक कुतूहल होतं. आपला संघ विश्वचषकात सहभागी होण्यास पात्र ठरलाय, याचं कौतुक वगैरे कमीच. त्यात ब्रेक्झिटमुळे इंग्लंडमधली अंतर्गत समीकरणं बदललेली. परंतु इंग्लंड जसं शेवटच्या आठ संघांमध्ये पोचलं, तसं It's coming home हे काही दशकांपूर्वी फुटबाॅलच्याच संदर्भात लिहिलेलं गाणं अचानक वर आलं आणि नंतर ओकारी येईल इतक्या वेळा हे शब्द कानांवर पडले, डोळ्यांसमोर आले. इंग्लंडच्या हवाई दलानेही या अक्षरांच्या फाॅरमॅटमध्ये फ्लायपास्ट केला. तेव्हा पाहायला मस्त वाटलं, पण इंग्लंड हरल्यानंतर हा सगळा तमाशा वाटू लागला. त्याउलट बेल्जियमच्या संघाचं आगमन कांस्यपदकांसह झालं मायदेशात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमलेला समुदाय पाहून संघ थक्क झाला. अगदीच अनपेक्षित होतं त्यांच्यासाठी ते. त्यांना फ्रान्सकडून हरल्याची खंत वाटत होती, पण देशवासियांसाठी ते सगळे हिरो होते. (हा सामना पाहताना थिअरी आॅन्रीच्या मनात काय चाललं असेल, असं मला सारखं वाटत होतं. आॅन्री हा फ्रेंच खेळाडू, बेल्जियमच्या कोचिंग स्टाफचा एक सदस्य. त्याने जेव्हा हे काम घेतलं असेल तेव्हा कधीकाळी विश्वचषकात हे दोन देश एकमेकांसमोर येतील, असं वाटलं असेल का त्याला?) इंग्लंड आणि फ्रान्स शेवटच्या चार संघांमध्ये जागा मिळवतील, अशी पुसटशीही शंका त्यांच्या देशात कोणाला नव्हती. पण आपला संघ चक्क विश्वचषक जिंकू शकतो, हे लक्षात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक उत्साहाची लाट आली. लाडक्या खेळाडूंच्या नावांचे टीशर्ट वेगाने खपू लागले. एकोप्याची भावना, आपल्या फुटबाॅलपटूंबाबत प्रेम जणू नव्याने जन्माला आलं. साउथगेट यांनी या भावनेचा पराजयानंतरच्या मुलाखतीत आवर्जून उल्लेख केला आहे. इंग्लंड जिंकलं तर अर्थव्यवस्थेलाही उजळा मिळेल, अशीही एक आशा होती, ती मात्र धुळीला मिळाली.</span><br />
<span data-offset-key="6dgug-0-0">मी क्लब फुटबाॅल पाहात नाही. भारतात, माझ्या परिचयातही बुंडेसलिगा, कोपा अमेरिका, युरो वगैरे स्पर्धा पाहण्यााऱ्यांची, वेगवेगळ्या क्लबचे फॅन असणाऱ्यांची मोठी संख्या आहे. खरंतर इंग्रजी वृत्तपत्रांमधून या स्पर्धांची सुरेख वर्णनं, बातम्या, विश्लेषणं नियमित येत असतात. तरीही त्यातले सामने पाहण्यासाठी मी आजवर वेळ काढलेला नाही, हे खरंच. मेसी आणि रोनाल्डो आपापल्या क्लबसाठी जसे खेळतात, तसे देशाच्या संघासाठी खेळत नाहीत, ही या स्टार खेळाडूंविरुद्धची मोठी तक्रार. या दोघांना त्यांच्या क्लबमधील इतर उत्तम सहकाऱ्यांची जशी साथ मिळते, तशी देशाच्या संघाकडून मिळत नाही, असं स्पष्टीकरण यासाठी दिलं जातं. क्लबवरनं आठवलं की, इंग्लंडच्या क्लब्समध्ये खेळणारे केवळ ३३ टक्के खेळाडू इंग्लंडचे नागरिक असतात, इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यासाठी पात्र असतात. बाकीचे खेळाडू बाहेरच्या देशांमधले असतात. हा प्रकार लॅटिन अमेरिका वा युरोपातल्या अन्य देशांमध्ये तितकासा होत नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये खेळणारे अनेक प्रतिभावान फुटबाॅलपटू असले तरी देशासाठी संघ निवडताना त्यांचा विचार करता येत नाही.</span><br />
<span data-offset-key="6dgug-0-0">विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून अनेक धक्के मिळत गेले. गतविजेता जर्मनी साखळीतच बाहेर फेकला गेला. ब्राझील, अर्जेंटिना, हेही लवकर बाहेर पडले. स्टार खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. ज्याच्या नावाची खूप चर्चा होती तो इजिप्तचा मो सलाह त्यातलाच. पण त्या फेऱ्यांमधलेही सामने थरारक झाले. इराणचा सामना सुरू असताना, इराणमध्ये एका स्टेडियममध्ये भल्यामोठ्या पडद्यांवर त्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं, आणि ते पाहण्यासाठी प्रथमच इराणमधील महिलांना परवानगी देण्यात आली होती. सौदी अरेबिया वि. रशिया हा उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी अनेक सौदी महिला सहकुटुंब आल्या होत्या. ही फारच लक्षणीय बाब होती या स्पर्धेतली. युरुग्वेचा संघ उत्तम खेळत होता. जपानच्या संघाने यंदा प्रथमच लागू केलेल्या चांगल्या वर्तनाच्या मुद्द्याच्या जोरावर वरच्या फेरीत प्रवेश मिळवला आणि त्यांच्या फॅन्सनीही सामना संपल्यानंतर, पराजय झाला असतानाही, स्टेडियममधला कचरा उचलून जगभरातून वाहवा मिळवली.</span><br />
<span data-offset-key="6dgug-0-0">क्रोएशियासारखा छोटासा, विकसनशील देश विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोचतो, आणि आपण मात्र अजून हिंदुमुस्लिम खेळतोय, हे क्रिकेटपटू हरभजन सिंह याचं ट्वीट बोचरं आहे. दुर्दैवाने त्यात तथ्य आहे. आणखी किती वर्षं आपण फक्त प्रेक्षक म्हणून या स्पर्धा पाहायच्या, हा प्रश्न आहेच. तसं पाहायला गेलं तर माझ्या बहुतांश मैत्रिणींना फुटबाॅलमध्ये काडीचाही, की बाॅलचाही (?) रस नाही. पण अपवाद आहेतच. एकदा ट्रेनच्या गर्दीत आमची चर्चा रंगली. तर शेवटच्या तीन सामन्यांच्या वेळी मी आणि अस्मिता आॅनलाइन होतो, आणि एकमेकीशी शेअर करत होतो.</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGctkN3ngg_PpB2ZkMQwlYnMx6ESn_BDxaBU3bjpQbxW4rAQqq0uXkC2meih8yFqLFrb9pu7omeu7IeaCnlmyXr7FUCQUGwHXFfEQq-Z-WI5oiuCOIvZrzQ2t724OFrejrRBdrYucRKwVm/s1600/collina2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="192" data-original-width="262" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGctkN3ngg_PpB2ZkMQwlYnMx6ESn_BDxaBU3bjpQbxW4rAQqq0uXkC2meih8yFqLFrb9pu7omeu7IeaCnlmyXr7FUCQUGwHXFfEQq-Z-WI5oiuCOIvZrzQ2t724OFrejrRBdrYucRKwVm/s1600/collina2.jpg" /></a></div>
<span data-offset-key="6dgug-0-0">सुरुवातीला म्हटलंय की, २०१४ हा माझ्या स्पष्ट आठवणींतला पहिला फुटबाॅल विश्वचषक. पण २००६ आणि २०१०च्या स्पर्धेतले काही सामने मी पाहिला असावेत. नाहीतर झिनेदीन झिदानेने मातेराझीला दिलेली धडक मला लक्षात राहिलीच नसती. आणि पिअरलुइजी कोलिना हा इटालियन रेफरी तर मी कधीच विसरू शकत नाही. तब्बल सहा वेळा कोलिना यांना सर्वोत्तम रेफरीचा फिफाचा पुरस्कार मिळाला आहे. इटलीचाच गोलरक्षक गिआनलुइजी बुफाँ माझा फेवरिट होता. </span><br />
<span data-offset-key="6dgug-0-0">तरीही या स्पर्धेनं मला अतिशय आनंददायी, उत्कंठावर्धक, थरारक क्षण अनुभवायची संधी दिलं, हे निश्चित. कालच्या अंतिम सामन्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंना रडू आवरत नव्हतं, पण फ्रान्सच्या खेळाडूंचेही डोळे पाणावले होते. हे फार हृदयस्पर्शी होतं. या खेळावरचं, माणसांच्या जिवंतपणावरचं प्रेम वाढवणारं होतं.</span></div>
</div>
</div>
</div>
</div>
mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-54893531081732431712018-07-10T23:06:00.000+05:302018-07-11T13:16:37.096+05:30Exploring the Gujarati mind<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxeN8ecvr6k0CSSrmGLuEoaWp7wfgR4KJxjOGEDwKgnboqa8wOqHhJui93YUZZrLEi-yGoXzcOTHVKu6SZsg_nI0VwOTRFS0ZnDJepW6TT52_cIBhw2qcEsq8U8_wAv134PE3mppaSiHcW/s1600/36621261_10216708879580455_3926690330157514752_o.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1558" data-original-width="1600" height="311" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxeN8ecvr6k0CSSrmGLuEoaWp7wfgR4KJxjOGEDwKgnboqa8wOqHhJui93YUZZrLEi-yGoXzcOTHVKu6SZsg_nI0VwOTRFS0ZnDJepW6TT52_cIBhw2qcEsq8U8_wAv134PE3mppaSiHcW/s320/36621261_10216708879580455_3926690330157514752_o.jpg" width="320" /></a></div>
माझा जन्म मुंबईचा, अख्खं आयुष्य इथेच गेलेलं. त्यामुळे गुजराती भाषा सतत कानावरून जाणारी. सख्ख्या मैत्रिणी नसल्या कोणी तरी शेजारी होतेच. अर्थात मुंबईतल्या गुजरात्यांना मराठीही येत असतं बऱ्याचदा. त्यामुळे थेट त्यांच्याशी त्या भाषेत संवाद साधायची वेळ फार येत नाही. परंतु तरीही मने गुजराती आवडतु. आवडते आणि येतेही. इतक्या वर्षांत गुजराती वाचन वर्तमानपत्रातल्या बातम्यांची शीर्षकं, दुकानांची नावं वा माणसांची नावं इतपतच मर्यादित होतं. बोललेलं कळत होतंच अर्थात.<br />
<br />
सोलापुरातल्या डाॅ. प्रतिभा काटीकर या अनेक भाषा जाणणाऱ्या, एक उत्तम वाचक, शिक्षक. दिव्य मराठीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. दिनकर जोषी यांच्या एका सदरातील पन्नासेक लेखांचा अनुवाद त्यांनी माझ्या हातात ठेवला, गुजरातीतून मराठी केलेला. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सदर होतं. अनुवाद वाटतच नव्हता, इतकं ओघवत्या शैलीत ते लिहिलेलं होतं. वाचकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. मी त्यांना काटीकर आजी म्हणते. आजींचा जन्म व बालपण गुजरातेत गेल्यानं गुजराती त्यांना मातृभाषा मराठीइतकीच उत्तम येते. नंतर पुण्यात वास्तव्य, त्यामुळे मराठीवर प्रभुत्व मिळालं. इंग्रजी साहित्यात तर त्यांची डाॅक्टरेट आहे. या आजींनी शोभा बोंद्रे यांच्या गाजलेल्या 'नाॅट ओन्ली पोटेल्स' या पुस्तकाचा गुजराती अनुवाद चार वर्षांपूर्वी केला होता. काही कारणांनी त्याचं प्रकाशन लांबणीवर पडत गेलं. अखेर जून अखेरीस पुस्तक त्यांच्या हातात आलं, आणि त्यांच्याकडून माझ्याकडे आलं. मला त्या म्हणाल्या, ओळखीचं कोणी गुजराती वाचणारं असेल तर हे वाचून अभिप्राय देता येईल का? म्हटलं नक्कीच. तेव्हाही मी ते वाचेन अशी शक्यताही लक्षात आलेली नव्हती. पण सोलापूरहून परत आल्यावर मी ते सहज हातात घेतलं आणि केव्हा वाचायला लागले, ते लक्षातही आलं नाही. अमेरिकेत अत्यंत लक्षणीय व्यवसाय करणाऱ्या, भारतात सर्वसामान्य घरांत जन्मलेल्या गुजराती व्यक्तींच्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक. पहिल्या पानापासूनच त्याने माझी पकड घेतली. गुजराती मला इतकं सोपं जाईल, हे अजिबातच वाटलं नव्हतं. मी अौपचारिकरीत्या न शिकलेल्या भाषेत काहीतरी वाचतेय, ही भावनाच मला हे पुस्तक वाचताना आली नाही. गुजराती आणि मराठीत अनेक शब्द समान आहेत, लिपी वेगळी असली तरी ऊर्दू किंवा दाक्षिणात्य भाषांइतकी परकी नाही. आणि या असामान्य माणसांची आयुष्यंच इतकी रोचक होती की मी त्यात सहजी गुंतून गेले.<br />
<br />
गुजरातेतल्या छाेट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, शेतमजुरीतून फार पैसे मिळत नाहीत म्हणून गाव सोडून जातो, अथक मेहनत करतो. वडलांचं कर्ज फेडतो. गावात एकाकडून सुरतमधल्या हिऱ्यांना पाॅलिश करण्याच्या कामाबद्दल कळल्यावर तिथे जातो. पैसे देऊन प्रशिक्षण घेतो, तिथेच कामाला लागतो. बायको असतेच बरोबर, ती खाणावळ सुरू करते. हातात बरे पैसे येऊ लागतात. तिघा धाकट्या भावांना तिथे बोलावतो. हिरे व्यापारात चार महत्त्वाची कामं असतात, पाॅलिश करायला हा शिकलेला असतो, बाकीची तीन तिघा भावांना शिकवतो. यथावकाश स्वत:चं युनिट टाकतो, हळूहळू यंत्रांची संख्या वाढत जाते, संपन्नता येत जाते. हिऱ्यांचा व्यापार सुरू करतो. युरोपात अँटवर्पला जाऊन आंतरराष्ट्रीय व्यवहार कसा चालतो, ते हा माणूस शिकतो, इंग्रजीचा गंध नसताना. आता त्यांची जगभरात अनेक ठिकाणी कार्यालयं आहेत. व्यवसाय मुलानातवांच्या हातात दिल्यावर तो पुन्हा आपल्या गावात येतो, शेती करतो आणि गावात चांगली शाळा बांधून देतो. ही पहिली गोष्ट, भीमजीभाई पटेल यांची. गुजराती माणूस कष्टांना घाबरत नाही, हे दिसतं यातनं. आणि ते पुढच्या सर्व गोष्टींमधनं समोर येतच राहातं.<br />
<br />
बाकीच्या गोष्टींमधल्या व्यक्ती १९६०, ७०च्या दशकात अमेरिकेत गेलेल्या. काही शिकायला, काही नोकरी करायला. पण धंदा करायचा मूळ स्वभाव कधी ना कधी डोकं वर काढतोच. मग एक जण चक्क एक ११ खोल्यांचं मोटेल विकत घेतो. त्याची नोकरी सुरू असतेच, त्या वेळात बायको मोटेल पाहाते, ती साडी नेसते, इंग्रजी फार येत नाही. त्या काळात अमेरिकनांना भारतीयांची, त्यांच्या पेहरावाची इतकी सवय नव्हती झालेली. तेव्हा तिथे भारतीय खाद्यपदार्थ, भाज्या वगैरेही मिळत नसता, या काळातली ही गोष्ट. आज या कुटुंबाच्या, व त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या, ज्यांना यांनीच तिथे बोलवून घेतलेलं, ६०हून अधिक मोटेल्स आहेत. हे दलपतभाई पटेल त्यांच्या शहराचे मेयर म्हणूनही निवडून आले आहेत.<br />
<br />
हसु आणि हर्षा शाह यांनी एका मोटेलपासून सुरुवात केली, आज त्याची कंपनी शंभराहून अधिक हाॅटेल्सची मालक आहे. त्यांची मुलंही याच व्यवसायात आहेत. हिल्टन, मॅरियट, वगैरेही यात आहेत.<br />
<br />
जयदेव पटेल, न्यू याॅर्क लाइफ या विमा कंपनीचे रेकाॅर्डब्रेकर एजंट. अब्जावधी डाॅलरचा धंदा त्यांनी केलेला आहे. हे मूळचे केमिस्ट बरं. आणि अबोल. आज त्यांच्या पाच हजारांहून अधिक ग्राहकांची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. I am not an insurance agent, I am a caretaker of the families हे त्यांचं तत्त्व. त्याला अनेक मानसन्मान मिळालेले आहेत.<br />
<br />
या सगळ्यांच्या बायका त्यांच्या अखंड सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून अपार मेहनत त्यांनी केली आहे. दहापंधरा जणांचा स्वयंपाक, अमेरिकी पद्धतीप्रमाणे घरातलं कामही स्वत: करणाऱ्या, नोकरीही करणाऱ्या. मोटेलवाल्याने तर बायकोला गवंडी, रंगारी, प्लंबर सगळं काम शिकवलं आणि तिने केलंही. एक जण आठ दिवसांची बाळंतपणाची रजा झाल्यानंतर बाळाला गुजराती बाईकडे सांभाळायला ठेवून जाणारी. सगळ्यांचे भारताशी, त्यांच्या खेड्याशी संबंध मजबूत आहेत. आपल्या भाईबंदांना मदत करण्याचा गुणही सर्वांमध्ये दिसतो. एकीने म्हटलंय, मी लग्न करून रोमँटिक कल्पना घेऊन अमेरिकेत आले तो काय, आमच्या छोट्याशा घरात आठदहा जण राहात होते. माझ्या पतीला अमेरिकेत पाय ठेवल्यानंतर दोन जुन्या, अचानक समोर आलेल्या मित्रांनी आसरा दिला होता, ते तो कधीच विसरला नाही आणि त्याने इतरांना मदत करायची संधी कधी सोडली नाही.<br />
<br />
पुस्तक वाचून मी एकुणात गुजरात्यांबद्दल खूप काही शिकले हे नक्की. मला अनेक किस्से इथे सांगायचा मोह होतोय, मी लेकीला किंवा आॅफिसातल्या माझ्या मैत्रिणीला रोज काय वाचलं ते आवर्जून सांगत होते. पण तुम्ही ते वाचावं, असं वाटतं. मूळ मराठी पुस्तक तसं जुनं आहे, पण आवर्जून वाचावं असं नक्कीच. या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवादही उपलब्ध आहे.mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.com0